एक्स्प्लोर

Godavari Express: नाशिककरांचे हाल, गोदावरी एक्स्प्रेस सुरू करा; संतप्त प्रवाशांची मागणी

Nashik Mumbai Godavari Express : गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी नाशिककरांनी केली आहे. पंचवटी एक्स्प्रेसमधील डब्यांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

Nashik Mumbai Godavari Express : गेल्या तीन वर्षांपासून नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची परवड सुरूच आहे. मनमाडहुन कुर्ल्याला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही अद्याप सुरू झाली नाही तर पंचवटी एक्स्प्रेसच्या बोगीही कमी झल्यानं प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशभरातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. यात नाशिककरांची जीवनवाहिनी समजली जाणारी पंचवटी एक्स्प्रेस आणि गोदावरी एक्स्प्रेस या दोन्ही एक्स्प्रेसचा समावेश होता. प्रवाशांनी सातत्याने केलेल्या मागणीमुळे पंचवटी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसचे पाच डबे कमी केले. त्यामुळे पासधारक आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. पंचवटी एक्स्प्रेसला प्रचंड गर्दी होत असल्याने तीन साडेतीन तास उभं राहून किंवा मिळेल त्या जागेत बसून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये रोष असल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले. पंचवटी एक्स्प्रेस एवढ्याच महत्वाची मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने प्रवाश्यांची दुहेरी कोंडी होत आहे. 

वारंवार मागणी करूनही गोदावरी एक्स्प्रेस सुरू होत नसल्याने नोकरी, शिक्षणानिमित्ताने मुंबईला जाणाऱ्या प्रवाश्यांचे हाल होत आहेत.  पंचवटी एक्स्प्रेस चुकली तर ऑफीसच्या वेळेत मुंबईत पोहचताच येत नसल्याने अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. या संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रवासी संघटनांनी म्हटले आहे.  ज्या मार्गावरील रेल्वे सेवा सुरू करायची आहे तिथला खर्च, प्रवाशांकडून मिळणारे उत्पन्न याचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविला जातो, त्यानंतर निर्णय घेतला जातो अस सांगत नाशिकचा केंद्रात आवाज असणाऱ्या भारती पवार यांनीही यातून हात आखडता घेतला आहे. 

सर्व व्यवहार सामान्य होत आतांनाच  रेल्वे प्रवासावर लावणारी बंधने दूर करावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे, येत्या काही दिवसात पंचवटी एक्स्प्रेसच्या बोगी वाढवणे आणि गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय झाला नाही तर आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात संतप्त प्रवासी असल्यानं मोठा गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident News : फोटो काढण्याच्या नादात पाय घसरला, पतीच्या डोळ्यादेखत चेहडी बंधाऱ्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत, मोबाईमधला क्षण ठरला अखेरचा!
फोटो काढण्याच्या नादात पाय घसरला, पतीच्या डोळ्यादेखत चेहडी बंधाऱ्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत, मोबाईमधला क्षण ठरला अखेरचा!
Nashik Crime News: शिरखुर्मा अन् थंड पेयातून दिलं गुंगीचं औषध, नंतर महिलांसोबत नराधमांनी नको नको ते केलं; नाशिक TCS प्रकरणात हादरवणारी माहिती
शिरखुर्मा अन् थंड पेयातून दिलं गुंगीचं औषध, नंतर महिलांसोबत नराधमांनी नको नको ते केलं; नाशिक TCS प्रकरणात हादरवणारी माहिती
Ashok Kharat : चाकणकरांचा पाय खोलात, 70 कोटींच्या घोस्ट अकाऊंट प्रकरणी ईडीची नोटीस
चाकणकरांचा पाय खोलात, 70 कोटींच्या घोस्ट अकाऊंट प्रकरणी ईडीची नोटीस
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल, लातूरचा निकाल सर्वात कमी, पाहा तुमच्या विभागाची टक्केवारी
बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल, लातूरचा निकाल सर्वात कमी, पाहा तुमच्या विभागाची टक्केवारी

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis on Nasrapur Bhor Crime: काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
Embed widget