एक्स्प्लोर

बदलापुरात कॉलेज विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू

अपघाताची तीव्रता इतकी होती, की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात नुपम आणि रुतिका या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले. यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईला उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे.

कल्याण : फिरण्यासाठी गेलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांची गाडी उलटून अपघात झाल्याची घटना आज दुपारी बदलापूरजवळच्या बारवी धरण परिसरात घडली. या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत.

नुपम तायडे आणि रुतिका कदम अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे दोघे आज सकाळी आपल्या इतर पाच मित्रांसोबत बदलापूरच्या बारवी धरण परिसरात इर्टिगा गाडी घेऊन फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुळगावजवळ गाडी भरधाव वेगात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी उलटली.

या अपघाताची तीव्रता इतकी होती, की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात नुपम आणि रुतिका या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले. यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईला उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. तर इतर किरकोळ जखमींवर उपचार करुन त्यांना घरी सोडून देण्यात आलं आहे.

सर्व विद्यार्थी उल्हासनगरच्या एसएसटी कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षात शिकत होते. एका मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त ते फिरण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नकाSanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाला...
नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाला...
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.