एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांच्या आकडेवारीची उद्या पोलखोल करणार; शिवसेनेचा हल्लाबोल

महाराष्ट्रात फक्त त्यांनाच अर्थगणित कळतं का? याचा विचार त्यांनी करायला हवा होता. सरकारमध्ये बसलेले अनेक जण अर्थशास्त्र जाणतात, असं म्हणत अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.

मुंबई : कोरोनाच्या संकटात राज्यतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने राज्याला कशी भरीव मदत केली, याची आकडेवारी जनतेसमोर मांडली. त्यानंतर सत्ता पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसमोर मांडलेली आकडेवारीत घोळ आहे. राज्यातील लोकांना मुर्ख बनवण्याचं काम सुरु असून या आकडेवारीची उद्या पोलखोल करणार असल्याचं शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

पुढे अनिल परब म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला आज मोठे आर्थिक सल्ले दिले आहेत. राज्य सरकारने काय करायला हवं, कशा उपाययोजना करायला पाहिजे, याबद्दल फार मोठं मार्गदर्शन त्यांनी केलं. मात्र हे करताना, महाराष्ट्रात फक्त त्यांनाच अर्थगणित कळतं का? याचा विचार त्यांनी करायला हवा होता. सरकारमध्ये बसलेले अनेक जण अर्थशास्त्र जाणतात. सरकार कसं चालतं याची जाणीव महाविकास आघाडी सरकारला आहे, असं म्हणत अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस यांनी जे विषय आज मांडले त्यातून महाराष्ट्र सरकारला काहीच कळत नाही, जे काही समजतं ते आम्हालाच समजतं, असं दाखवायचा प्रयत्न केला. आमच्या सल्लानुसार सरकार चाललं तरच कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढू शकतो, असं सांगण्याचा त्यांचा कल होता, असं अनिल परब यांनी म्हटलं.

केंद्र सरकारने महाराष्ट्राल किती मोठी मदत केली, याची आकडेवारीसह यादी देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली. फडणवीसांनी वाचून दाखवलेल्या आकडेवारीची पोलखोल, सविस्तर चिरफाड अतिशय सोप्या भाषेत उद्या राज्यातल्या जनतेसाठी सरकारच्या वतीने करण्यात येईल, असं देखील अनिल परब यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं काम करतं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अहोरात्र कष्ट करून सर्व तज्ज्ञांशी बोलून कोरोना संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही अनिल परब म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचं महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला योग्य ती मदत केली जात नाही, असा खोटा प्रचार राज्य सरकारमधील नेते करत आहेत. अशारीतीने केंद्र सरकार विरोधात वातावरण तयार केलं जात आहे. वारंवार खोटी वक्तव्य केलं की ते लोकांना खरं वाटू लागतं. मात्र केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना वाटप केलं जातं. महाराष्ट्राला यात जास्तच मिळतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

केंद्र सरकारने आतापर्यंत 28 हजार 14 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला दिला आहेत. एप्रिल-मे महिन्याचा आगाऊ निधी केंद्र सरकारने दिला आहे. शेतीसाठी केंद्र सरकारने 9 हजार कोटी रुपये दिले आहेत. पीपीई किट आणि एन 95 मास्कचा पुरवठा केंद्र सरकारने केला. श्रमिक विशेष रेल्वेसाठी 300 रुपये दिले. मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटींची मदत केली. राज्याला 4 हजार 592 कोटींचं अन्नधान्य दिलं, अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसमोर मांडली.

Devendra Fadnavis | केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर घणाघात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंडेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
IAS तुकाराम मुंढेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
Petrol and Diesel Price Hike: थोडं थोडं करुन मोठा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी कोणाच्याही लक्षात न येता पेट्रोल-डिझेलची दरवाढ कशी केली?
थोडं थोडं करुन मोठा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी कोणाच्याही लक्षात न येता पेट्रोल-डिझेलची दरवाढ कशी केली?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंडेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
IAS तुकाराम मुंढेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
Ahilyanagar Blast: अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
Amruta Khanvilkar Sonalee Kulkarni Catfight Controversy: 'इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी...'; अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यात खरंच कॅटफाईट? दोघींनी स्वतःच करुन टाकलं खरं-खोटं
'इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी...'; अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यात खरंच कॅटफाईट? दोघींनी स्वतःच करुन टाकलं खरं-खोटं
What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
Jalgaon News: शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Embed widget