एक्स्प्लोर

उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही!

ज्या कंपनीला उंदीर मारण्याचं कंत्राट दिलं, ती कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्त्वात नसल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत समोर आलं आहे. ही संस्था केवळ कागदोपत्री आहे.

नवी मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर, याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. ज्या कंपनीला उंदीर मारण्याचं कंत्राट दिलं, ती कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्त्वात नसल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत समोर आलं आहे. ही संस्था केवळ कागदोपत्री आहे. उंदीर मारण्याच्या कंत्राटामध्ये एक कंत्राट हे विनायक सहकार मजूर संस्थेच्या नावे आहे. या संस्थेने 17 हजार उंदीर मारल्याचा दावा आहे. पण, ज्यांनी ही संस्था सुरू केली, त्यांनाच ही संस्था कोण चालवतं हे माहीत नाही. अमोल शेडगे यांच्या नावावर ही संस्था स्थापन केली. मात्र आता अमोल शेडगेच हयात नाहीत. असं असताना अमोल शेडगे यांच्या खोट्या सह्या करून ही संस्था कार्यरत आहे. आनंद शेडगे यांनी आपले नातेवाईक वामन देवकर यांच्या सल्ल्याने 2002 साली विनायक सहकार मजूर संस्था स्थापन केली. 2004 साली संस्था रद्द झाल्याचं सांगितलं असताना ही संस्था अजून कार्यरत असल्याचं समोर आलं. यावेळी, त्यांनी संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली असता, उडवा-उडवीची उत्तरं दिली. मग शेडगे कुटुंबीयांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढली असता, मृत असलेला मुलगा अमोलच्या नावाने खोटी सही करून ही संस्था सुरू असल्याचं समोर आलं. आता हा उंदीर घोटाळा समोर आल्याने त्याच्या खाली अजूनही खोट्या संस्थांच्या नावे अनेक घोटाळे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उंदीर घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा ही संस्था कार्यरत असल्याचं आता शेडगे कुटुंबीयांना समजलं आहे. ही संस्था कोण चालवत आहे,  त्याला शोधून शिक्षा करावी, अशी मागणी शेडगे कुटुंबीय करत आहेत. मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप खडसेंचा नेमका आरोप काय? मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आले. 6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं. मात्र 7 दिवसांतरच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलं. दिवसाला 45 हजार उंदीर मारल्याचं सांगितलं. पण या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवाना नव्हता. मंत्रलायत विष आणण्यास परवानगी नाही. धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणलं नव्हतं. ते त्यांनी मंत्रालयात असलेलं उंदीर मारण्याचं विष घेतलं आणि प्राशन केलं. हा खूप मोठा घोटाळा आहे याची चौकशी करा, अशी मागणी खडसेंनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई हादरलं! IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, हॉस्टेलच्या थरकाप उडवणारी घटना, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई हादरलं! IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, हॉस्टेलच्या थरकाप उडवणारी घटना, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Mumbai-Goa Highway: 17 वर्षे जुन्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात 48 टक्क्यांनी वाढ; प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे 5500 कोटी रुपयांनी वाढला, RTI मधून धक्कादायक माहिती समोर
17 वर्षे जुन्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात 48 टक्क्यांनी वाढ; प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे 5500 कोटी रुपयांनी वाढला, RTI मधून धक्कादायक माहिती समोर
Mumbai Crime News: नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ केलं अन्...; मुंबईतील दोन ज्येष्ठ नागरिकांना 1.63 कोटींचा गंडा
नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ केलं अन्...; मुंबईतील दोन ज्येष्ठ नागरिकांना 1.63 कोटींचा गंडा

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Embed widget