एक्स्प्लोर

पालघर प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

जमावाकडून तिघांची ठेचून हत्या झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. मनावाधिकार आयोगानं राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.

मुंबई : पालघर प्रकरणात आता राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. जमावाकडून तिघांची ठेचून हत्या झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत पोलिसांच्या उपस्थितीत हिंसक जमावानं एखाद्याला ठेचून मारावं, हे भयानक कृत्य आहे. खरतंर अशा परिस्थितीत जमावबंदी मोडताच कामा नये, त्यासाठी पोलीस प्रशासनाने जास्त खबरदारी घेणं गरजेचं होतं. जेणेकरून एखाद्याच्या जगण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येणार नाही. अशा शब्दात मनावाधिकार आयोगानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

याप्रकरणी पोलीस प्रशासनानं संबंधितांवर काय कारवाई केली?, बळी गेलेल्यांपैकी कुणाच्या कुटुंबियांना काय दिलासा दिला? याचा तपशील पुढील चार आठवड्यांत सादर करण्याचे मानवाधिकार आयोगाने पोलीस महासंचालकांना निर्देश दिले आहेत.

पालघर हत्याकांड आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, राजकारण करु नका : शरद पवार

पालघर प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. जमावानं त्यांची कारही पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले.

VIDEO | एका अफवेनं घडलं सर्वात भयंकर हत्याकांड, नेमकं काय घडलं होतं? स्पेशल रिपोर्ट

पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले. मात्र, त्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशबशी आपली सुटका करून घेतली. मात्र त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
Thane Election MNS Candidates list: ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; 66 उमेदवारांची नावं, एका क्लिकवर
Maharashtra weather update: उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?
Mahapalika Election Alliance : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, कुणाची? कुणासोबत युती?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
Thane Election MNS Candidates list: ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; 66 उमेदवारांची नावं, एका क्लिकवर
Maharashtra weather update: उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
NCP Rakhi Jadhav: मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
NCP Rakhi Jadhav: मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
BMC Election 2026 Candidates list: उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
Sharad Pawar & Ajit Pawar: मुंबईत काका-पुतणे वेगळाच डाव टाकणार? शरद पवार गटाकडून इच्छूक उमेदवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला
मुंबईत काका-पुतणे वेगळाच डाव टाकणार? शरद पवार गटाकडून इच्छूक उमेदवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला
Embed widget