एक्स्प्लोर

मराठा समाजाच्या मोर्चांमुळे नाही, आयोगाच्या सकारात्मक अहवालामुळे आरक्षण : राज्य सरकार

आरक्षणासाठी मराठा समाजाने काढलेले मोर्चे आणि केलेली आंदोलनं यानं प्रभावित होऊन नव्हे, तर खरोखरच हा समाज मागास आहे हे दाखवणाऱ्या राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाच्या अभ्यासावरुनच सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारने बॉम्बे हायकोर्टात केला

मुंबई : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन केलेलं आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने काढलेले मोर्चे आणि केलेली आंदोलनं यानं प्रभावित होऊन नव्हे, तर खरोखरच हा समाज मागास आहे हे दाखवणाऱ्या राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाच्या अभ्यासावरुनच सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाचे ठाम समर्थन करत मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सुरु असलेला युक्तिवाद सोमवारी संपवण्यात आला. मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे आठवडाभरापासून सुरु असलेला सरकारचा युक्तिवाद अखेर सोमवारी पूर्ण झाला. या आरक्षणाचा मुख्य आधार असलेल्या आयोगाच्या अहवालाबाबत आणि सरकारच्या अधिकारांबाबत ज्येष्ठ सरकारी वकील अनील साखरे यांनी बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला देताना, त्यांनी सांगितले की, सरकारला जर एखाद्या समाजाला मागास ठरवून विकासाच्या दृष्टीने विशेष सवलती द्यायच्या असतील, तर त्यासाठी विशिष्ट परिस्थितीत राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं. विशिष्ट परिस्थितीच्या अधीन राहून जर सरकारने एखादा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये न्यायालय हे मर्यादित प्रमाणात हस्तक्षेप करु शकते. हा निर्णय घेतानाच्या प्रक्रियेबाबत न्यायालय केवळ तपासणी करु शकते, ते थांबवू शकत नाही असा दावा त्यांनी केला. यावेळी ओबीसी, मराठा आणि अन्य मागास समाजाची शास्त्रीय आकडेवारीही त्यांनी हायकोर्टाला दिली. राज्य सरकारने आरक्षणाचा निर्णय केवळ राजकीय हेतूने घेतला नसून त्यासाठीच्या कायदेशीर तरतुदींचे पालन करुनच घेतला आहे, याचा पुनरुच्चार राज्य सरकारकडून करण्यात आला. मंगळवारी राज्य सरकारच्या या निर्णयाला समर्थन देणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडण्यात येणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget