एक्स्प्लोर

अंतिम वर्षाच्या व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कुलगुरुंसोबतच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

परीक्षा हवी की नको? याबाबत पर्याय न देता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना क्लास इंम्प्रूव्हमेंट, ग्रेड सुधारणा करण्यासाठी पर्याय दिला जाणार आहे.

मुंबई : यूजीसीने सुधारित गाईडलाईन देशातील विद्यापीठांना दिल्यानंतर परीक्षा या सप्टेंबर अखेरीस घेतल्या जातील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतर यूजीसीच्या या गाईडलाइन्स सर्वांना धक्का देणाऱ्या असून राज्य सरकार आपल्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं असून त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहले आहे. मात्र, या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असताना राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एटीकेटी- बॅकलॉग व अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत काही महत्वाच्या निर्णयावर सूचना मागील आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठातील कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत घेतल्या आहेत.

यामध्ये एटीकेटी- बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बैठकीत दिलेल्या महत्वाच्या सूचनामध्ये ज्या सत्रात विद्यार्थी अनुत्तीर्ण किंवा काही विषयात एटीकेटी असेल त्याच सत्रातल्या सर्व विषयांच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचे 50 टक्के गुण व त्यासोबत त्याच सत्रातील अनुत्तीर्ण, एटीकेटी असलेल्या विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाचे 50 टक्के गुण घेऊन यामध्ये येणाऱ्या गुणांची बेरीज करून अनुत्तीर्ण किंवा एटीकेटी असलेल्या विषयाचे गुण दिले जावे, याबाबत निर्णय घेतला गेला आहे. तर ज्या विषयाला अंतर्गत मूल्यमापनाचे गुण नाहीत त्या सत्रातील सर्व विषयांच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा सरासरीसाठी  पूर्ण 100 टक्के  विचार करून एटीकेटीच्या विषयाचे गुण देऊन निकाल जाहीर करावा. त्यामुळे, सध्याच्या कोविड-19 ची परीस्थिती पाहता एटीकेटीच्या ऑनलाईन -ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे कुलगुरूंनी मत मांडल्यानंतर हा अशा प्रकारे एटीकेटी-बॅकलॉगच्या विद्यार्थ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

वरील सूत्र वापरल्यानंतर अंतिम वर्षाचा निकाल हा इतर सर्व विषयात आतापर्यंत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णयात ज्याप्रकारे परीक्षा रद्द करून विद्यापीठ ज्या सूत्राचा सरासरी गुणांसाठी वापर करेल त्या वापरलेल्या सूत्रांनी जाहीर करण्यात येणार आहे. शिवाय, हे सर्व विद्यार्थ्याचे निकाल हे 31 ऑगस्टपर्यत जाहीर करण्यात यावेत, अशा सूचना सुद्धा या बैठकीत देण्यात आल्या आहेत. 19 जून रोजी घेतलेल्या राज्य सरकारच्या शासन निर्णयात सर्व सत्रात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याचा निकाल विद्यापीठाने ठरवलेल्या सूत्रानुसार जाहीर होणार आहे.

त्यासोबतच आधीच्या घेतलेल्या शासन निर्णयात मोठा बदल करत सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा हवी की नको? याबाबत पर्याय न देता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना क्लास इंम्प्रूव्हमेंट, ग्रेड सुधारणा करण्यासाठी पर्याय दिला जाणार आहे. मात्र या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कधी होतील? होतील की नाही? याबाबत अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांना ही बाब विद्यापीठाने निदर्शनास आणून द्यावी, अस सांगण्यात आलं आहे. शिवाय, अंतिम वर्ष सोडून इतर वर्षाच्या एटीकेटी आणि बॅगलॉगच्या विद्यार्थ्यांबाबत याच सूत्राचा अवलंब करण्याचा या बैठकीत सुचवण्यात आलं आहे.

या निर्णयावर ठाम असताना यूजीसीच्या गाईडलाईन्स या राज्याला बंधनकारक नसताना जरी यूजीसीने परीक्षा घेण्यास सांगितले तर कोरोनाच्या या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन त्या परीक्षा कशा घेतल्या जातील याबाबत मार्गदर्शन तत्वे यूजीसीने आम्हाला पाठवावे, अशी मी विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. शिवाय, याबाबत उदय सामंत हे उद्या दुपारी परीक्षेबाबतच्या निर्णयावर सविस्तर बोलणार असून आपली भूमिका सर्वांसमोर मांडतील.

संबंधित बातम्या

युजीसीच्या सुधारित गाईडलाइन्सनुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत एकसमान सूत्र ठरवून पदवी प्रदान करावी, मंत्री उदय सामंत यांचं केंद्राला पत्र

Uday Samant On UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम : उदय सामंत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jain Muni Pigeon Feeding Protest: कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
Maharashtra Weather Update: 15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
Phaltan Doctor Death:  फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती, गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही, फक्त....
फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती, गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही, फक्त....
Pune Crime Ganesh Kale: गणेश काळे प्रकरणातील आरोपींची 'ससून'मध्येच कृष्णा आंदेकरशी भेट, रुग्णालयातच सुपारी फिक्स? पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा भोवला?
गणेश काळे प्रकरणातील आरोपींची 'ससून'मध्येच कृष्णा आंदेकरशी भेट, रुग्णालयातच सुपारी फिक्स? पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा भोवला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indian Women World Champions: महिला क्रिकेट टीमसाठी 51 कोटींचे बक्षीस', BCCI ची घोषणा
Jian Muni On Kahi Mathura: संयम सुटल्यास काशी-मथुरा हिसकावून घेऊ, जैन मुनींचा इशारा
Phaltan Doctroy Protest: फलटणमध्ये सुषमा अंधारेंचा एल्गार, नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन
Supriya Sule On Punjab CM: सिकंदर शेखच्या अटकेवरून राजकारण तापलं, सुप्रिया सुळेंचा थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन
Uday Sangale JOin BJP :  उदय सांगळे भाजपमध्ये प्रवेश करणार, शरद पवार गटाला धक्का

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Pigeon Feeding Protest: कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
कबूतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू : जैन मुनी
Maharashtra Weather Update: 15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
15 दिवसांपासून कोकणात पावसाचा तडाखा,  पुढील 4 दिवस कोल्हापूर, सोलापूरसह 'या' भागांना अलर्ट   
Phaltan Doctor Death:  फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती, गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही, फक्त....
फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती, गृहखात्याने एसआयटी नेमलीच नाही, फक्त....
Pune Crime Ganesh Kale: गणेश काळे प्रकरणातील आरोपींची 'ससून'मध्येच कृष्णा आंदेकरशी भेट, रुग्णालयातच सुपारी फिक्स? पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा भोवला?
गणेश काळे प्रकरणातील आरोपींची 'ससून'मध्येच कृष्णा आंदेकरशी भेट, रुग्णालयातच सुपारी फिक्स? पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा भोवला?
Shankaracharya Swami pragyanand Saraswati : जैन मुनींविरोधात आता शंकराचार्य मैदानात उतरले, खडे बोल सुनावत म्हणाले, 'कबुतरखाने जंगलात असायला हवेत'
जैन मुनींविरोधात आता शंकराचार्य मैदानात उतरले, खडे बोल सुनावत म्हणाले, 'कबुतरखाने जंगलात असायला हवेत'
Team India Won World Cup: तरीही देदीप्यमान कामगिरी करत वर्ल्डकप खेचून आणला! टीम इंडियाच्या जिगरबाज कामगिरीवर राज ठाकरे काय म्हणाले?
तरीही देदीप्यमान कामगिरी करत वर्ल्डकप खेचून आणला! टीम इंडियाच्या जिगरबाज कामगिरीवर राज ठाकरे काय म्हणाले?
Telangana Rangareddy Accident: खडीने भरलेल्या भरधाव डंपरची बसला भीषण धडक; खडीखाली गाडल्याने तब्बल 20 जणांचा जीव गेला, मृतांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
खडीने भरलेल्या भरधाव डंपरची बसला भीषण धडक; खडीखाली गाडल्याने तब्बल 20 जणांचा जीव गेला, मृतांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
Team India Victory Turning Point : ती वेळ अन् तो क्षण... टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार तिकडेच ठरलं; दक्षिण अफ्रिकेच्या 3 विकेट्स शिल्लक असताना नेमकं काय घडलं?
ती वेळ अन् तो क्षण... टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार तिकडेच ठरलं; दक्षिण अफ्रिकेच्या 3 विकेट्स शिल्लक असताना नेमकं काय घडलं?
Embed widget