एक्स्प्लोर

अंतिम वर्षाच्या व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कुलगुरुंसोबतच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

परीक्षा हवी की नको? याबाबत पर्याय न देता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना क्लास इंम्प्रूव्हमेंट, ग्रेड सुधारणा करण्यासाठी पर्याय दिला जाणार आहे.

मुंबई : यूजीसीने सुधारित गाईडलाईन देशातील विद्यापीठांना दिल्यानंतर परीक्षा या सप्टेंबर अखेरीस घेतल्या जातील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतर यूजीसीच्या या गाईडलाइन्स सर्वांना धक्का देणाऱ्या असून राज्य सरकार आपल्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं असून त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहले आहे. मात्र, या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असताना राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एटीकेटी- बॅकलॉग व अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत काही महत्वाच्या निर्णयावर सूचना मागील आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठातील कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत घेतल्या आहेत.

यामध्ये एटीकेटी- बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बैठकीत दिलेल्या महत्वाच्या सूचनामध्ये ज्या सत्रात विद्यार्थी अनुत्तीर्ण किंवा काही विषयात एटीकेटी असेल त्याच सत्रातल्या सर्व विषयांच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचे 50 टक्के गुण व त्यासोबत त्याच सत्रातील अनुत्तीर्ण, एटीकेटी असलेल्या विषयाचे अंतर्गत मूल्यमापनाचे 50 टक्के गुण घेऊन यामध्ये येणाऱ्या गुणांची बेरीज करून अनुत्तीर्ण किंवा एटीकेटी असलेल्या विषयाचे गुण दिले जावे, याबाबत निर्णय घेतला गेला आहे. तर ज्या विषयाला अंतर्गत मूल्यमापनाचे गुण नाहीत त्या सत्रातील सर्व विषयांच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा सरासरीसाठी  पूर्ण 100 टक्के  विचार करून एटीकेटीच्या विषयाचे गुण देऊन निकाल जाहीर करावा. त्यामुळे, सध्याच्या कोविड-19 ची परीस्थिती पाहता एटीकेटीच्या ऑनलाईन -ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे कुलगुरूंनी मत मांडल्यानंतर हा अशा प्रकारे एटीकेटी-बॅकलॉगच्या विद्यार्थ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

वरील सूत्र वापरल्यानंतर अंतिम वर्षाचा निकाल हा इतर सर्व विषयात आतापर्यंत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णयात ज्याप्रकारे परीक्षा रद्द करून विद्यापीठ ज्या सूत्राचा सरासरी गुणांसाठी वापर करेल त्या वापरलेल्या सूत्रांनी जाहीर करण्यात येणार आहे. शिवाय, हे सर्व विद्यार्थ्याचे निकाल हे 31 ऑगस्टपर्यत जाहीर करण्यात यावेत, अशा सूचना सुद्धा या बैठकीत देण्यात आल्या आहेत. 19 जून रोजी घेतलेल्या राज्य सरकारच्या शासन निर्णयात सर्व सत्रात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याचा निकाल विद्यापीठाने ठरवलेल्या सूत्रानुसार जाहीर होणार आहे.

त्यासोबतच आधीच्या घेतलेल्या शासन निर्णयात मोठा बदल करत सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा हवी की नको? याबाबत पर्याय न देता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना क्लास इंम्प्रूव्हमेंट, ग्रेड सुधारणा करण्यासाठी पर्याय दिला जाणार आहे. मात्र या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कधी होतील? होतील की नाही? याबाबत अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांना ही बाब विद्यापीठाने निदर्शनास आणून द्यावी, अस सांगण्यात आलं आहे. शिवाय, अंतिम वर्ष सोडून इतर वर्षाच्या एटीकेटी आणि बॅगलॉगच्या विद्यार्थ्यांबाबत याच सूत्राचा अवलंब करण्याचा या बैठकीत सुचवण्यात आलं आहे.

या निर्णयावर ठाम असताना यूजीसीच्या गाईडलाईन्स या राज्याला बंधनकारक नसताना जरी यूजीसीने परीक्षा घेण्यास सांगितले तर कोरोनाच्या या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन त्या परीक्षा कशा घेतल्या जातील याबाबत मार्गदर्शन तत्वे यूजीसीने आम्हाला पाठवावे, अशी मी विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. शिवाय, याबाबत उदय सामंत हे उद्या दुपारी परीक्षेबाबतच्या निर्णयावर सविस्तर बोलणार असून आपली भूमिका सर्वांसमोर मांडतील.

संबंधित बातम्या

युजीसीच्या सुधारित गाईडलाइन्सनुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत एकसमान सूत्र ठरवून पदवी प्रदान करावी, मंत्री उदय सामंत यांचं केंद्राला पत्र

Uday Samant On UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम : उदय सामंत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Embed widget