Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
आज काही वेळापूर्वी दादर वेस्ट येथे सुश्रुषा हॉस्पिटलला गेल्या 13 दिवसापासून ऍडमिट असलेल्या पिंकी माळीच्या आईंना भेटायला आणि कुटुंबाची विचारपूस करायला मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्यावेळेस तिचे वडील शिवचरण माळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पिंकीचा भाऊ पण उपस्थित होता त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि या गोष्टी सांगितल्या असताना मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये जो ऑडिओ रोहित आमदार रोहित पवार यांनी ऐकवला होता तो ऑडिओ मी पण ऐकला त्याच्या मधली भाषा म्हणजे व्ही के सिंग जो आहे व्ही के सिंग नी अप्रत्यक्ष धमकी दिलेली आहे पिंकी कुठून पिंकी माळीच्या कुटुंबीयांना की तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांसमोर जाऊन तुमचा जीव धोक्यात घालू नका अशा आशयाचे जर WhatsApp कॉल त्यांना येत असतील तर त्यांच्या कुटुंबाला संरक्षण मिळालच पाहिजे दुसरी गोष्ट महत्त्वाची व्ही के सिंगची सुद्धा नारको टेस्ट झाली पाहिजे व्ही एस आर वेंचरचा तो मालक आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्या ऑडिओमध्ये कॅप्टन सुमित कपूरने अजित पवार जी के विमान को ठोक दिया तर ठोक देण्याची जी भाषा आहे ती अंडरवर्ल्ड आणि क्रिमिनल लोकांची असते मी मागच्या आठवड्यात पण म्हटलं होतं का व्ही के सिंगचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे व्ही के सिंगला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते असं स्पष्ट दिसते आहे आणि व्ही के सिंग ची जी मस्ती आणि मग्रुरी त्या ऑडिओमधून दिसली त्यानंतर ते पिंकी माळी यांचा कुटुंबीय किती धाकात आहे हे यावरून स्पष्ट होतं उद्या आमच्या पक्षाचे युवा नेते जय दादा पवार हे सुद्धा पिंकी माळीच्या आईला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार आहेत त्यांच्याकडे मी एकनाथ शिंदे साहेबांचे पण आभार मानतो की डॉक्टरांचे एक पथक त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या देखरेखीसाठी ठेवलेला आहे त्यांना कुठलाही आर्थिक ताण येणार नाही अशा पद्धतीने आम्ही सर्व त्यांना सहकार्य करू आणि आज सभागृहात सुद्धा मी याबद्दल पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे वरच्या सदनामध्ये पिंकी माळी यांच्या कुटुंबाचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावा अशी विनंती करणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अजित दादांच्या विमान अपघाता संदर्भात खरं तर या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं वरिष्ठ सभागृहामधला मी सदस्य असल्यामुळे मागच्या आठवड्यात मंगळवारला ज्या वेळेस विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव आणि 93 अन्वय चर्चा लावण्याची विनंती मान्य सभापती राम शिंदे साहेबांना केल्या गेल्या त्यावेळेस स्वतः चेअरवरून राम शिंदे साहेबांनी असं म्हटलं ते ऑन रेकॉर्ड आहे की 93 अंतर्गत ही चर्चा होऊ शकत नाही ती अल्पकालीन करता येईल घटनेचं गांभीर्य पाहता आणि त्यामुळे त्यांनी अल्पकालीन चर्चेला परवानगी दिली होती त्यानंतर आम्हाला अपेक्षा होती का बुधवारच्या कामकाजामध्ये चर्चा येणार पण बुधवारी चर्चा आली नाही आम्ही सचिवांशी संपर्क केला ते म्हणाले गुरुवारी चर्चा येणार गुरुवारच्या दिवसात पण चर्चा आली नाही त्या दिवशी असं सांगितलं गेलं की राज्यसभेच्या निवडणुकीची धावपळ आहे त्यामुळे ते शुक्रवारी येणार मग शुक्रवारच्या दिवसात सुद्धा चर्चा आली नाही कारण त्या दिवशी अर्थसंकल्प होता मग असं सांगितलं गेलं की आता हा आठवडा अर्थसंकल्पाचा होता हा आठवडा अ राज्यसभेच्या बिनविरोध निवडी संदर्भातला होता त्यामुळे ही चर्चा सोमवारी येणार म्हणजे आजच्या दिवसाला आज सुद्धा जो कामकाजाचा दिनक्रम आहे त्यामधून ही चर्चा वगळण्यात आली गुरुवारी रात्री ही चर्चा अगोदर टाकल्या गेली होती पण शुक्रवारी सॉरी बुधवारी रात्री टाकल्या गेली होती 12 ला आणि मग काही मिनिटानंतर ती परत वगळण्यात आली हे सचिवालय कडून झालं असेल तर सचिवालय दोषी आहेत का हे सुद्धा महत्त्वाचं आहे पाहणं आणि दुसरं असं की अजित दादांसारख्या सत्तेतल्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान दुर्घटनेची चर्चा गेल्या आठवडाभर जर सभागृहात येत नसेल तर मग आता न्याय मागायचा कुणाकडे आतापर्यंत सीआयडी चौकशी सीबीआय चौकशी याच्या माध्यमातून बाहेर काय आलं तर फक्त महाराष्ट्राच्या जनतेला फक्त प्रश्नाचे उत्तरच अजून मिळत नाही अद्यापही अद्यापही देवगिरी ते कलिना गेट नंबर आठ आणि कलिना गेट नंबर आठ ते व्ही एस आर वेंचर इथपर्यंतचा सीसीटीव्ही मिळालेला नाही काही आमदार आम्हाला भेटले ते म्हणतात दादाची जळलेली चप्पल आम्ही पाहिली दादांच्या जळलेला मोबाईल आम्ही पाहिले दादांच्या जळलेला काय म्हणतात बॅग आम्ही बघितली पण दादांच्या सोबतचे कागद जळले नाहीत आणि दादा स्वतः जळले हे जे काही संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये हा कुठेतरी आणण्याकरता सीबीआय सीआयडी या चौकशा कितपत न्याय देतील दादांना मी सांगू शकत नाही दादाला न्याय मिळेल की नाही याबद्दल मी साशंक आहे पण दोन्ही सभागृहामध्ये ही चर्चा का येत नाही आहे याबद्दल मात्र माझ्या मनात मोठी शंका निर्माण झालेली आहे अजित दादांसारखा नेता ज्या नेत्याला कधी धर्म जात पंथ पक्ष हे जर पाहिलं नसेल आणि चर्चा घडवून आणायला हरकत काय आहे त्यामुळे वरच्या सभागृहात आज चर्चा होणं अपेक्षित होतं आज तसा सवाल मी सुद्धा चेअरला विचारल्याशिवाय राहणार नाही सीआयडीकडे स्टेटमेंट असं दिलंय यांनी की यामध्ये सगळे सर्वत्र पायलटची चूक होती सीआयडीकडे स्टेटमेंट दिलंय व्ही के सिंग यांनी की याच्यामध्ये हे बघा व्ही के सिंगला वाचवण्याचा प्रयत्न होतोय व्ही के सिंग स्वतःचं मरण त्या सुमित कपूरवर लोडतोय सुमित कपूर हा कॅप्टन जिवंत आहे की मेला याबद्दल सुद्धा संभ्रम आहे कारण आमच्या कानावर हे आलंय की तो कॅलिफोर्नियात मुलीसोबत आहे म्हणून मग तो मेला नसेल तर तो जिवंत असेल तर लपवून ठेवलाय का आणि आता अशा पद्धतीने जर तो व्ही के सिंग म्हणत असेल मुळामध्ये चूकच व्ही के सिंगची आहे ना व्ही के सिंगने उत्तर द्यावं डीजीसीए आणि एआयबी यांचं जे व्ही एस आर वेंचरशी जे काही नातं आतापर्यंत समोर आलेलं आहे त्यानुसार राष्ट्रवादीमध्ये असं काही मत झालंय का की थर्ड पार्टीकडून इन्व्हिस्टिगेशन व्हावं हे बघा एक गोष्ट ही खरी आहे की व्ही एस आर ला वाचवण्याचा प्रयत्न डीजीसीए करते आणि डीजीसीएने आपल्या सोयीचा एआयबीचा 23 पानाचा प्रथमदर्शनी अहवाल बनवला जो अत्यंत त्रोटक आणि चुकीचा आहे त्यामुळे आमच्यामध्ये अशी शंका उत्पन्न झालेली आहे की बाह्य स्त्रोतांकडूनच या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण अद्यापही तीन सव्वा महिना दीड महिना उलटल्यानंतर जर सीबीआयच्या चौकशीनंतर कोणाच्या बयान घेतल्या गेल्या नसतील तो ब्लॅक बॉक्स कुठे आहे हे कळत नसेल अहो पोलीस साधा एफआयआर करत नसतील तर मग शंकेला जागा उरते आता तुम्ही म्हणाल तुमचा रोख कुणाकडे आहे माझा रोख कुणाकडे आहे की नाही हा प्रश्न नंतरचा पण वरिष्ठ सभागृहामध्ये आणि कनिष्ठ सभागृहामध्ये ही चर्चा या आठवड्यात तरी होणार आहे की नाही याबाबत मान्य सभापती आणि मान्य विधानसभा अध्यक्ष यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे कारण हा मुद्दा हा महाराष्ट्राच्या एका लोकनेत्याच्या संदर्भात आहे हा मुद्दा म्हणजे इतका सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विसरेल असं नाही अद्यापही काही लोकांना वाटत असेल की होळीच्या धूळवडीच्या रंगांमध्ये लोक विसरून गेले असतील किंवा काल भारताने वर्ल्ड कप जिंकला म्हणजे अख्खं वर्ल्ड वॉर थांबलं अशा आशयामध्ये काल आपण सगळ्यांनी तो सेलिब्रेट केला लोकांना वाटत असेल की या सगळ्या मुद्द्यांमध्ये अजित दादांचा विषय मागे पडेल पण अजित दादांवर जीव लावणारा कार्यकर्ता अजून जिवंत आहे हा विषय आम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे पडू देणार नाही हे हा प्रश्न तुम्ही मान्य सभापती महोदय आणि मान्य विधानसभा अध्यक्ष यांना संध्याकाळी विचारायला पाहिजे की दोन्ही सभागृहामध्ये चर्चा अल्पकालीन मांडल्यानंतर सुद्धा घडून का येत नाही मान्य सभापती साहेबांना मी विचारणार आहे हिंदी में जानना चाहते है आपने पोस्ट किया है आपने पोस्ट किया है मग तेच ना सीबीआय चौकशी जर राज्य सरकारने लावली तर त्या सीबीआय चौकशीमध्ये देवगिरीवरचं फुटेज का येत नाही पहिलं तर तिथेच काय पाहिजे की दादा घरून किती वाजता निघाले त्यांच्यासोबत किती लोकं होती डीजीसीएने सहा लोकांचा आकडा दिला विमानात पाच बसली की सहा बसली कोण कोण विमानामध्ये होतं सुमित कपूर नव्हता तर शांभवी पाठक चालवत होती का फ्लाइट आणि साहिल मदन आणि यश हे दोघांचा सीसीटीव्ही तर घ्या ठीक आहे देवगिरीच्या सीसीटीव्ही नाही भेटला पण साहिल मदन आणि यश मी चार दिवस झाले ओरडतोय हे ट्राफिकमध्ये अडले तर कोणत्या रोडवर अडले होते घरून किती वाजता निघाले आणि जर तो सीसीटीव्ही नसेल तर ते आता कुठे आहेत हे तर शोधलं पाहिजे ना त्याच्यामुळे मला असं वाटतंय आज जय दादांची पत्रकार परिषद होणार होती




















