एक्स्प्लोर

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आठवडी बाजार !

नंदुरबार : तोरणमाळ खोऱ्यातील गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आठवडी बाजार भरला होता. होळी सप्ताहात नव्याने या आठवडी बाजाराची सुरुवात झाली. किराणामालासाठी याआधी 30 ते 35 किलोमीटर पायपीट करावी लागत होती. आता आठवडी बाजार सुरु झाल्याने हा त्रास आणि वेळ वाचणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांनी जल्लोष केला.    सातपुड्यातील तोरणामाळच्या खोऱ्यातील आदिवासी बांधवांना आपल्या गृहपयोगी वस्तू आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी डोंगरदऱ्यांमधून आजही अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. जिथे रस्ते आणि वाहन पोहचत नाही, अशा या तोरणामाळच्या खोऱ्यात स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाच्या मदतीने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आठवडी बाजाराची सुरवात करुन एका नव्या इतिहासाला सुरवात करण्यात आली आहे. पारंपरिक आदिवासी वेशभूषेत नृत्य करुन आदिवासी बांधवांनी होळी सणाच्या उत्साहात रंगले नसून, ते स्वागत करत आहेत ते आपल्याला होऊ घातलेल्या कमी त्रासाचा. पारंपरिक आदिवासी ढोल, घुंगरु, बासरी इत्यादींच्या ठेक्यावर ताल धरत हजारो आदिवासी बांधव आणि सजून-धजून पारंपरिक दागिने आणि वेशभूषा या डोंगरदऱ्यात जमले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आठवडी बाजाराचा आनंद ओथंबून वाहत होता. ....आणि आठवडी बाजार भरला! तोरणमाळ पर्यटन क्षेत्राच्या खाली असलेल्या दरी-खोऱ्यातील दहा गावं आणि शेकडो पाड्यातील आदिवासी बांधव आजही हालाखीचे जीवन जगत आहेत. या भागात रस्ते, वीज आणि पाणी नसल्याने या भागातील जीवनमानाची कल्पना करणे तशी अशक्यप्राय गोष्ट. त्यामुळेच जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्नधान्य आपल्या शेतात पिकवयाचं आणि आवश्यक असलेल्या गोष्टी आठवडे बाजारातून खरेदी करुन गुजारा करायचा ही हे इथलं जीवनमान. मात्र, हाच आठवडी बाजार गाठण्यासाठी त्यांना अनेक किलोमीटरची पायपीट करुन एकतर तोरणामाळ नाही, तर मध्यप्रदेश राज्यातील चेरवी हे गाव गाठावे लागते. या भागात रस्ते नसल्याने व्यापार होणार तरी कसा म्हणूनच ही कसरत त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक. मात्र, अशा अडचणींवर मात करण्यासाठी तोरणाळ ग्रामपंचायतीमध्ये नव्याने निवडणून आलेल्या तरुण सरपंच आणि त्यांच्या टीमने या दरी-खोऱ्यातच आठवडे बाजार भरवण्याची संकल्पना माडंली आणि स्वातंत्र्यानतंर पहिल्यांदाच या भागात भरला तो असा आगळा वेगळा आठवडे बाजार. या भागात पंतप्रधान ग्रामीण सडक योजने अंतर्गत रस्ते विकासाचे काम सुरु आहे. मात्र निधी नसल्याने हे रस्ते देखील अडकले आहेत. त्यामुळेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि या भागाचे आमदार आपल्या वाहनांची कसरत करत या आठवडी बाजाराच्या शुभारंभासाठी खास दाखल झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या आदिवासी बांधवांसाठी होऊ घातलेल्या या सोनेरी पानाला याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर देखील आवर्जुन उपस्थित होत्या. या साऱ्यांनीच आदिवासी पारंपरिक पद्धतीने नाचून या आठवडी बाजाराच्या उदघाटनाचे स्वागत केले. या खोऱ्यातील फलई या गावी आता दर शुक्रवारी आठवडे बाजार भरणार असून यासाठी व्यापारी हे मध्यप्रदेशमधून कसरत करत येणार आहे. मात्र हा बाजार यापुढे टिकवायचा असेल आणि आदिवासी बांधवाचे कष्ट कमी करावयाचे असेल तर महाराष्ट्रातू येणारे रस्ते तात्काळ बनवून वीज, पाणी रस्ता यांसारख्या मुलभूत सुविधा तात्काळ आदिवासी बांधवांना पुरवण्याची गरज स्थानिक आमदारांनी व्यक्त केली आहे. आजही तोरणमाळच्या या दऱ्याखोऱ्यात दळण वळणाचे आणि वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून गाढवाचा उपयोग होत आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षे उलटत आली असली तरी या भागात वीज आणि रस्ते पोहचू शकली नाही, याहून मोठी शोकांतिका ती कुठली? म्हणूनच अनेक किलोमीटरची पायपीट कमी करणारा आणि आपले शारिरीक त्रास कमी करुन आपला जीवनावश्यक माल आपल्यासाठी जवळ उपलब्ध करुन देणारा हा आठवडी बाजाराचा आनंद या आदिवासी बांधवांसाठी कुठल्या सणापेक्षा कमी नाही. त्यामुळेच तोरणमाळच्या या नव्या दमाने होऊ घातलेल्या नेत्यांनी आणि युवकांन उचलेले हे पाऊल मैलाचा दगडच म्हणावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Dharashiv BJP: धाराशिव भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, राणाजगजितसिंह पाटलांना कार्यक्रमातून डावलले; ओमराजे निंबाळकरांची प्रमुख उपस्थिती, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
धाराशिव भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, राणाजगजितसिंह पाटलांना कार्यक्रमातून डावलले; ओमराजे निंबाळकरांची प्रमुख उपस्थिती, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Girish Mahajan Nashik Pothole death: 'लग्नाची खरेदी अपुरीच राहिली', नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे महिलेचा गेला जीव; गिरीश महाजनांसमोर बेळे कुटुंबाचा आक्रोश
'लग्नाची खरेदी अपुरीच राहिली', नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे महिलेचा गेला जीव; गिरीश महाजनांसमोर बेळे कुटुंबाचा आक्रोश

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Embed widget