एक्स्प्लोर

कोरेगाव भीमा हिंसाचार हे पोलीस यंत्रणेचं अपयश, अधिकार असतानाही त्यांनी वापरले नाहीत: शरद पवार

विवादीत जागा राज्य सरकारनं नियंत्रणात घेत, नवं स्वतंत्र विजय स्मारक उभारत वाद कायमचा मिटवावा असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. 

मुंबई: कोणत्याही चौकशीविना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्याला क्लीन चीट देणं चुकीचं आहे, असं स्पष्ट करत शरद पवारांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसंनी भिडे गुरूजींबाबत केलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. तसेच या घटनेनंतर राज्यभरात उसळलेला हिंसाचार हे पोलीसयंत्रणेचं अपयश असून त्यावेळच्या सरकारची हे आंदोलन थांबवण्याची राजकिय इच्छाशक्ती नव्हती अशी टिप्पणी करत फडणवीसांकडे असलेलं गृहखातं आणि युती सरकारवरही निशाणा साधला. याप्रकरणी आपला जाबब नोंदवण्यासाठी शरद पवार गुरूवारी चौकशी आयोगापुढे हजर झाले होते. जवळपास पाच तास चाललेल्या या चौकशीत पवारांनी एकूण 34 प्रशांची उत्तर दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या या सुनावणीच्या पहिल्या सत्राला या प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेही शरद पवारांची साक्ष ऐकण्यासाठी उपस्थित होते हे विशेष.

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार या दोन्ही भिन्न घटना आहेत. मात्र त्या एकमेकांशी संबंधित आहेत हे दाखवण्याचा उजव्या विचारसरणीच्या लोकांनी जाणूनबूजू  प्रयत्न आधीपासूनच सुरू होता हे मीडियातील बातम्यांवरून आपल्या नंतर लक्षात आलं असं पवारांनी स्पष्ट केलं. याशिवाय एल्गार परिषदेची सांगता ही एका विशिष्ठ शपथविधीनं झाली होती. "या देशाच्या संविधानावर माझी निष्ठा आहे", अश्या आशयाची शपथ घेण्या-यांना देशद्रोही म्हणता येणार नाही. तसेच जर एल्गार परिषदेत झालेल्या भाषणांत त्या व्यक्तींनी त्यांच्यावर असलेल्या अत्याचारांवर नाराजी व्यक्त केली असेल तर त्यानं ते देशविरोधी होत नाहीत. अस मत राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरूवारी चौकशी आयोगापुढे व्यक्त केलं. इतकंच नव्हे तर या परिषदेला उपस्थित नसलेल्यांवरही नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून गुन्हा दाखल केला गेला यावर नाराजीही व्यक्त करत आपण या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोरगावमधील 'त्या' जागेची नोंद ऐतिहासिक वारसा म्हणून नाही. त्यामुळे त्याचा ताबा राज्य सरकारनं स्वत:कडे घेत तिथल्या जमीन मालकांना योग्य तो मोबदला द्यायला हवा. याशिवाय तिथं एक स्वतंत्र युद्ध स्मारक तयार करून पाकिस्तान आणि चीनसोबत झालेल्या युद्धात शहिद झालेल्यांच्या स्मृती तिथं जागवाव्यात. जेणेकरून माजी सैनिकांच्या बाबतीतील सारे वादच संपून जातील. तसेच जर साल 1975 पासून राज्य सरकार आणि पुरातत्व विभागानं त्याचा ताबा स्वत:कडे असल्याचं घोषित केलंय तर मग त्यावर इतर कुणी त्यावर आपला दावा सांगण्याचं कारणच उरत नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं. कारण लोकांचा असा समज आहे की, कोरेगावचं युद्ध हे ब्रिटीश आणि दुस-या बाजीराव पेशव्यात झालं ज्यात ब्रिटीश आर्मीतून अनेक महार शिपाई लढले होते, यामुळे काहींनी हा वाद जाणूनबुजून पसरवला.

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे गेली चार वर्ष सुरूच आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे, असं पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता. या घटनेनंतर पवारांनी माध्यमांत केलेल्या काही विधानांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे यासंदर्भातील काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचं त्यांनी आपल्या अर्जात नमूद केलं होतं. त्याची दखल घेत आयोगानं शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचं समन्स जारी केलं होतं. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: पती-पत्नीने एकाच दोरीने संपवली जीवनयात्रा, दोन चिमुकली मुलं पोरकी; जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
पती-पत्नीने एकाच दोरीने संपवली जीवनयात्रा, दोन चिमुकली मुलं पोरकी; जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Pankaja Munde : स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
Pune Crime: नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aniket Varma: अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
Pankaja Munde : स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
Thane Electricity Supply : ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Akola News: गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
Ashok Kharat: तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
Marathi Actor Accident:निखील बनेनंतर आणखी एका हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा भीषण अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ 
निखील बनेनंतर आणखी एका हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा भीषण अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ 
Embed widget