एक्स्प्लोर

कोरेगाव भीमा हिंसाचार हे पोलीस यंत्रणेचं अपयश, अधिकार असतानाही त्यांनी वापरले नाहीत: शरद पवार

विवादीत जागा राज्य सरकारनं नियंत्रणात घेत, नवं स्वतंत्र विजय स्मारक उभारत वाद कायमचा मिटवावा असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. 

मुंबई: कोणत्याही चौकशीविना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्याला क्लीन चीट देणं चुकीचं आहे, असं स्पष्ट करत शरद पवारांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसंनी भिडे गुरूजींबाबत केलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. तसेच या घटनेनंतर राज्यभरात उसळलेला हिंसाचार हे पोलीसयंत्रणेचं अपयश असून त्यावेळच्या सरकारची हे आंदोलन थांबवण्याची राजकिय इच्छाशक्ती नव्हती अशी टिप्पणी करत फडणवीसांकडे असलेलं गृहखातं आणि युती सरकारवरही निशाणा साधला. याप्रकरणी आपला जाबब नोंदवण्यासाठी शरद पवार गुरूवारी चौकशी आयोगापुढे हजर झाले होते. जवळपास पाच तास चाललेल्या या चौकशीत पवारांनी एकूण 34 प्रशांची उत्तर दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या या सुनावणीच्या पहिल्या सत्राला या प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेही शरद पवारांची साक्ष ऐकण्यासाठी उपस्थित होते हे विशेष.

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार या दोन्ही भिन्न घटना आहेत. मात्र त्या एकमेकांशी संबंधित आहेत हे दाखवण्याचा उजव्या विचारसरणीच्या लोकांनी जाणूनबूजू  प्रयत्न आधीपासूनच सुरू होता हे मीडियातील बातम्यांवरून आपल्या नंतर लक्षात आलं असं पवारांनी स्पष्ट केलं. याशिवाय एल्गार परिषदेची सांगता ही एका विशिष्ठ शपथविधीनं झाली होती. "या देशाच्या संविधानावर माझी निष्ठा आहे", अश्या आशयाची शपथ घेण्या-यांना देशद्रोही म्हणता येणार नाही. तसेच जर एल्गार परिषदेत झालेल्या भाषणांत त्या व्यक्तींनी त्यांच्यावर असलेल्या अत्याचारांवर नाराजी व्यक्त केली असेल तर त्यानं ते देशविरोधी होत नाहीत. अस मत राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरूवारी चौकशी आयोगापुढे व्यक्त केलं. इतकंच नव्हे तर या परिषदेला उपस्थित नसलेल्यांवरही नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून गुन्हा दाखल केला गेला यावर नाराजीही व्यक्त करत आपण या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोरगावमधील 'त्या' जागेची नोंद ऐतिहासिक वारसा म्हणून नाही. त्यामुळे त्याचा ताबा राज्य सरकारनं स्वत:कडे घेत तिथल्या जमीन मालकांना योग्य तो मोबदला द्यायला हवा. याशिवाय तिथं एक स्वतंत्र युद्ध स्मारक तयार करून पाकिस्तान आणि चीनसोबत झालेल्या युद्धात शहिद झालेल्यांच्या स्मृती तिथं जागवाव्यात. जेणेकरून माजी सैनिकांच्या बाबतीतील सारे वादच संपून जातील. तसेच जर साल 1975 पासून राज्य सरकार आणि पुरातत्व विभागानं त्याचा ताबा स्वत:कडे असल्याचं घोषित केलंय तर मग त्यावर इतर कुणी त्यावर आपला दावा सांगण्याचं कारणच उरत नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं. कारण लोकांचा असा समज आहे की, कोरेगावचं युद्ध हे ब्रिटीश आणि दुस-या बाजीराव पेशव्यात झालं ज्यात ब्रिटीश आर्मीतून अनेक महार शिपाई लढले होते, यामुळे काहींनी हा वाद जाणूनबुजून पसरवला.

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे गेली चार वर्ष सुरूच आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे, असं पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता. या घटनेनंतर पवारांनी माध्यमांत केलेल्या काही विधानांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे यासंदर्भातील काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचं त्यांनी आपल्या अर्जात नमूद केलं होतं. त्याची दखल घेत आयोगानं शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचं समन्स जारी केलं होतं. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Sakinaka Manhole : मुंबईत उघड्या मॅनहोलने चालता-बोलता एकाचा बळी घेतला, नेमकं काय घडलं?, एबीपीच्या रिपोर्टरने सांगितला थरार
मुंबईत उघड्या मॅनहोलने चालता-बोलता एकाचा बळी घेतला, नेमकं काय घडलं?, एबीपीच्या रिपोर्टरने सांगितला थरार
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
Embed widget