एक्स्प्लोर

गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला

पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत असल्याने भामरागड शहरात पाणी शिरलं असून 10 दुकाने पाण्याखाली आले आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात सुरुवात केली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गडचिरोली : हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीचा इशाऱ्यानंतर जिल्ह्यात 48 तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भामरागड तालुक्याला परत एकदा पुराचा फटका बसला असून पर्लकोटा नदीला पूर आला आहे. भामरागड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात 61.7mm इतका पाऊस  झाला असून भामरागड तालुक्यात सर्वाधिक 243.3mm इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे भामरागड मार्ग कालपासून बंद पडला आहे. जिल्ह्यात आणि छत्तीसगड राज्यात मुसळधार पावसामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत असल्याने भामरागड शहरात पाणी शिरलं असून 10 दुकाने पाण्याखाली आले आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात सुरुवात केली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोली शहरालाही पाण्याचा फटका बसला आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचलं आहे . आयटीआय चौक, नगर परिषद, पेट्रोल पंप, कृषी महाविद्यालयात, कन्नमवार वार्ड, परिसर जलमय झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या 24 तासात ही नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज  नागपुरात पावसाने नियमित हजेरी लावायला सुरुवात केली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यांनतर मंगळवारी दुपारी ही नागपुरात दमदार पाऊस झाला. तर आज  दुपारपासूनही पावसाने शहरात सर्वत्र हजेरी लावली आहे. तसा पाऊस हळुवार पडत असला तरी अधून मधून पावसाची गती वाढत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या नागपूरकरांना हा पाऊस दिलासा देणारा ठरतोय.  नागपूरला 80 टक्के पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाच्या  पाणी साठ्यात तीव्रतेने वाढ होत आहे. आज सकाळी तोतलाडोह धरणात 43 टक्के उपयुक्त जलसाठा होता. तिकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह मध्य भारतात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने नागपूरसह विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे.  येत्या 24 तासात ही नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget