एक्स्प्लोर

राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आंदोलनाच्या पवित्र्यात; उजव्या विचारसरणीकडे झुकल्याने अनेकांचे धाबे दणाणणार

प्रकाश आंबेडकरांकडून मंदिरे खुले करण्याचे आंदोलन हे सवंग लोकप्रियतेमधून सुरु केले असून ते मायावतींच्या मार्गावर निघाल्याचा घणाघाती आरोप आंबेडकरी चळवळीतील रिपाई नेते सुनील सर्वगोड यांनी केला आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटात गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी आता वारकरी संप्रदायाच्या आंदोलनाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांकडे आल्याने वंचित बहुजन आघाडी आता पुरोगामी विचाराकडून उजव्या विचाराकडे वळू लागल्याचा धसका अनेकांनी घ्यायला सुरुवात झाली आहे. देव आणि धर्म हे सनातनी मंडळींचे मुद्दे कधीही देव न मानणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी हाती घेतल्याने राज्यातील मंदिर उघडणे हा केवळ एक मुद्दा बनला असून खरे विचारमंथन डावे आणि उजव्या विचारसरणीचे अंतर कमी करण्यासाठी आंबेडकरांनी टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल आहे काय याच विचाराने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. आंबेडकरांचे हे पाऊल अतिशय योग्य असल्याचा निर्वाळा वारकरी संप्रदायातून येत असून मंदिरे उघडल्यावर देव दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि याचा उपयोग कोरोनासाठी लढाण्याला होईल, असा विश्वास वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ नेते माधवमहाराज शिवनीकर यांना आहे. मंदिरे उघडणे ही काळाची गरज असल्याचे ते सांगतात.

राज्यातील दारू दुकाने सुरु झाली, सर्व व्यवहार सुरु झाले, लग्न कार्ये होऊ लागली मग भजन कीर्तन करणे आणि मंदिरात जाऊन प्रार्थना करणे का सुरु होत नाही, असा सवाल विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे करतात. याचसाठी आम्ही हे आंदोलन सुरु केले असून जेव्हा सरकार आणि शास्त्रज्ञांना अजून लस शोधण्यात यश येत नाही तेव्हा किमान मंदिरामध्ये जाऊन सकारात्मक ऊर्जा तरी आम्हाला मिळवता यावी अशी भूमिका मांडतात. यासाठी वारंवार सरकारला मागणी करूनही सरकार विचार करत नसल्याने बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन सुरु केल्याचे सांगतात. सरकारने निर्णय न घेतल्यास 31 ऑगस्ट रोजी आंदोलन होणार असल्याचे अरुण महाराज सांगतात.

राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीला जोर, शिर्डीकरांचा न्यायालयीन लढाईसोबत उपोषणाचा इशारा

प्रकाश आंबेडकरांकडून मंदिरे खुले करण्याचे आंदोलन हे सवंग लोकप्रियतेमधून सुरु केले असून ते मायावतींच्या मार्गावर निघाल्याचा घणाघाती आरोप आंबेडकरी चळवळीतील रिपाई नेते सुनील सर्वगोड यांनी केला आहे. विश्व वारकरी सेनेला कोणताही जनाधार नसल्याने 100-200 लोके कशीतरी जमा होतील मात्र यामुळे कोरोनाचा धोका वाढणार असल्याचा आरोप सर्वगोड यांनी केला आहे.

मंदिर उघडणेबाबत आंबेडकरांचे आंदोलन हे केवळ राजकीय असल्याचा आरोप भगताचार्य बाळासाहेब बडवे यांनी केला आहे. एका बाजूला मंदिर खुले करण्याबाबत वारकरी संप्रदायातून मिळणार वाढत पाठिंबा हे आंबेडकरांच्या विचारांचा विजय असल्याचे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक वामनराव धांडोरे याना वाटतोय. आंबेडकर हे नेहमीच बहुजनातील वंचितांच्या बाजूने उभे राहत आले आहेत. मंदिरे बंद झाल्याने हजारो बहुजन कुटुंबासोबत काही ब्राम्हण कुटुंबांवरही उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी मंदिरे उघडल्यास हजारो गोरगरीब कुटुंबाला जगात येणार असल्यानेच आंबेडकरांनी हा मुद्दा हातात घेतल्याचे धांडोरे याना वाटते. यामुळे आंबेडकरांना राजकीय फायदा होईल मात्र ज्यांनी हिंदू धर्म पेटंट म्हणून आजवर वापरला त्यांना आंबेडकरांची भूमिका नक्कीच अडचणीची असल्याचे धांडोरे सांगतात. वास्तविक या भूमिकेमुळे डावे व उजवे विचारसरणीतील अंतर कमी होऊन सामाजिक विषमता कमी होईल असा विश्वास धांडोरे याना वाटतो. आज हे नुसते मंदिर उघडण्याचे आंदोलन वाटत असले तरी भविष्यात यामुळे मोठी सामाजिक समता येईल असा विश्वास धांडोरे व्यक्त करतात.

राज्यातील मंदिरं तातडीनं सुरू करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

वास्तविक मंदिराच्या प्रश्नावर मताची बेगमी करणारे भाजप-शिवसेना यांनी वारकरी संप्रदायाला या प्रश्नावर वाऱ्यावर सोडून दिल्यावर डाव्या विचाराचे म्हणून ओळखले जाणारे प्रकाश आंबेडकर यांनी हा प्रश्न हाती घेतल्यावर आता आंबेडकर मायावतींचे मार्गावर निघाले अशी हाकारी काही मंडळी देऊ लागली असली तरी कोरोनाच्या अडचणीच्याकाळात वारकरी संप्रदायाच्या मदतीला आंबेडकर धावून आल्याने आज वारकरी संप्रदायाला वंचित आपलेसे वाटू लागले आहे. जरी आंबेडकरांनी राजकारणासाठी सॉफ्ट हिंदुत्व जवळ करण्यास सुरुवात केली असली तरी यामुळे समाजातील विषमता कमी होईल असा विश्वास डाव्या चळवळीतील अभ्यासकांना वाटत आहे.

महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही?; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?  
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2026 | गुरुवार
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
अशोक खरात पाणी प्रकरणात ज्याने आदेश दिलेत त्याची चौकशी व्हावी, शितल म्हात्रेंच्या टीकेवर दानवेंचं प्रत्युत्तर
अशोक खरात पाणी प्रकरणात ज्याने आदेश दिलेत त्याची चौकशी व्हावी, शितल म्हात्रेंच्या टीकेवर दानवेंचं प्रत्युत्तर

व्हिडीओ

Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
Sushma Andhare on Sheetal Mhatre : खरातला पाणी देण्यासाठी रुपाली चाकणकरांची शिफारस, मग बंदूक कुणी दिली?
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
BCCI Schedule Update : रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
इराणनं होर्मुझवरून घाम फोडला असतानाच आता अरबी समुद्राच्या तोंडावर असणाऱ्या स्ट्रेटवर हल्ल्याचा इशारा! तेथून अमेरिकन एअरबेस फक्त 30 किमी अंतरावर!
इराणनं होर्मुझवरून घाम फोडला असतानाच आता अरबी समुद्राच्या तोंडावर असणाऱ्या स्ट्रेटवर हल्ल्याचा इशारा! तेथून अमेरिकन एअरबेस फक्त 30 किमी अंतरावर!
Sushma andhare on Shital Mhatre: आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा
आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा
मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Alireza Tangsiri : होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणारा इराणचा नौदल प्रमुख ठार, इस्त्रायलचा मोठा दावा
होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणारा इराणचा नौदल प्रमुख ठार, इस्त्रायलचा मोठा दावा
Embed widget