एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आंदोलनाच्या पवित्र्यात; उजव्या विचारसरणीकडे झुकल्याने अनेकांचे धाबे दणाणणार

प्रकाश आंबेडकरांकडून मंदिरे खुले करण्याचे आंदोलन हे सवंग लोकप्रियतेमधून सुरु केले असून ते मायावतींच्या मार्गावर निघाल्याचा घणाघाती आरोप आंबेडकरी चळवळीतील रिपाई नेते सुनील सर्वगोड यांनी केला आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटात गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी आता वारकरी संप्रदायाच्या आंदोलनाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांकडे आल्याने वंचित बहुजन आघाडी आता पुरोगामी विचाराकडून उजव्या विचाराकडे वळू लागल्याचा धसका अनेकांनी घ्यायला सुरुवात झाली आहे. देव आणि धर्म हे सनातनी मंडळींचे मुद्दे कधीही देव न मानणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी हाती घेतल्याने राज्यातील मंदिर उघडणे हा केवळ एक मुद्दा बनला असून खरे विचारमंथन डावे आणि उजव्या विचारसरणीचे अंतर कमी करण्यासाठी आंबेडकरांनी टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल आहे काय याच विचाराने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. आंबेडकरांचे हे पाऊल अतिशय योग्य असल्याचा निर्वाळा वारकरी संप्रदायातून येत असून मंदिरे उघडल्यावर देव दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि याचा उपयोग कोरोनासाठी लढाण्याला होईल, असा विश्वास वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ नेते माधवमहाराज शिवनीकर यांना आहे. मंदिरे उघडणे ही काळाची गरज असल्याचे ते सांगतात.

राज्यातील दारू दुकाने सुरु झाली, सर्व व्यवहार सुरु झाले, लग्न कार्ये होऊ लागली मग भजन कीर्तन करणे आणि मंदिरात जाऊन प्रार्थना करणे का सुरु होत नाही, असा सवाल विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे करतात. याचसाठी आम्ही हे आंदोलन सुरु केले असून जेव्हा सरकार आणि शास्त्रज्ञांना अजून लस शोधण्यात यश येत नाही तेव्हा किमान मंदिरामध्ये जाऊन सकारात्मक ऊर्जा तरी आम्हाला मिळवता यावी अशी भूमिका मांडतात. यासाठी वारंवार सरकारला मागणी करूनही सरकार विचार करत नसल्याने बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन सुरु केल्याचे सांगतात. सरकारने निर्णय न घेतल्यास 31 ऑगस्ट रोजी आंदोलन होणार असल्याचे अरुण महाराज सांगतात.

राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीला जोर, शिर्डीकरांचा न्यायालयीन लढाईसोबत उपोषणाचा इशारा

प्रकाश आंबेडकरांकडून मंदिरे खुले करण्याचे आंदोलन हे सवंग लोकप्रियतेमधून सुरु केले असून ते मायावतींच्या मार्गावर निघाल्याचा घणाघाती आरोप आंबेडकरी चळवळीतील रिपाई नेते सुनील सर्वगोड यांनी केला आहे. विश्व वारकरी सेनेला कोणताही जनाधार नसल्याने 100-200 लोके कशीतरी जमा होतील मात्र यामुळे कोरोनाचा धोका वाढणार असल्याचा आरोप सर्वगोड यांनी केला आहे.

मंदिर उघडणेबाबत आंबेडकरांचे आंदोलन हे केवळ राजकीय असल्याचा आरोप भगताचार्य बाळासाहेब बडवे यांनी केला आहे. एका बाजूला मंदिर खुले करण्याबाबत वारकरी संप्रदायातून मिळणार वाढत पाठिंबा हे आंबेडकरांच्या विचारांचा विजय असल्याचे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक वामनराव धांडोरे याना वाटतोय. आंबेडकर हे नेहमीच बहुजनातील वंचितांच्या बाजूने उभे राहत आले आहेत. मंदिरे बंद झाल्याने हजारो बहुजन कुटुंबासोबत काही ब्राम्हण कुटुंबांवरही उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी मंदिरे उघडल्यास हजारो गोरगरीब कुटुंबाला जगात येणार असल्यानेच आंबेडकरांनी हा मुद्दा हातात घेतल्याचे धांडोरे याना वाटते. यामुळे आंबेडकरांना राजकीय फायदा होईल मात्र ज्यांनी हिंदू धर्म पेटंट म्हणून आजवर वापरला त्यांना आंबेडकरांची भूमिका नक्कीच अडचणीची असल्याचे धांडोरे सांगतात. वास्तविक या भूमिकेमुळे डावे व उजवे विचारसरणीतील अंतर कमी होऊन सामाजिक विषमता कमी होईल असा विश्वास धांडोरे याना वाटतो. आज हे नुसते मंदिर उघडण्याचे आंदोलन वाटत असले तरी भविष्यात यामुळे मोठी सामाजिक समता येईल असा विश्वास धांडोरे व्यक्त करतात.

राज्यातील मंदिरं तातडीनं सुरू करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

वास्तविक मंदिराच्या प्रश्नावर मताची बेगमी करणारे भाजप-शिवसेना यांनी वारकरी संप्रदायाला या प्रश्नावर वाऱ्यावर सोडून दिल्यावर डाव्या विचाराचे म्हणून ओळखले जाणारे प्रकाश आंबेडकर यांनी हा प्रश्न हाती घेतल्यावर आता आंबेडकर मायावतींचे मार्गावर निघाले अशी हाकारी काही मंडळी देऊ लागली असली तरी कोरोनाच्या अडचणीच्याकाळात वारकरी संप्रदायाच्या मदतीला आंबेडकर धावून आल्याने आज वारकरी संप्रदायाला वंचित आपलेसे वाटू लागले आहे. जरी आंबेडकरांनी राजकारणासाठी सॉफ्ट हिंदुत्व जवळ करण्यास सुरुवात केली असली तरी यामुळे समाजातील विषमता कमी होईल असा विश्वास डाव्या चळवळीतील अभ्यासकांना वाटत आहे.

महाराष्ट्रातले मॉल उघडू शकता, मग मंदिरं का नाही?; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: जळगावमध्ये उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 45 अंशांवर
Maharashtra Live blog updates: जळगावमध्ये उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 45 अंशांवर
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
Mumbai Pune Expressway Missing Link: नियम केवळ सामान्यांसाठी? पिंपरीचे महापौर रवी लांडगेंचा मिसिंग लिंकवर फोटो, महामार्ग पोलिसांनी कारवाई केली का? जनतेचा प्रश्न
नियम केवळ सामान्यांसाठी? पिंपरीचे महापौर रवी लांडगेंचा मिसिंग लिंकवर फोटो, महामार्ग पोलिसांनी कारवाई केली का? जनतेचा प्रश्न

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Embed widget