जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पुतणे युगेंद्र पवार हे आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झालेले पाहायला मिळत आहे.
Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पुतणे युगेंद्र पवार हे आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झालेले पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवारांनी आज बारामती तालुक्यातील जिरायती भागातील पाणी संदर्भात जानाई शिरसाई योजनेची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ शकते या अनुषंगाने पाहणी दौरा केला आहे.
जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई होऊ देणार नाही
यावेळी जिरायती भागातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून समस्या देखील जाणून घेतल्या आहेत. यंदा जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई होऊ देणार नाही, असं आश्वासन युगेंद्र पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलं आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांसह राज्यभर शोक व्यक्त होत आहे. अजित पवार यांच्या विमानाचा नेमका अपघात झाला की घातपात होता याबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशातच पवार कुटुंबियांनी सर्व शंकांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. सर्वचजण अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यात आहेत. अजित पवार यांचा विमान अपघात होऊन आता एक महिना पूर्ण झालं आहे. त्यानंतर आता त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रीय होत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Yugendra Pawar: अजितदादांचं विमान पडलं तिकडे एकही मोठं झाड नाही, केवळ लहान झुडपं आहेत; युगेंद्र पवारांकडून डीजीसीएच्या रिपोर्टमधील चूक समोर आणली
महत्त्वाच्या बातम्या




















