एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

पालघर हत्याकांड प्रकरण : सीआयडीकडून चौकशी करण्यात आलेल्या 32 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणाचा जबाब नोंदवण्यात आला होता. मात्र सहभाग नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याची चौकशी करून सोडण्यात आलं होतं. परंतु, पोलिसांच्या भीतीनेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

पालघर : गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणात सीआयडीकडून चौकशी करण्यात आलेल्या 32 वर्षीय तरुणाने जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विणश धर्मा धांगडा असं या 32 वर्षीय तरुणाचं नाव असून आरोपी नसताना देखील पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप विणशच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

16 एप्रिलला पालघर मधील गडचिंचले येथे दोन साधूंची आणि त्यांच्या चालकाची चोर समजून जमावाकडून निघृन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सदर तपास आता सीआयडीकडे असून अनेकांचे जबाब घेण्याचं काम सुरु आहे. सदर प्रकरणात 11 मे रोजी चिंचपाडा येथील विणशचा जबाब घेण्यात आला होता. मात्र विणशचा या प्रकरणात सहभाग नसल्याचं लक्षात आल्याने त्याची चौकशी करून सोडण्यात आलं होतं. तरिही भीतीपोटी विणश मागील अनेक दिवसांपासून जंगलात जाऊन रहायचा. 5 जूनला विनय जंगलात गेला तो पुन्हा घरी आलाच नाही. त्यानंतर घरच्यांनी शोध घेतल्यानंतर विणशचा मृतदेह जंगलातील एका झाडाला लटकलेला आढळून आला. पोलिसांच्या भीतीने विणशने आत्महत्या केल्याचा आरोप विणशच्या कुटुंबीयांनी केला आहे.

निरक्षर असलेल्या विणशचं 12 वर्षांपूर्वी गावातील रशीदा नावाच्या मुलीसोबत लग्न झालं असून त्याला 4 मुलं आहेत. या चारही चिमुकल्याच्या डोक्यावरील बापाचं छत्र हरपलं आहे. अत्यंत हलकीच्या परिस्थिती असल्याने या मुलांचं संगोपन करायचं कसं असा प्रश्न सध्या त्यांच्या आई समोर उभा राहिला आहे. आरोपी भेटले नाही तर गावातील सर्वांना अटक करू असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत असल्याने विणशने हे पाऊल उचललं असल्याचं त्यांच्या पत्नीकडून सांगण्यात येतं आहे.

पाहा व्हिडीओ : पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे, घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद

साधूंसह तिघांची हत्या

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्‍या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 110 हल्लेखोरांना ताब्यात घेतलं होतं. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आलं होतं. पालघर पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. या प्रकारात अजूनपर्यंत 110 ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न आणि इतर कलमे लावण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या :

पालघर जमाव हत्याकांड : 101 आरोपींना पोलीस कोठडी; तर अल्पवयीन 9 जणांची बालसुधारगृहात रवानगी 

पालघर झुंडबळी प्रकरणी राज्य सरकारकडून सीलबंद अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर

पालघर प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी; उष्णतेमुळे अनेक वाहने पडली बंद 
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी; उष्णतेमुळे अनेक वाहने पडली बंद 
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकीकडे पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयाची चर्चा; दुसरीकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 6 उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध
एकीकडे पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयाची चर्चा; दुसरीकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात 6 उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
Bird flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
Embed widget