एक्स्प्लोर

हिटलरवरही पुस्तक लिहिण्याचा जितेंद्र आव्हाडांचा सल्ला, पुस्तकावर जयभगवान गोयल ठाम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामावर माझं नितांत प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आज नरेंद्र मोदी देशात काम करत आहेत. त्यामुळे मी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे, असं गोयल यांनी म्हटलं.

मुंबई : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेवरुन संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेही अवमान केलेला नाही. वाचकांनी पुस्तक आधी वाचावं आणि त्यानंतर काही बदल सुचवले तर मी नक्कीच बदल करेन, असं पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी म्हटलं आहे. जयभगवान गोयल एबीपी माझावर बोलत होते. गोयल यांनी हिटलरचं चरित्र वाचावं, म्हणजे काही वर्षांनी तुम्ही आणखी एखादं चांगलं पुस्तक लिहू शकाल, असा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सल्ला दिला.

लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामावर माझं नितांत प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आज नरेंद्र मोदी देशात काम करत आहेत. देशावरील दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करुन त्यांना धडा शिकवला. हे काँग्रेसला कधीही जमलं नाही. असं करुन मोदींनी जगाला भारताची ताकद दाखवून दिली. कलम 370, तिहेरी तलाक, नागरिकत्व दुरुस्ती कायदा असे महत्त्वाचे निर्णय घेऊन मोदींनी देशाला योग्य दिशा दिली आहे. त्यामुळे मी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे, असं गोयल यांनी म्हटलं.

पुस्तकातील मजकूर माझ्या वैयक्तिक भावना- गोयल

मी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी पुस्तकातील मजकूर माझ्या वैयक्तिक भावना आहेत. भारत लोकशाही राष्ट्र आहे. प्रत्येकाला आपल्या भावना मांडण्याचा अधिकार आहे. शरद पवारांना जाणता राजा म्हटलं जातं. मग ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना चालतं का? असा प्रतिप्रश्न गोयल यांनी जितेंद्र आव्हाडांना विचारला. यावर जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी शरद पवारांची करंगळी पकडून राजकारणात आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची तुलना होऊ शकत नाही. शरद पवार हे भारतीय राजकारणातील वरिष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील विकासात शरद पवारांचं योगदान मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जानता राजा म्हणून केवळ काही पुस्तके आणि कादंबऱ्यांमध्ये उल्लेख आहे. जाणता राजा ही केवळ उपाधी आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

महाराष्ट्रात कुणीही पुस्तक विकत घेणार नाही- जितेंद्र आव्हाड

जयभगवान गोयल यांची काहीही चूक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी केलेली तुलना योग्य आहे का? हे मोदींनी ठरवलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी आपली कुणाशी तुलना केलीय, आपण त्यासाठी लायक आहोत का? हे नेत्याला कळायला हवं. त्यांनी खरे शिवाजी महाराज ओळखलेच नाहीत. मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करुन गोयल यांनी मोठी चूक केली आहे. जनतेच्या भावना दुखावल्यामुळे राज्यातील भाजपला याची किंमत मोजावी लागणार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेवर माझा विश्वास आहे. राज्यात एकही पुस्तक विकलं जाणार नाही. महाराष्ट्रातील लोकांना काय वाचायचं काय नाही आणि काय विकयाचं व काय विकू द्यायचं नाही हे कळण्याइतकी अडाणी नाही. कुणीही हे पुस्तक विकत घेणार नाही.  असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget