एक्स्प्लोर

Independence Day : '... तर पुन्हा महाराष्ट्रात लॉकडाऊन!' मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे 

Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं. त्यावेळी त्यांनी जनतेला संबोधन केलं. 

मुंबई : महाराष्ट्रात उद्यापासून आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. मात्र कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. त्यामुळं काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपण निर्बंध शिथिल करतोय मात्र पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी आतापासून खबरदारी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं. त्यावेळी त्यांनी जनतेला संबोधन केलं. 

Independence Day : पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकरांचे आज स्मरण, देश या सर्वांचा ऋणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मु्द्दे 

छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचे आक्रमण परतवून लावत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजे रुजवली.परकीयांविरुद्ध आपण लढून जिंकू शकतो, आक्रमण परतवून लागू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवूनच नाही दिलं तर तसा विश्वासही आपल्याला दिला. 

शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्य, समता म्हणजे काय हे सांगितले, त्यांनी स्वातंत्र्याचे महत्व आपल्याला पटवून दिले.

केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे आपले कर्तव्य. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षांपासून अनुभवतो आहोत. आता आपण बरीच बंधने शिथिल करत आहोत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळलेले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी खबरदारी घ्या, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन

गेल्यावर्षी आणि या वर्षीही दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला, आता काही प्रमाणात औषधं उपलब्ध झाली असली तरी पण ऑक्सीजनची अजूनही  कमी आहे. ऑक्सीजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत.

ही शिथीलता आणत असलो तरी आपल्याला काळजी घेणे अत्यावश्यक आहे, त्यामुळे  कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे माझे नागरिकांना विनम्र आवाहन आवाहन आहे. ऑक्सीजन क्षमता लक्षात घेतली आणि रुग्णसंख्या वाढू लागली तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल.

या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक कोरोना योद्ध्यांनी दिवसरात्र संघर्ष केला.अनेकांना कोरोनाची बाधा झाली यात काहीजण बरे झाले काही जण दुर्देवाने शहीद झाले त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो.

राज्यात लसीकरणाने आता वेग घेतला आहे. कालच ९.५ लाख नागरिकांचे लसीकरण करून राज्याने देशात उच्चांक गाठला आहे. आपण जिद्दीने कोरोनाविरूद्ध लढत आहोत.

आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळालं, अनेकांच्या संघर्षातून आणि संकल्पातून उभ्या राहिलेल्या लोकचळवळीने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे.आज आपले हे स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी होत आहे. 

या निमित्ताने कोरोनापासून मी माझा देश, राज्य मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार असा निश्चय करूया.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: बीड पाठोपाठ धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टं मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं भोवलं, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं भोवलं, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Nashik News: आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनाचा वाद चिघळला, पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाण? स्थानिकांकडून गंभीर आरोप
नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनाचा वाद चिघळला, पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाण? स्थानिकांकडून गंभीर आरोप
Pune Bhor Crime: 'किरकोळ भांडणातून मला गोवलंय', नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीचा स्वत:च्या बचावासाठी धक्कादायक बनाव, न्यायालयात नेमकं काय घडलं?
'किरकोळ भांडणातून मला गोवलंय', नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीचा स्वत:च्या बचावासाठी धक्कादायक बनाव, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Yavatmal Water Crisis : तहानेनं व्याकूळ होऊन सहा वर्षीय मुलीचा मृत्यू? उष्मघाताचे कारण पुढे, पण डॉक्टरांनी फेटाळली शक्यता, यवतमाळच्या पारधी बेड्यावरील खळबळजनक घटना
तहानेनं व्याकूळ होऊन सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, उष्मघाताचे कारण पुढे, पण डॉक्टरांनी फेटाळली शक्यता, यवतमाळच्या पारधी बेड्यावरील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणर? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणर? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Embed widget