Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Sharad Ponkshe On Kerala Story 2: कायदेशीर अडचणी आणि राजकीय टीकेत अडकलेला हा सिनेमा सध्या भलताच चर्चेत आहे. यापूर्वी आलेल्या या सिनेमाचा प्रीक्वल 'द केरला स्टोरी' या सिनेमालाही टीकेचा सामना करावा लागलेला.

Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'द केरला स्टोरी 2' (Kerala Story 2) सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) सुरू झाल्यापासूनच या सिनेमावर वादळ घोंगावतंय. अशातच आता हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. कायदेशीर अडचणी आणि राजकीय टीकेत अडकलेला हा सिनेमा सध्या भलताच चर्चेत आहे. यापूर्वी आलेल्या या सिनेमाचा प्रीक्वल 'द केरला स्टोरी' या सिनेमालाही टीकेचा सामना करावा लागलेला. या सिनेमात केरळ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. तीन मुली धर्मांतराला कशा बळी पडतात? हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. हा सिनेमा द्वेष पसरवणारा असल्याचं केरळचे मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे. या सिनेमाविरोधात बरीच वक्तव्य व्हायरल होत असतानाच आता मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी मात्र, या सिनेमाची बाजू घेतली आहे.
'द केरला स्टोरी 2' पाहिल्यानंतर मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Marathi Actor Sharad Ponkshe) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी हिंदूंना हा सिनेमा पाहण्याचं आवाहन केलंय आणि हा सिनेमा समाजाचा 'आरसा' असल्याचं म्हटलं आहे. शरद पोंक्षे यांनी सिनेमाची कथा गंभीर आणि विचार करायला लावणारी असल्याचंही सांगितलं आहे.
View this post on Instagram
अभिनेते शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले?
मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. शरद पोंक्षे म्हणाले की, "नमस्कार! मी आताच 'द केरला स्टोरी 2' हा सिनेमा पाहिला. विपुल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, कामाख्या नारायण सिंह यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आहे. अप्रतिम सिनेमा…सुन्न करणारा सिनेमा… जगामध्ये असा एकमेव देश आहे जिथे बहुसंख्य हिंदू लोकांवर सातत्याने अत्याचार होतोय. आता या सिनेमाबद्दल कोणीही सेलिब्रिटी, हिंदी सिनेमातील मोठा स्टार बोलणार नाही. पण त्यांनी बोललं पाहिजे, प्रत्येकाने हा सिनेमा पाहिला पाहिजे. प्रत्येक हिंदू माणसाने आपल्या मुलांना हा सिनेमा दाखवावा. 'द केरला स्टोरी 2'सारखे आणखी सिनेमे आले पाहिजेत. सिनेमा हे अतिशय सशक्त माध्यम आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारं माध्यम आहे..."
'द केरला स्टोरी 2' सिनेमात दाखवलेल्या सगळ्या घटना या वास्तवतेला धरून आहेत. यातील एकही घटना काल्पनिक नाही. जे आजूबाजूला घडतंय किंवा घडलेलं आहे तेच त्यांनी दाखवलंय. हा सिनेमा सर्वांनी पहायला हवा.आपल्या मुलांना दाखवायला हवा सुन्न करणारा विचार करायला भाग पाडणारा. 'केरळा स्टोरी 2', असं शरद यांनी पुढे म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'मेंदुला किडे लागले,ते वागणं पाहून..' बिग बॉस मराठीविषयी बोलताना उषा नाडकर्णी स्पष्टचं म्हणाल्या...





















