एक्स्प्लोर

Abu Azmi on Vishalgad Riots : अबू आझमी अखेर विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचले, गजापूरच्या भेटीनंतर संभाजीराजेंना म्हणाले....

Abu Azmi on Vishalgad Riots : विशाळगडावर इतके गंभीर प्रकरण होऊन ज्यांना आम्ही मुस्लिम समाजाने मते दिली ते उद्धव ठाकरे, शरद पवार यावर काहीच बोलत नाही, याबाबतही अबू आझमी यांनी भाष्य केलं आहे.

Abu Azmi on Vishalgad Riots : राजर्षी शाहू महाराज यांनी सर्वात आधी आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये शाहू महाराज यांनी मुस्लिम समाजाचा देखील सहभाग करून घेतला होता. राजर्षी शाहूंनी समतेचा संदेश दिला होता. त्यांच्या नगरीमध्ये विशाळगड, गजापूरमध्ये दंगल (Vishalgad Riots) होणं हे अतिशय दुर्दैवी आहे, असंही समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

याबाबत राजर्षी शाहूंच्या वंशजांवर मी काही बोलणार नाही; पण त्यांच्या कुटुंबीयांनी आता सामाजिक सलोख्यासाठी शाहूंचा समतेच्या विचार देशभरात न्यावा, त्याचा प्रसार करावा, शाहू महाराज यांनी खूप मोठं काम केलं आहे. त्यांचे काम पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी करावं असं आवाहन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी गजापूरला भेट दिल्यानंतर कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

अबू आझमी (Abu Azmi) म्हणाले, विशाळगडावरील 144 कलम हटवून तेथील जनजीवन पूर्ववत करावं. गजापूरमधील नुकसानग्रस्तांना रोज एक हजार रुपयांप्रमाणे भरपाई द्यावी. पोलीस अधीक्षक समोर असताना त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलं आहे. सरकारने त्यांना तातडीने निलंबित केलं पाहिजे. शाहू महाराज यांच्या भूमीत असं घडत आहे हे योग्य नाही.संभाजी भिडे यांची 12 तारखेला होणारी सभा थांबवली पाहिजे. 14, 15, 16 तारखेला सरकाने कोणतीही कारवाई केली नाही. 144 कलम दूर केलं पाहिजे, त्याठिकाणी नागरिकांना येऊ दिलं पाहिजे.

संशयित आरोपींवर कलम साधी लावली आहेत. धर्मधर्मात आणि जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांवर दहशतवादी कलम लावा. जाणून बुजून मुस्लिम लोकांची घरं तोडली आहेत. काही लोक देशाला बरबादी कडे घेऊन जात आहेत, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

अतिक्रमण अनेक ठिकाणी झालं आहे. अनेक मोठ्या मोठ्या इमारती उभा राहिल्या आहेत. तिकडे कोण लक्ष देत नाही मात्र इकडे तोडफोड केली. कोणता कायदा आहे की त्यानुसार घर तोडली जातात. केवळ मुस्लिम लोकांची घरं तोडली जात आहेत. इंडिया आघाडीकडे अल्पसंख्याक लोकांची मतं गेली असं भाजप बोलत आहे. अल्पसंख्याक लोकांना घाबरवत असतील तर लोकं काय करतील असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

मते दिलेले ठाकरे, पवार काहीच बोलत नाहीत

विशाळगडावर इतकी गंभीर प्रकरणे होऊन मुस्लिम समाजाने मते दिली ते उद्धव ठाकरे, शरद पवार यावर काहीच बोलत नाहीत. मग आम्ही आता कोणाकडे जायचं. आम्हाला न्याय पाहिजे. सध्याचे सरकार द्वेष पसरविण्याचे काम करत आहे. काही लोक देशाला बर्बादीकडे घेऊन जात आहेत. इंडिया आघाडीकडे मागणी आहे की, मतांचे विभाजन होऊ नये यासाठी एकत्र बसून विधानसभा निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला विनंती आहे, असंही अबू आझमी (Abu Azmi) यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
Gokul Election: 'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Gokul Election: आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
Embed widget