एक्स्प्लोर

Power Crisis: कोळशाच्या तुटवड्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये वीजसंकट, रेल्वेने घेतला मोठा निर्णय

उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कोळशाचा मोठा तुटवडा भासत आहे.

Power Crisis : सध्या देशातील अनेक भागात विजेचं संकट निर्माण झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कोळशाचा मोठा तुटवडा भासत आहे. दरम्यान, वीज केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा लक्षात घेता रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांना प्रवासी गाड्यांच्या आधी ग्रीन सिग्नल देण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, देशात सध्य विजेची समस्या निर्माण झाली आहे. अनेक राज्यात भारनियमन सुरु करण्यात आले आहे. याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील भारनियमनाचा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. कोळशाचा तुटवडा झाल्याने विजेची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने कोळसा वाहून नेणाऱ्या गाड्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 28 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून 8 पॅसेंजर गाड्याही पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, विजेच्या संकटाच्या मुद्यावरुन विरोधक मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये केवळ 7 दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते. फेसबुकवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, भारतात विजेचा तुटवडा भासत आहे, सर्वसामान्यांना 8 तास वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत इशारा दिला होता असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे कोळशाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, 106 पैकी 105 कोळसा प्रकल्प कोळशाच्या साठ्याच्या बाबतीत गंभीर स्थितीत आहेत. त्यामध्ये 25 टक्क्यांपेक्षाही कमी साठा शिल्लक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

केवळ चारच तास वीजपुरवठा : अखिलेश यादव

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील विजेच्या मुद्यावरुन मोदी सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. गावांमध्ये 20 तास वीजपुरवठी होत असल्याचा दावा केला जात आहे, मात्र, केवळ 4 तास वीजपुरवठा होत असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. वीज खंडित झाल्यामुळे यूपीमधील गावागावांमध्ये परीक्षार्थींमध्ये नाराजी वाढत आहे. घरातील वृद्ध आणि महिला उष्णतेमुळे हैराण आहेत. तसेच वीज खंडित झाल्यामुळे रुग्णालयातील आजारी लोक, तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरांना त्रास सहन करावा लागत आहे. दुकाने आणि कारखान्यांवरही वीज नसल्यामुळे परिणाम जाला आहे. त्यामुळे भाजप सरकारने उत्तर प्रदेशसाटी वीज खरेदी करावी अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Beed Special Report आष्टी मतदारसंघात लक्ष घालणार, Pankaja Munde यांची घोषणा, मुंडे वि. धस वाद पेटला
Maharashtra Politics : निवडणुकांची लगबग; कुठे तारखांचा अंदाज, कुठे गाऱ्हाणं Special Report
Maharashtra : सत्याचा मोर्चानंतर गुन्हे दाखल करण्यावरुन राजकीय नाट्याचा दुसरा अंक Special Report
Voter List Row: 'वोट चोरी'च्या आरोपांवरून Thackeray-BJP आमनेसामने, Ashish Shelar गौप्यस्फोट करणार?
Phaltan Doctor Case: 'तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय?', SIT वरून मेहबूब शेख यांचा 'देवाभाऊं'ना थेट सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget