एक्स्प्लोर

9 तारखेला केंद्र सरकार कृषि कायद्याबाबत मोठा निर्णय घेणार?

शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत पाच बैठका कुठल्याही तोडग्याविनाच संपल्या आहेत.आता पुढची बैठक 9 डिसेंबरला ठरली आहे. या बैठकीत सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरचं शेतकरी आंदोलन आता अकराव्या दिवसात पोहचलं आहे. सरकार कायद्यातल्या काही बदलांसाठी तयार झाल्याचे संकेत मिळत आहेत तर शेतकरी संघटना मात्र कायदा मागेच घ्यावा यासाठी आक्रमक आहेत. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये पाचवी बैठकही कुठल्या तोडग्याविनाच संपली. आता पुढच्या बैठकीची तारीख ठरली आहे 9 डिसेंबर, दुपारी 12 वाजता. या बैठकीत सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काल पाच तास झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये किती अविश्वासाचं वातावरण होतं हे समोर आलं. हो किंवा नाही, असं सरकारी फाईलींच्या मागे लिहिलेले फलक शेतकऱ्यांनी भर बैठकीतच हातात घेतले होते. जवळपास अर्धा तास त्यांनी हे मौन धारण केलं होतं. हातावर घडी तोंडावर बोट अशी काहीशी ही स्थिती होती. त्यामुळे बैठक पाच तास चालली तरी त्यातून ठोस असं काही हाती आलंच नाही.

बैठकीत दोन वेळा अशी स्थिती आली की शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी बहिष्कार टाकायच्या स्थितीत होते. सरकारकडून त्याच त्याच मुद्द्यांवर चर्चा होत असल्यानं आता आम्हाला अधिक रस नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. सरकारनं 9 पॉईंटसवर प्रश्नोत्तर स्वरुपात समाधान करण्याचा प्रयत्न केला. मागच्या दोन बैठकांमधले कामकाजाचे तपशील लिखित स्वरुपात घेतले. काही मुद्द्यांवर लवचिकता दाखवायचाही प्रयत्न केला. पण शेतकरी संघटनाचे नेते कायदा मागे घेण्यावर ठाम होते.

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडू यांचे नौटंकी आंदोलन : भाजप

दुपारी दोन वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री सात वाजेपर्यंत चालली. बैठकीदरम्यान सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वासाची दरी किती रुंदावली आहे याचं चित्र पुन्हा पाहायला मिळालं. शेतकऱ्यांनी सलग तिसऱ्या बैठकीत सरकारचं मीठ खायचं नाही हा इरादा कायम ठेवला. गुरुद्वारामधून आलेल्या लंगरवरच आपली भूक भागवली.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला एका विशिष्ठ वर्तुळातून बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. पण, या बैठकीदरम्यान सरकारच्या मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं कौतुकही केलं. हे आंदोलन कसं शांततेत चालू आहे, कुठलीही हिंसा यात होत नाहीय याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.

जे सरकार सुरुवातील या विधेयकाचं ठामपणे समर्थन करत होतं. ते आता विधेयकाच्या बदलासाठीही मान्य होण्यापर्यंत आलं आहे. बैठकीसाठी पुढची तारीख 9 डिसेंबर ठरलेली आहे. त्याच्या आधी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला भारत बंदचं आवाहन केलं आहे. सरकारही कदाचित आंदोलनाची ताकद जोखून पाहतंय. त्यामुळेच या बंदचा प्रभाव किती पडतो, आंदोलन किती निर्धारानं चालतं, यावर सरकार आणखी किती झुकणार हे स्पष्ट होईल.

Akali Dal Meet CM Uddhav Thackeray | अकली दलाच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी; तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून निधी मंजूर
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी; तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून निधी मंजूर
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
Ajit Pawar Case Zero FIR: कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे, बनावट कागदपत्र...अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटकने दाखल केलेल्या FIR मध्ये काय काय?
कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे, बनावट कागदपत्र...अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटकने दाखल केलेल्या FIR मध्ये काय काय?
Ahmedabad Flight Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर सरकारी अधिकाऱ्याकंडून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, चहा-नाश्त्याचं 16 लाखांचं बिल मंजूर केलं
अहमदाबाद विमान अपघातानंतर सरकारी अधिकाऱ्याकंडून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, चहा-नाश्त्याचं 16 लाखांचं बिल मंजूर केलं

व्हिडीओ

Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro tunnel: वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?
वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?
Stock Market : मार्केट सुरु होताच गुंतवणूकदारांची 400000 कोटींची कमाई, बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा ट्रेंड
मार्केट सुरु होताच गुंतवणूकदारांची 400000 कोटींची कमाई, बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा ट्रेंड
Gold Rate : सोने चांदीच्या दरामध्ये अनपेक्षित ट्रेंड, सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
Ashok Kharat Snake: सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
Ashok Kharat Case: अशोक खरातने शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलं, एकाचा घातपात, तिघांनी आयुष्यच संपवलं?
अशोक खरातने शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलं, एकाचा घातपात, तिघांनी आयुष्यच संपवलं?
Sachin Goswami Post On Ashok Kharat Case: 'प्रयत्ने चिंचोकी घासता...', प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची नराधम अशोक खरातवर फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
'प्रयत्ने चिंचोकी घासता...', प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची नराधम अशोक खरातवर फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
Gopichand Padalkar and Jayant Patil: जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
जयंत पाटलांना अशोक खरातने रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप
Embed widget