एक्स्प्लोर

9 तारखेला केंद्र सरकार कृषि कायद्याबाबत मोठा निर्णय घेणार?

शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आतापर्यंत पाच बैठका कुठल्याही तोडग्याविनाच संपल्या आहेत.आता पुढची बैठक 9 डिसेंबरला ठरली आहे. या बैठकीत सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरचं शेतकरी आंदोलन आता अकराव्या दिवसात पोहचलं आहे. सरकार कायद्यातल्या काही बदलांसाठी तयार झाल्याचे संकेत मिळत आहेत तर शेतकरी संघटना मात्र कायदा मागेच घ्यावा यासाठी आक्रमक आहेत. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये पाचवी बैठकही कुठल्या तोडग्याविनाच संपली. आता पुढच्या बैठकीची तारीख ठरली आहे 9 डिसेंबर, दुपारी 12 वाजता. या बैठकीत सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काल पाच तास झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये किती अविश्वासाचं वातावरण होतं हे समोर आलं. हो किंवा नाही, असं सरकारी फाईलींच्या मागे लिहिलेले फलक शेतकऱ्यांनी भर बैठकीतच हातात घेतले होते. जवळपास अर्धा तास त्यांनी हे मौन धारण केलं होतं. हातावर घडी तोंडावर बोट अशी काहीशी ही स्थिती होती. त्यामुळे बैठक पाच तास चालली तरी त्यातून ठोस असं काही हाती आलंच नाही.

बैठकीत दोन वेळा अशी स्थिती आली की शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी बहिष्कार टाकायच्या स्थितीत होते. सरकारकडून त्याच त्याच मुद्द्यांवर चर्चा होत असल्यानं आता आम्हाला अधिक रस नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. सरकारनं 9 पॉईंटसवर प्रश्नोत्तर स्वरुपात समाधान करण्याचा प्रयत्न केला. मागच्या दोन बैठकांमधले कामकाजाचे तपशील लिखित स्वरुपात घेतले. काही मुद्द्यांवर लवचिकता दाखवायचाही प्रयत्न केला. पण शेतकरी संघटनाचे नेते कायदा मागे घेण्यावर ठाम होते.

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडू यांचे नौटंकी आंदोलन : भाजप

दुपारी दोन वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री सात वाजेपर्यंत चालली. बैठकीदरम्यान सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वासाची दरी किती रुंदावली आहे याचं चित्र पुन्हा पाहायला मिळालं. शेतकऱ्यांनी सलग तिसऱ्या बैठकीत सरकारचं मीठ खायचं नाही हा इरादा कायम ठेवला. गुरुद्वारामधून आलेल्या लंगरवरच आपली भूक भागवली.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला एका विशिष्ठ वर्तुळातून बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. पण, या बैठकीदरम्यान सरकारच्या मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं कौतुकही केलं. हे आंदोलन कसं शांततेत चालू आहे, कुठलीही हिंसा यात होत नाहीय याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.

जे सरकार सुरुवातील या विधेयकाचं ठामपणे समर्थन करत होतं. ते आता विधेयकाच्या बदलासाठीही मान्य होण्यापर्यंत आलं आहे. बैठकीसाठी पुढची तारीख 9 डिसेंबर ठरलेली आहे. त्याच्या आधी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला भारत बंदचं आवाहन केलं आहे. सरकारही कदाचित आंदोलनाची ताकद जोखून पाहतंय. त्यामुळेच या बंदचा प्रभाव किती पडतो, आंदोलन किती निर्धारानं चालतं, यावर सरकार आणखी किती झुकणार हे स्पष्ट होईल.

Akali Dal Meet CM Uddhav Thackeray | अकली दलाच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीवर तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, 7 दिवसात नेमकं काय काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीवर तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, 7 दिवसात नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेलच्या किंमती मे महिन्यात तिसऱ्यांदा वाढल्या, जाणून घ्या कारणं, आतापर्यंत किती दर वाढले?
पेट्रोल डिझेलच्या किंमती मे महिन्यात तिसऱ्यांदा वाढल्या, जाणून घ्या कारणं, आतापर्यंत किती दर वाढले?
कधी बुलेटसवारी, कधी वंदे भारतने प्रवास; नरेंद्र मोदींच्या आवाहनास मुख्यमंत्री देवाभाऊंचा असाही प्रतिसाद
कधी बुलेटसवारी, कधी वंदे भारतने प्रवास; नरेंद्र मोदींच्या आवाहनास मुख्यमंत्री देवाभाऊंचा असाही प्रतिसाद
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
IPL Playoffs: आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
Devendra Fadnavis on Petrol Diesel: देशात तिसऱ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश
पेट्रोल-डिझेलची भाववाढ, शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, फडणवीसांनी ती गोष्ट हेरली, म्हणाले, काहीतरी गडबड
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
Embed widget