एक्स्प्लोर

ABP Opinion Poll: अर्थसंकल्पामुळे पाच राज्यात भाजपाला फायदा होईल का? जनतेनं दिलं चकित करणारं उत्तर

ABP CVoter Survey for Election 2022 : उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान मंगळवारी केद्रीय मंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला.

ABP CVoter Survey for Election 2022 : उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान मंगळवारी केद्रीय मंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाला पुढील 25 वर्षाचा ब्लू प्रिंट असल्याचं सांगितलं. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत आहेत. पण पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे भाजपला फायदा होईल का? हा प्रश्न सर्वांना पडला असेल. त्यामुळेच एबीपीने सी वोटरच्या माध्यमातून सर्व्हे घेत जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज सी वोटरच्या माध्यमातून वारंवार पाच राज्यातील जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. दैनिक आणि साप्ताहिक सर्व्हेच्या माध्यमातून विविध विषयावर जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अशातच आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाबाबतची एबीपीने जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे भाजपला फायदा होईल का? असा प्रश्न विचारत लोकांचा कौल जाणून घेतला आहे. यामध्ये जनतेनं चकीत करणारी उत्तरं दिली आहेत.  

पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे भाजपला फायदा होईल का? या प्रश्नावर 45 टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले आहे. तर 39 टक्के लोकांना पाच राज्यात भाजपला या अर्थसंकल्पाचा फायदा होणार नसल्याचे वाटतेय. तर 16 टक्के लोकांनी माहित नसल्याचे उत्तर दिलेय. 

अर्थसंकल्पामुळे पाच राज्यात भाजपाला फायदा होईल का?
होय - 45 टक्के
नाही -39 टक्के
माहित नाही -16 टक्के

दरम्यान,  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे, तर काही नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे समर्थन केले आहे. या अर्थसंकल्पावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. या अर्थसंकल्पाने जनतेची निराशा केली असल्याचे केजरीवाल म्हणालेत. केजरीवाल यांनी ट्वीट करत अर्थसंकल्पावर टीका केली आहे. सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटात अर्थसंकल्पातून जनतेला दिलासा मिळेल असे वाटत होते, मात्र, अर्थसंकल्पातून जनतेची निराशा झाली असल्याचे केजरीवाल म्हणाले. सामान्य जनतेसाठी या अर्थसंकल्पात काहीही करण्यात आले नाही. भाजपच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे, तर विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी देखील या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget