एक्स्प्लोर

प्रहारच्या आंदोलनाचे पुण्यात पडसाद, अजित पवारांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची घोषणाबाजी; बच्चू कडूंचा सरकारला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, रोजचं मारण्यापेक्षा..

Bacchu Kadu Protest : माझ्या शरीरावर आता परिणाम होतोय. मात्र हे रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असे म्हणत माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडूंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय.

Bacchu Kadu Protest : सरकार समिती गठित करणार आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित केलेली नाही. समितीचा अहवाल नेमका किती दिवसात येईल? दिव्यांगांच्या मानधनात नेमकं किती वाढ केलं जाणार, हे ही सरकारनं सांगावं. किंबहुना कार्यकर्त्यांना आमचं आवाहन आहे सरकार आता बोलू लागलं आहे, त्यामुळे 2-3 तास धीर धरावा. मला दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. कारण आता शरीरावर परिणाम होतोय. मात्र हे रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असे म्हणत माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडूंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

16 तारखेपासून अन्नत्याग सोबत पाणी सुद्धा पिणं बंद करू- बच्चू कडू

प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. तर बच्चू कडू अन्नत्याग उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनस्थळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपोषणस्थळी भेट देणार आहेत. काल(13 जून) अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील बच्चू कडूंची भेट घेतली होती. यावेळी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं, अशी विनंती बावकुळेंनी केली होती. मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावर ठाम आहेत. बावनकुळेंनी कडूंची मुख्यमंत्र्यांशीही चर्चा घडवून आणली. यावेळी कडूंच्या पत्नी नयना कडू भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांनी एक दिवस उपवास करावा आणि मग अमृता वहिनींची काय स्थिती होते ते पहावं, असं आव्हान नयना कडूंनी केलंय.

शेतकऱ्यांची अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी 

अशातच  या आंदोलनांचे पडसाद आज पुण्यात देखील पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली, यावेळी मोठा गोंधळ झाला, बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी अजित पवारांचे भाषण सुरू होताच अमरावतीच्या शेतकऱ्यांनी जाब विचारला, यावेळी महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात अचानक गोंधळ उडाला. बच्चू कडू यांच्या उपोषणावरून आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसले.

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? 

खरं तर सरकारकडून या मागण्यांवर लवकर निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र दिवसेदिवस वेळ जात आहे. 90% कर्जमाफी बद्दल जे सरकार बोलत होतं, ते कधी पर्यंत करणार? मुख्यमंत्री म्हणतात बैठकी घ्या. मात्र त्यावर तोडगा नेमका काय हे ही सरकारनं सांगावे असेही बच्चू कडू म्हणाले. आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहे. पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे, असे समजतंय. मात्र कार्यकर्ते त्यात कुठेही कमी पडणार नाही. असेही बच्चू कडू म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज परत फोन आला, पण मला अजूनही लेखी पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की, 16 तारखेपासून मी अन्नत्याग सोबत पाणी सुद्धा पिणं बंद करणार. उद्या 15 तारखेला राज्यभरात चक्काजाम आंदोलन आहे की नाही, त्यावर मी दुपारी बैठक घेऊन निर्णय घेणार. नयना कडू यांचं कालच्या भाषणावर बच्चू कडू म्हणाले की, एक पत्नी म्हणून तो राग आहे. 

महत्वाच्या बातम्या:

बच्चू कडूंच्या आंदोलनाला जरांगे पाटलांची साथ, 15 जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला
Kolhapur Crime: 'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
'ग्रोबझ'चा 280 कोटींचा घोटाळा आणि चार्जशीटमध्ये फक्त 12 कोटींचा उल्लेख का? कोल्हापूर सर्किट बेंचकडून तत्कालिन एसपी महेंद्र पंडितांसह तपास अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Buldhana Crime News: बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता, टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या अन्...; बुलढाण्यातील खळबळजनक घटना
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Nanded Crime: सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget