Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावरराज्यातील विविध शिक्षक संघटनांकडून आज टीईटी परीक्षा सक्ती विरोधात आंदोलन करण्यात आलं
तुमची आमची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना स्वतःला मात्र परीक्षा द्यायची नाहीये. टीईटी परीक्षेच्या सक्तीच्या विरोधात आज राज्यभरामधले शिक्षक रस्त्यावरती उतरले. मात्र मुख्याध्यापकाच्या भूमिकेमध्ये असलेल्या सरकारन कोणतीही भूमिका घेतली नाहीय. त्यामुळे आंदोलनाचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, अहिल्यानगर आणि या अनेक ठिकाणी तुमच्या लेकरांचे सर आणि मॅडम म्हणजे. रस्त्यावर उतरले होते. खरं तर शिक्षक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांची गुणवत्ता ठरवतात मात्र स्वतःवर जेव्हा टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी अभ्यास करून परीक्षा देण्याऐवजी आंदोलनाचा पवित्रा घेतला. 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सर्व शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा सक्तीची केली आहे. या विरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षकांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय शिक्षकांच्या इतर मागण्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूय. टीईटीच्या सक्ती विरोधात फेरविचार याचिका दाखल करावी. 2024 मान्यता धोरण रद्द करावं. शिक्षक सेवक योजना बंद करून नियमित भरती करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्काल भरती सुरू करावी. शिक्षकेतरांनाही जुनी पेन्शन लागू करावी. कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत. शिक्षकांनाही 10- 20 30 वर्षानंतरची सुधारित तीन वेतन लाभाची योजना लागू करावी. विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी. खऱ्या अर्थाने टीईटी बंधनकारक आली आणि त्यानंतरचे जे शिक्षक नेमले गेले ते टीईटी पात्रच आहेत. परंतु त्याच्या पूर्वीचे जे शिक्षक नेम. ते त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले आहेत आणि त्यावेळेच्या पात्रतेनुसार नेमलेले असल्यामुळेच त्यांना खऱ्या अर्थाने या टीईटीच्या परीक्षेतून मोकळी दिली पाहिजे कारण आता या वयामध्ये अभ्यास करायचा की विद्यार्थ्यांच्याकडे आम्ही लक्ष द्यायचा असा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे खऱ्या अर्थान आम्ही या टीईटीच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मुळाशी घाव घालण्याचा हा प्रयत्न आहे कारण शिक्षक हा मूळ आहे समाज घडवणं देश घडवणं राज्य घडवण्याच काम शिक्षक करतो आणि त्यालाच अस अशासकीय कामातून जर अडचणीत आणलं तर तो विद्यार्थ्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. सरकारने विचार केला पाहिजे, शिक्षका फक्त शिकवण्यासाठीच असला पाहिजे, इतर कामे जी आहेत शिक्षकांची ती बंद झाली पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर शिक्षक भरतीसाठी समान निकष असले पाहिजेल, तसच शिक्षक म्हणून किमान गुणवत्ता सिद्ध करता आली पाहिजेल हा टीईटी परीक्षेमागचा मुख्य हेतू आहे. टीईटी परीक्षेला विरोध करणाऱ्या शिक्षकांचा स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास नाही का? असा सवाल काही तज्ञांनी उपस्थित केला आहे. बंदमध्ये सहभागी झाल्यास एक दिवसाच वेतन कापण्यात येईल असा इशारा शिक्षण विभागाने दिला होता. मात्र शिक्षकांनी त्या इशाऱ्याला केराची टोपली दाखवली आहे. हिवाळी अधिवेशना दरम्यान राज्य सरकारने या सगळ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. तर हिवाळी अधिवेशन सुरू होताच विविध शिक्षक संघटनांच्या शिष्य मंडळाला शिक्षण मंत्री चर्चेला बोलावणार असल्याचं समजते. तेव्हा हिवाळी अधिवेशनात शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का? हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई.























