एक्स्प्लोर

Movie Review : 'कूळंगल'... 'खडे'तर प्रवास

कौटुंबिक हिंसाचार, शिक्षणाचा अभाव, ग्रामीण भागातले कच्चे रस्ते, पाण्याचं दुर्भिक्ष, गरीबीतून आलेलं कुपोषण, अशिक्षितपणामुेळे वाढलेला अविवेक असे अनेक पदर या सिनेमाला आहेत.

उजाड माळरानावर शुष्क फुफाट्यात चार सहा फुटाच्या खड्ड्यातलं गढूळ पाणी एक म्हातारी घागरीत भरत आहे. हे दृश्य पाहून आपल्याला म्हातारीची दया येते. तेवढ्यात कॅमेरा वाईड होतो आणि जे चित्र दिसतं ते बघून तुम्ही हलून जाता. तिथे शेजारी आणखी आठ दहा बायका रिकाम्या घागरी घेऊन बसलेल्या असतात. ती दृश्य स्क्रीनवर गायब होत जातात. पण म्हातारीच्या घोट घोटभर पाणी घागरीत ओतण्याचा आवाज येत राहतो. इथेच सिनेमा संपतो. 

'कूळंगल' ही एका कुटुंबाची कथा. दारूच्या नशेत रोज मारझोड करणाऱ्या नवऱ्याला कंटाळून माहेरी निघून गेलेल्या महिलेची गोष्ट, आईला परत आणण्यासाठी बापासोबत पायपीट करणाऱ्या आणि लहानपण हरवलेल्या मुलाची गोष्ट. बायकोला पायातली वाहान समजणाऱ्या पुरूषी अहं दुखावल्यानं सुडानं पेटून उठलेल्या मस्तवाल नवऱ्याची गोष्ट. ही बाई या नवऱ्याला कंटाळून अनेकवेळा माहेरी गेलेली आहे. हा सिनेमा तिच्या वैराण आयुष्यातला एक कोरडा दिवस आहे. अत्यंत साध्या सरळ पद्धतीनं आपल्यासमोरून सिनेमा सरकत जातो. ओढून ताणून समस्या अधोरेखित करण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही. शोधाल तेवढे सामाजिक प्रश्न प्रत्येक फ्रेममधून दिग्दर्शक विनोथराज मांडत जातात. 

शीघ्रकोपी बाप गणपती आणि मुलगा वेलू यांचा हा  एक प्रवास आहे. तमिळनाडूच्या मदुरईजवळच्या अरिट्टपटी या दुर्गम गावातली ही कथा केवळ प्रातिनिधीक आहे. गणपती आणि एका व्यक्तीचं बसमध्ये जोरजोरात भांडण होतं. गाडीमध्ये आपल्या चिमुकलीला घेऊन प्रवास करणारी महिला दाखवली आहे. त्या गोंधळाचा छोट्या बाळाला त्रास होतो. नंतर ती महिला मध्येच बसमधून उतरून जाते. अत्यंत प्रभावी दृश्यांमधून महिलांचं समाजातलं स्थान दिग्दर्शक दाखवतो. याच बसमध्ये पाण्यानं भरलेल्या तीन घागरी घेऊन प्रवास करणारी म्हातारी दिसते. 

 दुसरीकडे आग ओकणाऱ्या उन्हात खडकाळ भागात उंदिर पकडून आपलं उदरभरण करणारं कुटुंब मूळ कथेसोबत जोडलं जातं. परतीच्या प्रवासात वेलूची शिक्षिका स्वतः दुचाकी चालवत येते, मागे तिचा पती बसलेला दाखवलाय. गणपतीला सांगून ते दोघे वेलूला गाडीवर बसवून घरापर्यंत सोडतात. शिक्षणातून स्वावलंबी असलेली महिला दाखवून समाजातली वैचारीक दरी या दृश्यातून दिग्दर्शक मांडतो. अर्थात यातही तो काही लादत नाही. प्रत्येकानं त्या कृतीचा आपापला अर्थ काढावा इतकी सहजता या सिनेमात आहे. 

कौटुंबिक हिंसाचार, शिक्षणाचा अभाव, ग्रामीण भागातले कच्चे रस्ते, पाण्याचं दुर्भिक्ष, गरीबीतून आलेलं कुपोषण, अशिक्षितपणामुेळे वाढलेला अविवेक असे अनेक पदर या सिनेमाला आहेत. सगळ्या फ्रेम्सवर साज चढवलाय युवान शंकर राजा यांच्या संगितानं. सिनेमॅटोग्राफर विग्नेश कुमुलई आणि जेया पार्थिबन यांचं विशेष कौतूक वाटतं, कारण हा सिनेमा त्यांच्या नजरेचा आहे. गणपतीच्या भूमिकेत कुरूथथंडैय्या आणि वेलूच्या भूमिकेत छेल्लापंडी या बालकलाकारानं अजिबातच अभिनय न केल्यानं हा सिनेमा अधिक खरा वाटतो.

तमिळ सिनेमाची वैभवशाली परंपरा आहे. मनोरंजनमुल्य अबाधित ठेवून सामाजिक प्रश्नांची अलगद उकल करण्यात तमिळ सिनेमा कायम अग्रेसर राहिलाय. कूळंगल कदाचित तुमचं मनोरंजन करणार नाही, मुळात तो मनोरंजनासाठी पाहूच नये. कुठलाही संवाद नसलेली लांबलचक दृश्यं बघून तुम्हाला कंटाळा येईल. काटे, दगड, फुफाटा, माती, रापलेले चेहरे, डोळ्यांना सुखावणारं एकही चित्र तुम्हाला बघायला मिळणार नाही. कूळंगल हा प्युअर सिनेमा आहे. सिनेमा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात. कूळंगल बघितल्यावर ते पटतं. पहिलाच सिनेमा असूनही तद्दन व्यावसायिक सिनेमा न बनवता काहीतरी क्रांतीकारी करून पाहणाऱ्या दिग्दर्शक विनोथराज अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहे. माझी अत्यंत आवडती अभिनेत्री नयनथारा आणि तिचा पती विग्नेश शिवान यांना या सिनेमाची निर्मिती व्हावी असं वाटणं हे सिनेजगासाठी शुभसंकेत आहेत. देशविदेशातले फिल्म फेस्टिव्हल्स गाजवल्यानंतर, भारताकडून यंदाच्या ऑस्करसाठी 'कूळंगल'ची निवड झालीय. अभिनंदन टीम 'कूळंगल'

अमोल किन्होळकर यांचे इतर लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा... 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | 'अनैतिक' कट, संतोष देशमुख प्रकरणावरून वर्दीवर आरोप Special ReportDevendra Fadnavis on MLA's Security | आमदारांची सुरक्षा घटली, कुणाकुणाची सटकली? Special ReportSambhajiRaje Wikipedia | छत्रपती संभाजीराजेंवरील विकीपीडियावरचा मजकूर कुणी बदलला?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.