एक्स्प्लोर

Relationship Tips : रिलेशनशिपमुळे येतोय तणाव? मानसिक स्थितीवर कसा परिणाम होतोय? कसे टाळावे? 

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये असताना चिंता निर्माण होऊ शकते. ज्याला रिलेशनशिप एंग्जायटी असे म्हणतात. याला सामोरे जाण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

Relationship Tips : कोणत्याही नात्याचा धागा हा नाजूक असतो, नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. आणि नातं म्हटलं म्हणजे जोडीदारांच्या एकमेकांकडून अपेक्षा आणि तडजोड ही आलीच. त्यामुळे कोणतेही नाते पूर्णपणे परिपूर्ण नसते. कारण प्रत्येक नात्यात चढ-उतार असतात. पण एकमेकांचा आधार आणि विश्वास कायम राखणे महत्त्वाचे आहे. काहीवेळा नात्यात चढ-उतार इतके होतात, की ते चिंता आणि तणाव निर्माण करतात, ज्याला रिलेशनशिप एंग्जायटी असे म्हणतात. या काळात व्यक्ती नेहमी आपल्या नात्याबद्दल चिंताग्रस्त राहतो. शिवाय, त्याच्या मनात सतत प्रश्न येत असतात. जसे की 'आपले नाते टिकेल का?, माझा जोडीदार नेहमी माझ्यावर प्रेम करेल का? आपण वेगळे होऊ का? वैगेरे वैगेरे... बऱ्याच वेळा या गोष्टी माणसावर इतक्या वर्चस्व गाजवू लागतात, की त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. आज हा विषय सविस्तरपणे समजून घेऊया आणि जाणून घेऊया नातेसंबंधांच्या चिंतेचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

 

नात्यात चिंता असणे सामान्य आहे?

नातेसंबंधाची चिंता पूर्णपणे सामान्य आहे, कारण जेव्हा तुम्ही नवीन रिलेशनमध्ये असता तेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतात. तसेच, ही चिंता बहुधा नात्याच्या सुरुवातीला दिसून येते. जर एखाद्या व्यक्तीला बऱ्याच वर्षांनंतरही रिलेशनची चिंता असेल तर ती काही भूतकाळातील अनुभवाशी संबंधित असू शकते. पण जर वेळोवेळी चिंता वाढत गेली तर त्यामुळे रिलेशनशिपमध्ये समस्याही वाढू शकतात.

 

जोडीदारांच्या मनात कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात?

अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराबद्दल शंका, त्याला गमावण्याची भीती, त्याच्या भावनांबद्दल संभ्रम अशा भावना येऊ लागतात. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या मनात असे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात -
मी माझ्या जोडीदारासाठी योग्य आहे का?
मला माझ्या जोडीदारासाठी काही फरक पडतो का?
त्याला माझ्याबद्दल भावना आहेत का?
हे नाते जास्त काळ टिकेल का?

 

नात्यात चिंता वाढण्याची कारणं कोणती असू शकतात?


नातेसंबंधात चिंता वाटणे हे मागील काही वाईट अनुभवामुळे देखील असू शकते. व्यक्तीला त्याच्या जोडीदाराबद्दल आत्मविश्वास नसणे किंवा स्वतःवर कमी विश्वास असणे हे देखील कारण असू शकते. याशिवाय वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही समस्यांमुळेही नात्यांबाबत मनात चिंता निर्माण होऊ शकते.

 

रिलेशनशिप एंग्जायटीचा सामना कसा करावा?

असे प्रश्न तुमच्या मनात का येत असतील तर एकमेकांचे विचार समजून घ्या, यामुळे तुमची समस्या सोडवण्यास मदत होईल.
तुमच्या जोडीदारापासून तुमच्या भावना लपवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि तुमच्या समस्या सांगा.
एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोला, जो तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला समजतो.
तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर रिलेशनशिप एक्सपर्टशी बोला.

 

 

हेही वाचा>>>

Relationship Tips : नात्यात तणाव असूनही महिला का जपतात नातं? कितीही झालं तरी वेगळ्या होत नाहीत? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Embed widget