एक्स्प्लोर

Relationship Tips : रिलेशनशिपमुळे येतोय तणाव? मानसिक स्थितीवर कसा परिणाम होतोय? कसे टाळावे? 

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये असताना चिंता निर्माण होऊ शकते. ज्याला रिलेशनशिप एंग्जायटी असे म्हणतात. याला सामोरे जाण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

Relationship Tips : कोणत्याही नात्याचा धागा हा नाजूक असतो, नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. आणि नातं म्हटलं म्हणजे जोडीदारांच्या एकमेकांकडून अपेक्षा आणि तडजोड ही आलीच. त्यामुळे कोणतेही नाते पूर्णपणे परिपूर्ण नसते. कारण प्रत्येक नात्यात चढ-उतार असतात. पण एकमेकांचा आधार आणि विश्वास कायम राखणे महत्त्वाचे आहे. काहीवेळा नात्यात चढ-उतार इतके होतात, की ते चिंता आणि तणाव निर्माण करतात, ज्याला रिलेशनशिप एंग्जायटी असे म्हणतात. या काळात व्यक्ती नेहमी आपल्या नात्याबद्दल चिंताग्रस्त राहतो. शिवाय, त्याच्या मनात सतत प्रश्न येत असतात. जसे की 'आपले नाते टिकेल का?, माझा जोडीदार नेहमी माझ्यावर प्रेम करेल का? आपण वेगळे होऊ का? वैगेरे वैगेरे... बऱ्याच वेळा या गोष्टी माणसावर इतक्या वर्चस्व गाजवू लागतात, की त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. आज हा विषय सविस्तरपणे समजून घेऊया आणि जाणून घेऊया नातेसंबंधांच्या चिंतेचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

 

नात्यात चिंता असणे सामान्य आहे?

नातेसंबंधाची चिंता पूर्णपणे सामान्य आहे, कारण जेव्हा तुम्ही नवीन रिलेशनमध्ये असता तेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतात. तसेच, ही चिंता बहुधा नात्याच्या सुरुवातीला दिसून येते. जर एखाद्या व्यक्तीला बऱ्याच वर्षांनंतरही रिलेशनची चिंता असेल तर ती काही भूतकाळातील अनुभवाशी संबंधित असू शकते. पण जर वेळोवेळी चिंता वाढत गेली तर त्यामुळे रिलेशनशिपमध्ये समस्याही वाढू शकतात.

 

जोडीदारांच्या मनात कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात?

अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराबद्दल शंका, त्याला गमावण्याची भीती, त्याच्या भावनांबद्दल संभ्रम अशा भावना येऊ लागतात. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या मनात असे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात -
मी माझ्या जोडीदारासाठी योग्य आहे का?
मला माझ्या जोडीदारासाठी काही फरक पडतो का?
त्याला माझ्याबद्दल भावना आहेत का?
हे नाते जास्त काळ टिकेल का?

 

नात्यात चिंता वाढण्याची कारणं कोणती असू शकतात?


नातेसंबंधात चिंता वाटणे हे मागील काही वाईट अनुभवामुळे देखील असू शकते. व्यक्तीला त्याच्या जोडीदाराबद्दल आत्मविश्वास नसणे किंवा स्वतःवर कमी विश्वास असणे हे देखील कारण असू शकते. याशिवाय वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही समस्यांमुळेही नात्यांबाबत मनात चिंता निर्माण होऊ शकते.

 

रिलेशनशिप एंग्जायटीचा सामना कसा करावा?

असे प्रश्न तुमच्या मनात का येत असतील तर एकमेकांचे विचार समजून घ्या, यामुळे तुमची समस्या सोडवण्यास मदत होईल.
तुमच्या जोडीदारापासून तुमच्या भावना लपवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि तुमच्या समस्या सांगा.
एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोला, जो तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला समजतो.
तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर रिलेशनशिप एक्सपर्टशी बोला.

 

 

हेही वाचा>>>

Relationship Tips : नात्यात तणाव असूनही महिला का जपतात नातं? कितीही झालं तरी वेगळ्या होत नाहीत? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Embed widget