एक्स्प्लोर

कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!

सध्या अनेकांना कमी वयातच पांढऱ्या केसांचा सामना करावा लागतो. फक्त प्रौढ लोकांनाच नाहीतर अनेक तरूणांनाही या समस्यांचा सामना करावा लागतो. कामाचा व्याप आणि त्यामुळे वाढणारा तणाव हे यामागील सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई : सध्या अनेकांना कमी वयातच पांढऱ्या केसांचा सामना करावा लागतो. फक्त प्रौढ लोकांनाच नाहीतर अनेक तरूणांनाही या समस्यांचा सामना करावा लागतो. कामाचा व्याप आणि त्यामुळे वाढणारा तणाव हे यामागील सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. तणावामुळे अनेकांना तर कमी वयातच या समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया अशा काही कारणांबाबत ज्यांमुळे कमी वयातच पांढऱ्या केसांच्या समस्यांचा समान करावा लागतो. तसेच यांपासून बचाव करण्याच्या काही उपायांबाबत... वाढणारा तणाव सर्वात मोठं कारण केस पांढरे होण्याचं सर्वात मोठं कारण वाढणारा तणाव आहे. कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात. सतत विचार केल्यामुळे मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो. याच कारणामुळे कमी वयातच लोकांना केस पांढरे होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी शक्यतो स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण तणावामुळे किंवा डिप्रेशनमुळे पांढऱ्या केसांसोबतच इतरही आजारांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे व्हिटॅमिन्सची कमतरता आपल्या शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला अनेक व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. व्हिटॅमिन्स शरीरासोबतच केसांचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतात. काही मेडिकल जर्नल्समध्ये यावर रिसर्च करण्यात आलेला आहे आणि त्याच आधारावर असं सांगण्यात येतं की, सुंदर केसांसाठी व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ईची आवश्यकता असते. केसांना तेल न लावणं सध्याच्या फॅशन युगात खासकरून तरूण-तरूणींना केसांना तेल लावायला अजिबात आवडत नाही. परंतु, केसांचं आरोग्य राखण्यासाठी आणि त्यांचं सौंदर्य टिकवण्यासाठी केसांना तेल लावणं आवश्यक असतं. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात तेल लावत नसाल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावून झोपू शकता. आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावून मालिश करा. यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि त्यांचं सौंदर्य टिकवण्यासही मदत होते. झोपेची कमतरता कमी झोप घेतल्यामुळे केसांच्या वाढिवर त्याचा परिणाम होतो आणि केस गळण्यास सुरुवात होते. तुम्हाला जर चांगले आणि सुंदर केल पाहिजे असतील तर पुरेशी झोपं घेणं गरजेचं असतं. कमी झोप घेणं हे तणावाचंही कारण ठरू शकतं आणि आधी सांगितल्यानुसार, तणावामुळे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढते. खोबऱ्याचे तेल फक्त केस आणि त्वचेसाठी नाहीतर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर; जाणून घ्या कसं? अनुवंशिक कारण अनेकदा अनुवंशिक कारणांमुळेही केसांवर परिणाम होतो आणि कमी वयातच केस पांढरे होतात. जर तुमच्या परिवारातील कोणाचे केस वेळेआधीच पांढरे झाले असतील किंवा केस गळत असतील तर तुमचेही केस पांढरे होऊ शकतात. केस पांढरे होण्यासाठी जर अनुवंशिक कारणं असतील तर यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागते. तसेच आहारातही पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा लागेल. धुम्रपान किंवा मद्यसेवन अनेकदा कमी वयात केस पांढरे होण्यासाठी धुम्रपान आणि मद्यसेवन या गोष्टी कारणीभूत ठरतात. केमिकलयुक्त उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर अनेकदा आपण जाहिरातींना बळी पडून केमिकल युक्त उत्पादनांचा वापर करतो. या परिणामांमुळे केसांच्या वाढिवर परिणाम होतो आणि केसांचा रंगही पांढरा होतो. त्यामुळे केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करणं शक्यतो टाळा. टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
Embed widget