एक्स्प्लोर

Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला

नाटकाचा प्रयोग चालू असताना शरद पोंक्षे अचानक संवाद विसरल्याची घटना घडली. या प्रसंगानंतर नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला.

मुंबई : मराठी रंगभूमी मोठ समृद्ध आहे. कलाकारांनी आतापर्यंत मराठी रसिकांना अनेक दर्जेदार नाटक दिलेले आहेत. कसलेल्या अभिनेत्यांमुळे काही नाटकं तर अजरामर झाली आहेत. महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे. हीच परंपरा आज अनेकजण पुढे घेऊन जात आहेत. दरम्यान, सध्या पुरुष या नाटकाचे प्रयोग चालू आहेत. या प्रयोगादरम्यान एक अजब प्रकार घडला आहे. नाटक चालू असताना दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे चक्क संवाद विसरल्याची घटना घडली. त्यानंतर हा प्रयोग रद्द करण्यात आला. 

नेमकं काय घडलं? 

पुरुष या नाटकाच्या प्रयोगादरम्यान शरद पोंक्षे संवाद विसरले. हा प्रसंग श्रुती आगाशे हिने सांगितला आहे. या प्रसंगाचा अनुभव तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. नाटकाचा प्रयोग चालू असताना शरद पोंक्षे चक्क संवाद विसरले. त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांना थोडा वेळ मागितला. नंतर प्रयोग रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. 

मला थोडा वेळ द्याल का?

श्रुती आगाशे हिच्या सांगण्यांनुसार संवाद विसरल्यानंतर 'रसिकहो मी ब्लँक झालो आहे. मला काहीच आठवत नाहीये. मला थोडा वेळ द्याल का?' अशी विचारणा शरद पोंक्षे यांनी केली. त्यानंतर प्रेक्षकांनीही कोणतेही आढेवेढे न देता पोंक्षे यांच्या विनंतीला मान देत टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंत काही वेळाने हा प्रयोग रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. 

शरद पोंक्षे यांना भावना अनावर

पुढे प्रेक्षकांच्या आग्रहानंतर शरद पोक्षे हे मंचावर आले आणि त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी रसिकांची संवाध साधताना शरद पोंक्षे यांना भावना अनावर झाल्या. त्यांना रडू कोसळलं. माझ्या 40 वर्षांच्या कारकि‍र्दीत असं पहिल्यांदाच झालं, असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही कोणतीही तक्रार न करता प्रयोग रद्द झाल्याचं समजल्यानंतर नाटकाच्या संपूर्ण टीमला पुढील प्रयोगासाठी शुभेच्छा दिल्या. कोणतीही तक्रार केली नाही.

शरद पोंक्षे प्रेक्षाकांशी संवाद साधत होते तेव्हा त्यांचामुलगा स्नेह पोंक्षे हादेखील त्यांच्या बाजूला उभा होता. दरम्यान, या प्रसंगानंतर महाराष्ट्रात नाटक या कलाकृतीसंदर्भात लोकांना किती आदर आहे. तसेच राज्यातील प्रेक्षकवर्ग किती संवेदनशील, जागृत आणि कलाकारांचा मान ठेवणारा आहे, हे पुन्हा एकदा यातून सिद्ध झाल्याचं म्हटलं जातंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shruti Agashe (@subakthengani)

स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणारं नाटक

पुरूष हे नाटक 40 वर्षांनंतर रंगभूमीवर आलं आहे. नाटककार जयवंत दळवी यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. स्त्री-पुरष संबंधांवर भाष्य करणारं हे नाटक आहे. पुरुषप्रधान मानसिकतेवर या नाटकात भाष्य करण्यात आलेलं  आहे. शरद पोंक्षे या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

Suresh Dhas : प्राजक्ताताईंची प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांनी भाजपमधून कुणाचा फोन आला ते सांगितलं, म्हणाले...

वर्षातला सर्वांत वादग्रस्त चित्रपट आता ओटीटीवर येणार, जाणून घ्या नेमका कुठे आणि कधी पाहता येणार?

2023 मध्ये रिलीज झालेल्या साऊथ फिल्मनं सालार, डंकीला दिलेली टक्कर; पण कॉन्ट्रोवर्सीमुळे हिरो जेलमध्ये गेला अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Marathi Film Festival: मराठी सिने चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुण्यात 3 दिवस रंगणार मराठी फिल्म फेस्टिव्हल, दिग्गज कलाकारांसह क्लासिक चित्रपटांची मेजवानी
मराठी सिने चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुण्यात 3 दिवस रंगणार मराठी फिल्म फेस्टिव्हल, दिग्गज कलाकारांसह क्लासिक चित्रपटांची मेजवानी
Shehnaaz Gill Affair Roumers with RCB Player: शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट
शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट
Dhurandhar 2 OTT Release: प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज? प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज? प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
संजय दत्तला झटका; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित 'आखरी सवाल ' चित्रपटावर रिलीजपूर्वीच 'UAE'त बंदी! नेमकं कारण काय?
संजय दत्तला झटका; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित 'आखरी सवाल ' चित्रपटावर रिलीजपूर्वीच 'UAE'त बंदी! नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget