एक्स्प्लोर

पूरपरिस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणींमुळे अंतिम वर्षांची परीक्षा देता न आलेल्यांना 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा संधी

पूरपरिस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणींमुळे अंतिम वर्षांची परीक्षा देता न आलेल्यांना 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा देता येणार आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची कुलगुरुंसोबतच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र, पूरपरिस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणी अनेक विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांची परीक्षा देता आली नाही. अशा विद्यांर्थ्यांची 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा घेणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. सोबत सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. शुक्रवारी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बैठकी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परीषदेत दिली.

मुंबई, पुणे, अमरावती, सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांना अडचणींना समोरे जावं लागलं ही बाब लक्षात आली आहे. काही प्रमाणात आढावा घेताना कळलं की परीक्षा घेताना त्रुटी राहिल्यात. पूरपरिस्थिती, कोव्हीडमुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे ज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा देता आल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या 10 नोव्हेंबर पूर्वी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यांचे निकाल सुद्धा लवकरात लवकर जाहीर होतील, असेही सामंत म्हणाले.

परीक्षांचं काम दिलेल्या कंपन्यांमुळे गोंधळ : मंत्री सामंत

मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षेदरम्यान जो सायबर हल्ला झाला त्याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली आहे. अमरावती विद्यापीठ दरम्यान जो परिक्षेबाबत गोंधळ झाला. त्यामध्ये परीक्षांचं काम दिलेल्या कंपनीने सहकार्य न केल्याने हा गोंधळ झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे.

भाजप सरकरच्या काळातील विद्यापीठ कायद्यात त्रुटी : सामंत

भाजप सरकरच्या काळात 2016 साली विद्यापीठ कायदा तयार करण्यात आला. त्यामध्ये अनेक कुलगुरूंनी काही त्रुटी सांगितल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही समिती स्थापन केली आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे, त्यांची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी, अडचणी दूर होतील यासाठी हा अहवाल हिवाळी अधिवेशनाआधी समोर येईल आणि या त्रुटी दूर केल्या जातील.

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या 20 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर! लवकरच बाकी विषयांचेही रिझल्ट लागणार

अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशबाबत AICTE ने दिलेल्या सूचनेनुसार 1 डिसेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करायचे आहेत. मात्र, हे राज्यातील विद्यापीठांच्या हातात आहे. जर 1 डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर आम्ही युजीसीकडे वेळ मागवून घेऊ. फॅक्ट फायन्डिंग कमिटी तयार करून याबाबत चौकशी केली जाणार असून ज्या कंपन्यांमुळे तांत्रिक अडचणीला विद्यार्थ्यना समोरे जावे लागले त्या कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पूरपरिस्थितीमुळे सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जात आहे. त्यासाठी आणखी दोन दिवस रजिस्ट्रेशनसाठी देण्यात आले असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

Amravati University | परीक्षेतील घोळानंतर अमरावती विद्यापीठाच्या कारभारावर टीकास्त्र

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget