एक्स्प्लोर

kharif sowing : अहमदनगर जिल्ह्यात 2 लाख 8 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण, अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.

kharif sowing : यंदा राज्यात चांगला मान्सून होईल अशा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात 2 लाख 8 हजार हेक्टवर पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. यात सर्वाधिक 61 हजार हेक्टरवर कपाशी तर 49 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती करुन पेरण्या सुरु केल्या आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, अशा ठिकाणी पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर चांगला पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्यानं पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.
यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्यानं ऐनवेळी अडचण नको म्हणून नगरच्या कृषी विभागानं खरीप हंगामाची जोरदार तयारी केली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी 4 लाख 47 हजार हेक्टर क्षेत्र 

अहमदनगर  जिल्ह्यात खरिपाचे 4 लाख 47 हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. मागील वर्षी देखील 5 लाख 31 हजारांहून अधिक क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी झाल्याची आकडेवारी आहे. त्यामुळं यंदा कृषी विभागानं जोरदार तयारी केली आहे. कृषी विभागाने खरीपासाठी 6 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यासाठी 70 हजार 21 क्विंटल  बियाणांची मागणी कृषी विभागाने केली होती. प्रत्यक्षात आतापर्यंत 39 हजार 158 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून यातील 20 हजार 504 क्विंटल बियाणांची विक्री देखील झाली आहे. 

जिल्ह्यात 'या' बियाणांची अधिक मागणी

अहमदनगर  जिल्ह्यात खरीपात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी यांच्या बियाणांची अधिक मागणी असते. सध्या जिल्ह्यात ज्वारी 58 क्विंटल, बाजरी 2 हजार 464, मका 2 हजार 106, तूर 923, मूग 746, उडिद 4 हजार 647,भात 4 हजार 102, सुर्यफुल 20, सोयाबिन 22 हजार 465, कापूस 1 हजार 627 असे 39 हजार 158 क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

 जिल्ह्यात खतांची मागणी 

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 2 लाख 75 हजार 505 क्विंटल रासायनिक खतांची मागणी झाली होती. यात सरकारकडून 2 लाख 25 हजार 500 क्विंटल रासायनिक खतांच्या आवंटनला मंजूरी देण्यात आली होती. तर 63 हजार 535 क्विंटल खते शिल्लक होती. जिल्ह्यासाठी 63 हजार 216 क्विंटल खते उपलब्ध झाली असून, मागील वर्षीचा साठा आणि उपलब्ध साठा असा जिल्ह्यात 1 लाख 29 हजार 781 क्विंटल खतांचा साठा उपलब्ध असून, यातील 67 हजार 196 क्विंटल खतांची विक्री झालेली आहे.

हेक्टरनिहाय पेरणी पूर्ण

भात 84 हेक्टर, ज्वारी 40, तूर 15 हजार 128, मूग 23 हजार 682, उडिद 21 हजार 491,बाजारी 24 हजार 588, नागली 4, मका 8 हजार 60, इतर खरीप कडधान्य 4 हजार 110, भूईमूग 13, तीळ 4, सुर्यफूल 110, सोयाबिन 49 हजार 27 आणि कापूस 61 हजार 96, चारा पिक 18 हजार 972 हेक्टर अशी पेरणी झालेली आहे.

महत्वाच्या बातम्या:

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Embed widget