एक्स्प्लोर

kharif sowing : अहमदनगर जिल्ह्यात 2 लाख 8 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण, अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.

kharif sowing : यंदा राज्यात चांगला मान्सून होईल अशा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात 2 लाख 8 हजार हेक्टवर पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. यात सर्वाधिक 61 हजार हेक्टरवर कपाशी तर 49 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती करुन पेरण्या सुरु केल्या आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, अशा ठिकाणी पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर चांगला पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्यानं पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.
यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्यानं ऐनवेळी अडचण नको म्हणून नगरच्या कृषी विभागानं खरीप हंगामाची जोरदार तयारी केली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी 4 लाख 47 हजार हेक्टर क्षेत्र 

अहमदनगर  जिल्ह्यात खरिपाचे 4 लाख 47 हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. मागील वर्षी देखील 5 लाख 31 हजारांहून अधिक क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी झाल्याची आकडेवारी आहे. त्यामुळं यंदा कृषी विभागानं जोरदार तयारी केली आहे. कृषी विभागाने खरीपासाठी 6 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यासाठी 70 हजार 21 क्विंटल  बियाणांची मागणी कृषी विभागाने केली होती. प्रत्यक्षात आतापर्यंत 39 हजार 158 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून यातील 20 हजार 504 क्विंटल बियाणांची विक्री देखील झाली आहे. 

जिल्ह्यात 'या' बियाणांची अधिक मागणी

अहमदनगर  जिल्ह्यात खरीपात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी यांच्या बियाणांची अधिक मागणी असते. सध्या जिल्ह्यात ज्वारी 58 क्विंटल, बाजरी 2 हजार 464, मका 2 हजार 106, तूर 923, मूग 746, उडिद 4 हजार 647,भात 4 हजार 102, सुर्यफुल 20, सोयाबिन 22 हजार 465, कापूस 1 हजार 627 असे 39 हजार 158 क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

 जिल्ह्यात खतांची मागणी 

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 2 लाख 75 हजार 505 क्विंटल रासायनिक खतांची मागणी झाली होती. यात सरकारकडून 2 लाख 25 हजार 500 क्विंटल रासायनिक खतांच्या आवंटनला मंजूरी देण्यात आली होती. तर 63 हजार 535 क्विंटल खते शिल्लक होती. जिल्ह्यासाठी 63 हजार 216 क्विंटल खते उपलब्ध झाली असून, मागील वर्षीचा साठा आणि उपलब्ध साठा असा जिल्ह्यात 1 लाख 29 हजार 781 क्विंटल खतांचा साठा उपलब्ध असून, यातील 67 हजार 196 क्विंटल खतांची विक्री झालेली आहे.

हेक्टरनिहाय पेरणी पूर्ण

भात 84 हेक्टर, ज्वारी 40, तूर 15 हजार 128, मूग 23 हजार 682, उडिद 21 हजार 491,बाजारी 24 हजार 588, नागली 4, मका 8 हजार 60, इतर खरीप कडधान्य 4 हजार 110, भूईमूग 13, तीळ 4, सुर्यफूल 110, सोयाबिन 49 हजार 27 आणि कापूस 61 हजार 96, चारा पिक 18 हजार 972 हेक्टर अशी पेरणी झालेली आहे.

महत्वाच्या बातम्या:

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरणू हांडे अपहरण प्रकरण! कोर्टात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद, 'टाईम गॅप'वरुन पोलिसांबाबत सवाल
शरणू हांडे अपहरण प्रकरण! कोर्टात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद, 'टाईम गॅप'वरुन पोलिसांबाबत सवाल
Pune Rave Party and Pranjal Khewalkar:  प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र
प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र
Dadar Kabutar Khana : दादरचा कबुतरखाना बंद झाला पण पक्ष्यांना खाणं पुरवण्यासाठी जैन समाजाकडून खास सोय, 12 कार सतत फिरत्या ठेवणार, नेमका काय प्रकार?
दादरचा कबुतरखाना बंद झाला पण पक्ष्यांना खाणं पुरवण्यासाठी जैन समाजाकडून खास सोय, 12 कार सतत फिरत्या ठेवणार, नेमका काय प्रकार?
Delhi : दिल्लीत झोपडपट्ट्यांवर 100 फुटी भिंत कोसळली, दोन चिमुरड्यांसह आठ जणांचा मृत्यू
दिल्लीत झोपडपट्ट्यांवर 100 फुटी भिंत कोसळली, दोन चिमुरड्यांसह आठ जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरणू हांडे अपहरण प्रकरण! कोर्टात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद, 'टाईम गॅप'वरुन पोलिसांबाबत सवाल
शरणू हांडे अपहरण प्रकरण! कोर्टात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद, 'टाईम गॅप'वरुन पोलिसांबाबत सवाल
Pune Rave Party and Pranjal Khewalkar:  प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र
प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र
Dadar Kabutar Khana : दादरचा कबुतरखाना बंद झाला पण पक्ष्यांना खाणं पुरवण्यासाठी जैन समाजाकडून खास सोय, 12 कार सतत फिरत्या ठेवणार, नेमका काय प्रकार?
दादरचा कबुतरखाना बंद झाला पण पक्ष्यांना खाणं पुरवण्यासाठी जैन समाजाकडून खास सोय, 12 कार सतत फिरत्या ठेवणार, नेमका काय प्रकार?
Delhi : दिल्लीत झोपडपट्ट्यांवर 100 फुटी भिंत कोसळली, दोन चिमुरड्यांसह आठ जणांचा मृत्यू
दिल्लीत झोपडपट्ट्यांवर 100 फुटी भिंत कोसळली, दोन चिमुरड्यांसह आठ जणांचा मृत्यू
Solapur Crime Sharnu Hande: अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला ‘तो’ वाद, पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला शरणू हांडेचा जीव, अपहरणाचा थरारक प्रसंग, नेमकं काय घडलं?
अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला ‘तो’ वाद, पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला शरणू हांडेचा जीव, अपहरणाचा थरारक प्रसंग, नेमकं काय घडलं?
Who Is Haider Ali : इंग्लंडमध्ये महिलेवर अत्याचार, पोलिसांनी थेट मैदानातून उचलला, क्रिकेटला कलंक लावणारा 'तो' पाकिस्तानी खेळाडू कोण?
इंग्लंडमध्ये महिलेवर अत्याचार, पोलिसांनी थेट मैदानातून उचलला, क्रिकेटला कलंक लावणारा तो पाकिस्तानी खेळाडू कोण?
Dadar Kabutar Khana: कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार, मनीषा कायंदे भडकल्या, म्हणाल्या, 'यांचा इगो हर्ट...'
कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार, मनीषा कायंदे भडकल्या, म्हणाल्या, 'यांचा इगो हर्ट...'
ICICI Bank : आयसीआयसीआय बँकेनं नियम बदलला, खात्यात किमान 50 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार, नियम कुणाला लागू?
आयसीआयसीआय बँकेत मिनिमम बॅलन्स रक्कम वाढवली, 10 हजार नव्हे खात्यात 50 हजार शिल्लक ठेवावे लागणार
Embed widget