एक्स्प्लोर

Agriculture News : अमरावतीत नाफेडकडून हरभरा खरेदी बंद, शेतकरी अडचणीत, बच्चू कडूंनी मांडली भूमिका  

सध्या हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण नाफेडकडून होणारी खरेदी बंद केली आहे.

Agriculture News : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यांची लगबग सुरु होते ती खरीप पेरणीची. पण यासाठी शेतकऱ्यांना पैश्यांची गरज असते. मात्र, सध्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने ते अडचणीत आले आहे. कारण या शेतकऱ्यांचा हरभरा घरातच पडून आहे. नाफेडचं पोर्टल बंद झाल्यानं खरेदी बंद झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावर सरकारनं तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जर खरेदी होत नसेल तर हरभरा आणि धान उत्पादकांना सरकारनं मदत करावी अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी : बच्चू कडू

सध्या धान आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारने जे खरेदीचे लक्षांक दिले ते कमी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. पण आता केंद्र सरकारने खरेदीसाठी हात वर केले आहेत. धान उत्पादक शेतकरी देखील 4 ते 5 लाख असून केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहेत. केंद्र सरकारने खरेदी सुरु करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. खरेदी होत नसेल तर किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

आता काय करायचं? शेतकऱ्यांपुढे प्रश्न

अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील चिंचपूर येथील अभिजित लांबाडे यांच्याकडे 5 एकर शेती आहे. त्यांनी पाच एकरात हरबरा लागवड केली होती. त्यामध्ये त्यांना 30 क्विंटल हरभरा झाला. यासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला. हाच हरभरा विकून त्यांना आईचे उपचार आणि खरीप पेरणी करायची आहे. त्यामुळं त्यांनी नाफेडमध्ये 5 मे रोजी नोंदणी केली होती. 2 जून रोजी त्यांना हरभरा घेऊन या म्हणून मॅसेज आला. पण त्याच दिवशी त्यांना फोन आला की पोर्टल बंद असल्यानं पुढील आदेशापर्यंत आणू नका असं त्यांना सांगण्यात आलं आहे. आता काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. हीच परिस्थिती जवळा पट येथील पराग राऊत यांची आहे. पराग राऊत यांनी तर आपलं 70 क्विंटल हरभरा वाहनात भरला होता. पण त्यांनाही फोन आला की, पोर्टल बंद असल्याने हरभरा आणू नका. पराग राऊत यांच्याकडे 20 एकर शेती आहे. त्यापैकी त्यांनी 10 एकरात हरभरा लागवड केली. यामधून त्यांना 70 क्विंटल हरभरा झाला पण आता या हरभऱ्याचे करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला आहे.

दरम्यान, सध्या बाजारात हरभऱ्याच दर 4 हजार 100 रुपये क्विंटल आहे, तर नाफेडमध्ये याचं दर 5 हजार 250 रुपये आहे. त्यामुळं शेतकरी इथंच हरभरा विकण्यासाठी प्राधान्य देत आहेत. पण सरकारच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आता यावर राज्यमंत्री बच्चू कडूच काही करु शकतात अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parrot Crop Damage: पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
पोपटांनी डाळिंबांचा फडशा पाडला, हायकोर्टात तब्बल 10 वर्ष खटला चालला, अखेर शेतकरी जिंकला, फडणवीस सरकारला भरपाई देण्याचे आदेश
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांचा पाठिंबा, शेतकऱ्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता, मागण्या काय?
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील केंद्र चालकांचा पाठिंबा, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
साताऱ्याच्या घाट परिसरात शेतकऱ्यानं फुलवली सफरचंद बाग, राज्यभर गाजतोय प्रयोग, बाग पाहण्यासाठी मोठी गर्दी
साताऱ्याच्या घाट परिसरात शेतकऱ्यानं फुलवली सफरचंद बाग, राज्यभर गाजतोय प्रयोग, बाग पाहण्यासाठी मोठी गर्दी

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Embed widget