एक्स्प्लोर

Agriculture News : अमरावतीत नाफेडकडून हरभरा खरेदी बंद, शेतकरी अडचणीत, बच्चू कडूंनी मांडली भूमिका  

सध्या हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण नाफेडकडून होणारी खरेदी बंद केली आहे.

Agriculture News : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यांची लगबग सुरु होते ती खरीप पेरणीची. पण यासाठी शेतकऱ्यांना पैश्यांची गरज असते. मात्र, सध्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने ते अडचणीत आले आहे. कारण या शेतकऱ्यांचा हरभरा घरातच पडून आहे. नाफेडचं पोर्टल बंद झाल्यानं खरेदी बंद झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावर सरकारनं तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जर खरेदी होत नसेल तर हरभरा आणि धान उत्पादकांना सरकारनं मदत करावी अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी : बच्चू कडू

सध्या धान आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारने जे खरेदीचे लक्षांक दिले ते कमी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. पण आता केंद्र सरकारने खरेदीसाठी हात वर केले आहेत. धान उत्पादक शेतकरी देखील 4 ते 5 लाख असून केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहेत. केंद्र सरकारने खरेदी सुरु करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. खरेदी होत नसेल तर किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

आता काय करायचं? शेतकऱ्यांपुढे प्रश्न

अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील चिंचपूर येथील अभिजित लांबाडे यांच्याकडे 5 एकर शेती आहे. त्यांनी पाच एकरात हरबरा लागवड केली होती. त्यामध्ये त्यांना 30 क्विंटल हरभरा झाला. यासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला. हाच हरभरा विकून त्यांना आईचे उपचार आणि खरीप पेरणी करायची आहे. त्यामुळं त्यांनी नाफेडमध्ये 5 मे रोजी नोंदणी केली होती. 2 जून रोजी त्यांना हरभरा घेऊन या म्हणून मॅसेज आला. पण त्याच दिवशी त्यांना फोन आला की पोर्टल बंद असल्यानं पुढील आदेशापर्यंत आणू नका असं त्यांना सांगण्यात आलं आहे. आता काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. हीच परिस्थिती जवळा पट येथील पराग राऊत यांची आहे. पराग राऊत यांनी तर आपलं 70 क्विंटल हरभरा वाहनात भरला होता. पण त्यांनाही फोन आला की, पोर्टल बंद असल्याने हरभरा आणू नका. पराग राऊत यांच्याकडे 20 एकर शेती आहे. त्यापैकी त्यांनी 10 एकरात हरभरा लागवड केली. यामधून त्यांना 70 क्विंटल हरभरा झाला पण आता या हरभऱ्याचे करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला आहे.

दरम्यान, सध्या बाजारात हरभऱ्याच दर 4 हजार 100 रुपये क्विंटल आहे, तर नाफेडमध्ये याचं दर 5 हजार 250 रुपये आहे. त्यामुळं शेतकरी इथंच हरभरा विकण्यासाठी प्राधान्य देत आहेत. पण सरकारच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आता यावर राज्यमंत्री बच्चू कडूच काही करु शकतात अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Embed widget