एक्स्प्लोर

चार दिवस आंदोलन करुनही दखल घेतली नाही, वीज वितरण कंपनीच्या विरोधातील आंदोलन स्थगित

वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई बंद करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे गेल्या चार दिवसापासून आंदोलन सुरू होते. अखेर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

Farmers Agitation : वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई बंद करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे गेल्या चार दिवसापासून आंदोलन सुरू होते. चार दिवसानंतर अखेर हे आंदोलन आज स्थगित करण्यात आले आहे. वीज पुरवठा खंडीत करण्यास मात्र आमचा विरोध कायम सुरुच राहील अशी माहिती  स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेचे दहन करुन आंदोलनाची सांगता करण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई बंद करावी, वाढीव बिले दुरुस्त करून द्यावीत, शेतीसाठी पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा व शेतकर्‍यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. 1 फेब्रुवारीपासून हे राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरु होते. चार दिवस आंदोलन करूनही शासनाने आंदोलकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेचे दहन करुन आंदोलनाची सांगता करण्यात आली. 

वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी, विज पुरवठा खंडीत करण्याला मात्र विरोध सुरूच राहणार असल्याचे घनवट यांनी सागितले. शासन शेतीमालाचे भाव पाडून शेतकर्‍यांना उणे अनुदान देते, त्यामुळे शेतकरी सरकारचे देणे लागत नाही. राज्य शासन वीज पुरवठ्यासाठी जितके अनुदान देते तितकीही वीज शेतीसाठी दिली जात नाही, म्हणून शेतकरी वीज वितरण कंपनीचे देणे लागत नाही. शेती पंपांना वाढीव बिले देऊन शेतकरी व राज्य सरकार दोघांनाही वीज वितरण कंपनीने लुटले आहे. सर्व बिले दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. वीज पुरवठा खंडित करण्याअगोदर 15 दिवस शेतकर्‍याला नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र, नोटीस न देताच वीज पुरवठा खंडित करून कंपनीने कायद्याचा भंग केला असल्याचे घनवट म्हणाले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच शेतकर्‍यांवर दाखल केलेलेले खोटे गन्हे मागे घ्यावेत या आंदोलकांच्या मागण्या होत्या.

सरकारने आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्र्यांच्या पतुळ्यांचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी वीज पुरवठा खंडित करण्यास शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचा विरोध कायम राहणार आहे. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करून शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तीव्र विरोध केला जाईल. प्रसंगी शेतकर्‍यांना कायदा हातात घेण्याची वेळ आली तरी मागेपुढे पाहू नये असे शेतकर्‍यांना आवाहन घनवट यांनी केले. 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Jayakwadi Dam Water Storage: मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 
मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 
TV Oldest Show: दूरदर्शनवरील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा टीव्ही शो; तब्बल 59 वर्षांपासून लोकप्रिय, देशाचे चित्रच बदलले!
दूरदर्शनवरील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा टीव्ही शो; तब्बल 59 वर्षांपासून लोकप्रिय, देशाचे चित्रच बदलले!
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 

व्हिडीओ

Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Shetkari Karjmafi: कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ; यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेतही तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ; यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेतही तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Embed widget