एक्स्प्लोर

Union Budget 2022 : हा अर्थसंकल्प शेतीला अधोगतीकडे घेऊन जाणारा, शेतकरी संघटनांची टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर शेतकरी नेत्यांनी टीका केलीय. या अर्थसंकल्पातून शेती क्षेत्राला काहीच मिळाले नसल्याचे स्वतंत्र भारत पक्षाचे प्रमुख अनिल घनवट म्हणाले.

Union Budget 2022 India: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांकडून केंद्र सरकारचे सरर्थन होत आहे. तर काही जणांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे प्रमुख अनिल घनवट यांनी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीच मिळाले नसल्याचे घनवट यांनी म्हटले आहे. देशातील शेतीला अधोगतीकडे घेऊन जाणारे निर्णय या अर्थसंकल्पात घेतले असल्याचे घनवट म्हणाले.

नेमकं काय म्हणाले घनवट?

पंजाबच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे या अर्थसंकल्पावर हमीभावाच्या मुद्यावर भर दिला आहे. ही खरेदी आत्तापर्यंत चालूच होती. पंजाबला गहू आणि तांदूळ सोडून इतर पिकाकडे वळवण्याची गरज असल्याचे घनवट म्हणाले. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी देशात सेंद्रीय शेतीच केली जात होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई होती. अमेरिकेकडून धान्य आयात करावे लागत होते. पुन्हा तिकडेच देशाला घेऊन जायचे आहे का? असा सवाल घनवट यांनी केला आहे. श्रीलंकेने रासायनिक खतांवर बंदी घातली, त्यामुळे त्यांचे 60 टक्के उत्पादन घटले. त्यामुळे त्यांना परदेशातून अन्न आयात करावे लागले, खते खरेदी करावी लागली. त्या दिशेनेच आपला देश जातो की काय अशी शंका वाटत असल्याचे घनवट म्हणाले. जग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विकास करत असताना आपण सेंद्रीय शेतीकडे जात असल्याचे अर्थमंत्री म्हणाले.

तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. कसे देणार ते सांगा? तेलबियांचे साठा मर्यादा लावून प्रोत्साहन देणार का? शेतकऱ्यांच्या तेलबियांना चांगले दर कसे मिळतील यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा त्यांनी करायला हवी होती असे घनवट म्हणाले. नदीजोड प्रकल्पांची घोषणा करतात. प्रत्यक्षात काहीच होत नसल्याचे घनवट म्हणाले. एकीकडे ड्रोन वापरण्याची परवानगी देता दुसरीकडे किटकनाशकमुक्त शेती करण्याचे सांगता, नेमकं करायचे काय असा सवाल त्यांनी केला. खतांच्या किंमती वाढत आहेत, त्या नियंत्रीत करता येतील का यासाठी काहीही बोलले गेले नाही. प्रक्रिया उद्योगाबाबत काहीही केले नाही. देशातील 40 टक्के नाशीवंत माल फेकून द्यावा लागतो. 

अर्थसंकल्पात  मूळ गोष्टींवर भर देण्याऐवजी हवेतल्या घोषणा -  संदीप जगताप

आज सादर झालेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना निराश करणारा आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरघोस तरतूद करण्याऐवजी भाषणबाजीवर भर दिलेला दिसून येतो. खत औषधांच्या किंमती गगनाला भिडल्यात त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कुठलीही तरतूद नसल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी जोरदार टीका केली. ऑरगॅनिक फार्मिंग ही वास्तव संकल्पना नाही. आज खता औषधांशिवाय शेती अशक्य आहे. म्हणून मूळ गोष्टींवर भर देण्याऐवजी हवेतल्या घोषणा झाल्या. मूलभूत सुविधा सुधरवणे. निर्यात वाढीला प्रोत्साहन देणे, प्रक्रिया उद्योग व शेतीपूरक औजारांना 100  टक्के अनुदान यासाठी भरघोस तरतूद नाही. यामुळे हा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा नसल्याचे सीतारमण यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
Devendra Fadnavis : कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंडेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
IAS तुकाराम मुंढेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
Ahilyanagar Blast: अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
Amruta Khanvilkar Sonalee Kulkarni Catfight Controversy: 'इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी...'; अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यात खरंच कॅटफाईट? दोघींनी स्वतःच करुन टाकलं खरं-खोटं
'इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी...'; अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यात खरंच कॅटफाईट? दोघींनी स्वतःच करुन टाकलं खरं-खोटं
What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
Jalgaon News: शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Embed widget