एक्स्प्लोर

Hingoli News: हिंगोलीतील शेतकऱ्यांचा अनेखा प्रयोग; औषधी गुणधर्म असलेल्या पापरिका मिरचीला अमेरिकेत मागणी , 27-30 हजार क्विंटल भाव

मिरच्यांची तोडणी केल्यानंतर उन्हामध्ये या मिरच्या वाळवल्या जातात आणि त्यानंतर या मिरच्यांची खरेदी करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन या मिरचीची खरेदी करतात.

हिंगोली : महाराष्ट्रतील शेतकरी आता आधुनिक शेती बरोबरच करार शेतीला सुद्धा महत्त्व देऊ लागला आहे या माध्यमातून अनेक शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत. हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यातील आसेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी सुद्धा औषधी गुणधर्म असलेल्या पापरीका मिरचीचे करार पद्धतीने उत्पादन घेतले  आहे.

हिंगोलीच्या आसेगाव येथील  शेतकरी मुरलीधर भालेराव यांनी अमेरिकेतील औषध निर्मिती करणाऱ्या एका कंपनीशी करार केला.  पापरीका या औषधी प्रजातीचे मिरचीच्या उत्पन्न घ्यायचं ठरवलं या कंपनीशी करार करत असताना या मिरचीच्या उत्पादनाची खरेदी करण्याची जबाब कंपनीकडे असते.  मिरचीच्या दर्जानुसार ग्रेड ए आणि ग्रेड बी अशा दोन प्रकारच्या मिरच्यांचे प्रकार ठरवले जातात. त्यानुसार 27 ते 30 हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे कंपनी मिरचीची खरेदी केली जाते त्यानुसार आसेगाव येथील शेतकऱ्यांनी या औषधी गुणधर्म असलेल्या पापरीका मिरचीची लागवड केली. अगदी साध्या पद्धतीने लागवड केलेल्या या मिरचीचे यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर लागवड केल्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीचे उत्पादन निघू शकतं हे शेतकरी सांगत आहेत. 

पारंपारिक पीक पद्धत आणि बाजारात न मिळणाऱ्या भावाला कंटाळून मुरलीधर भालेराव यांनी ही करार शेती करत 30 गुंठे शेती मध्ये औषधी मिरचीची लागवड केली आहे.  चार महिन्याच्या मेहनतीतून आणि तीस हजार रुपयांच्या खर्चामधून त्यांना पाच क्विंटल मिरचीचे उत्पादन निघणार आहे, आता या मिरचीची तोडणी सुरू आहे.  या मिरच्यांची तोडणी केल्यानंतर उन्हामध्ये या मिरच्या वाळवल्या जातात आणि त्यानंतर या मिरच्यांची खरेदी करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन या मिरचीची खरेदी करतात.

तीस गुंठे शेतात तब्बल एक लाख रुपयांचा नफा 

 शेतकरी मुरलीधर भालेराव यांना यावर्षी होत असलेला पाच क्विंटल च्या मिरची मधून जवळपास एक लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळानार आहे खर्च आणि मेहनत वजा करता तीस गुंठे शेतामध्ये शेतकरी भालेराव यांना तब्बल एक लाख रुपयांचा नफा होत आहे असे शेतकरी भालेराव सांगत आहेत 

पारंपारिक पिकांना अनेक शेतकरी कंटाळले आहेत त्याचबरोबर शेतामध्ये उत्पादन घेतल्यानंतर बाजारामध्ये शेतमालाचे भाव घसरतात त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु या करार शेतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा भाव अगोदरच कळत असल्यामुळे कोणते उत्पादन घ्यायचे याचा निर्णय शेतकऱ्याला घेता येतो. विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असलेल्या या पापरीका मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांनी या मिरचीची लागवड केली आहे.

गावातील शेतकरी मुंजाजी काळे यांनी अमेरिकेतील कंपनीशी करार करत तब्बल दोन एकर शेतामध्ये या मिरचीची लागवड केली आहे. चार महिन्यापूर्वी लागवड केलेल्या या मिरच्या आता काढणीस आले आहेत. मिरची काढण्याची प्रक्रिया आता जवळपास अंतिम टप्प्यात असून शेतकरी मुंजाजी काळे यांना एकरी चार लाखाचा फायदा होतो. दोन एकरमध्ये लागवड केलेल्या या मिरचीमधून शेतकरी मुंजाजी काळे यांना आठ ते नऊ लाख रुपयांचा निव्वळ नफा होणार आहे. तर आर्थिक फायदा बरोबरच आपल्या मिरचीला अमेरिकेत सुद्धा मागणी आहे. याचा सुद्धा वेगळाच अभिमान असल्याचं शेतकरी काळे सांगत आहेत 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget