Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्याकडे, कोर्टात आतापर्यंत काय झालं?
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्याकडे, कोर्टात आतापर्यंत काय झालं?
सलग तिसऱ्या आठवड्यात राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आजपासून पुन्हा सुरूवात होणार... आजपासून पुढचे सलग तीन दिवस खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान सत्तासंघर्षाची सुनावणी याच आठवड्यात पुर्ण होणार असल्याची शक्यता आहे.. आज ठाकरे गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी. आज युक्तिवाद करतील त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ठाकरे गटाचे आणखी एक वकील देवदत्त कामत बाजू मांडणार आहेत. त्यानंतर शिंदे गटाकडून हरिश साळवे बाजू मांडतील. मागच्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत सलग अडीच दिवस ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. सिब्बल यांनी राज्यपाल, अध्यक्षांचे अधिकार यासह अनेक मुद्यांवर बोट ठेवत युक्तिवाद केला होता. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणी काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.