Zero Hour : पवारांनी ठरवलं विधानसभेचं टार्गेट, मारणार बाजी की होणार रिग्रेट?
Zero Hour : पवारांनी ठरवलं विधानसभेचं टार्गेट, मारणार बाजी की होणार रिग्रेट? उद्या होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत, एक अतिरिक्त उमेदवार असल्यामुळे.. सर्वच पक्षांकडून आमदारांची विशेष काळजी घेतली जातेय.. बैठका घेतल्या जातायत.. मोर्चेबांधणी सुरूय.. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार मैदानात आहेत.. हे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआकडून रणनीती आखली गेलीय.. पुरेसं संख्याबळ असल्याचा दावाही त्यांनी केलाय.. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत, एबीपी माझाचे प्रतिनिधी राजू सोनवणे... विधान परिषद निवडणूक स्पेशल यासाठी म्हणतोय.. कारण, आजच्या भागात आपण विश्लेषण करणार आहोत... अवघ्या काही तासांवर आलेल्या विधान परिषद निवडणुकीचं... बरोबर चोविस तासांनंतर राज्यातल्या अकरा विधान परिषदेच्या जागांचा निकाल लागलेला असेल.. आणि महायुती असो की महाविकास आघाडी... यांच्यातला एक उमेदवार पराभुत झालेला असेल..
खरंतर, एक काळ होता.. खऱंतर, विधान परिषद असो की राज्यसभा.. दोन्ही सभागृहातील निवडणुका शक्यतो बिनविरोध व्हायच्या.. या निवडणुकांसाठी लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क असल्यानं.. यात इतके डावपेच आखले जायचे नाही.. राजकीय पक्षांच्या आमदारांच्या संख्येवरुन त्यांच्या विधान परिषदेत किंवा राज्यसभेतल्या जागांचा आकडा ठरायचा.. याच बिनविरोध निवडणुका जणू आपल्या समृद्ध राजकीय परंपरेचाच भाग बनल्या.. मात्र, आता काळ बदलल्या.. एक-एक मतासाठी राजकीय डावपेच आखले जावू लागले..आताही राज्यात असंच चित्र आहे.. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह ठाकरेंनी आपले आमदार हॉटेल्समध्ये ठेवलेत.. कारण, इथं एक-एक मताला महत्व आहे..
गेल्या पाच वर्षांमध्ये राजकीय गणितं इतकी बदलून गेलीएत.. गेल्या विधानसभेला राज्यात जिथं सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी असे चार प्रमुख पक्ष होते.. तिथ आज दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक भाजप, एक काँग्रेस.. असे सहा प्रमुख पक्ष बनलेत..
त्यामुळे राज्यात ग्रामपंचायतीच्याही निवडणुका लागल्या.. तरी त्या प्रतिष्ठेच्या बनतात... आणि हेच आपण गेल्या अडीच वर्षांमध्ये पाहतोय...आणि त्याला विधान परिषदेच्याही निवडणुका अपवाद उरल्या नाहीएत.