एक्स्प्लोर

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा म्हणजे पंढरपूरची आषाढवारी अवघ्या काही तासांवर आलीय. आणि अवघ्या महाराष्ट्रासमोर महाप्रलयाचं मोठं संकट येऊन उभं ठाकलंय. मुंबईसह आसपासच्या महानगरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाऊस कोसळतोय. मुंबईत महिन्याभराचा सरासरी पाऊस तर अवघ्या चार दिवसांमध्ये झालाय. पण चिंता अजूनही कायम आहे. कारण भारतीय हवामान खात्यानं उद्या नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि ठाण्यासह नाशिक, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या परिसरात ढगफुटी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि तसं झालं तर या परिसरात ३०० मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेऊन सर्व यंत्रणांना येत्या आठ जुलैपर्यंत सज्ज राहण्याचे आज आदेश दिले.

नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झीरो अवर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.

मंडळी, महाराष्ट्राची सर्वात मोठी आध्यात्मिक परंपरा असलेल्या आषाढीच्या वारीला पुढच्या दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. पालखी सोहळ्याच्या परंपरेनुसार संत तुकोबारायांची पालखी उद्या देहूमधून, तर संत ज्ञानोबा माऊलींची पालखी परवा आळंदीमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. महाराष्ट्राच्या या सर्वात मोठ्या सांस्कृतिक सोहळ्यावर महाप्रलयाचं सावट आहे. त्याचवेळी आज दिवसभर झालेल्या पावसानं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर संकटांची मालिका उभी राहिली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी बांधण्यात आलेला तब्बल तास हजार कोटींचा मिसिंग लिंक प्रकल्प सुरु होऊन जेमतेम नऊ आठवडे झाले आहेत. पण पहिल्याच मोठ्या पावसात तो प्रकल्प धोकादायक असल्याचं दिसून आलं. या मार्गावर आज दरड कोसळल्यामुळं तो वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ आली. त्यामुळं मिसिंग लिंकवरच्या प्रवासाची सुरक्षितता आणि तिथल्या रस्त्याचा दर्जा याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-नाशिक महामार्गांवरही सध्याची परिस्थिती चिंता करायला लावणारी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आयोजित बैठकीला उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुसळधार पावसामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित सुरक्षायंत्रणांनी २४ तास अलर्ट मोडवर राहून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं मदतकार्य करावं, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. राज्यभरात पुढच्या काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे... दरम्या 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget