एक्स्प्लोर

टीम इंडियाच्या 'या' रणनितीमुळे इंग्लंडला रोखण्यात यश

सामन्याच्या सुरुवातीला कूक आणि मोईल अलीच्या भागिदारीनं भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र योग्य रणनितीमुळे भारत सामन्यात परतल्याचं जाडेजानं म्हटलं आहे.

केनिंग्टन ओव्हल (लंडन) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे राहिला. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची अवस्था सात बाद 198 अशी झाली. सामन्याच्या सुरुवातीला कूक आणि मोईल अलीच्या भागिदारीनं भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र योग्य रणनितीमुळे भारत सामन्यात परतल्याचं जाडेजानं म्हटलं आहे.

पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत इंग्लंडने एकही विकेट गमावली नव्हती. मात्र चहापानानंतर भारतील संघ नव्या रणनितीसह मैदानात उतरला आणि सामन्यात पुनरागमन केलं. जलद गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत सामन्याला कलाटणी दिली.

इंग्लंड दौऱ्यात पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या रवींद्र जाडेजाने इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणत दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जाडेजानं म्हटलं की, "सुरुवातीला कोणतीही विकेट मिळाली नाही, तरीही इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणण्याच्या रणनितीवर आम्ही काम केलं. मोईल अली आणि अॅलिस्टर कूक यांच्या भागिदारीदरम्यान सर्वांनी चांगली गोलंदाजी केली. मोईल अली आणि कूकला धावा न करु दिल्यास ते दबावात येतील, हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे चुकीचे शॉट खेळून ते अडचणीत येतील असा अंदाज आम्ही बांधला आणि तसंच झालं."

"चहापानानंतर अवघ्या 50 धावांच्या आत इंग्लंडच्या सहा विकेट आम्ही घेतल्या. इंग्लंडमध्ये एक विकेट मिळाली की 2-3 विकेट सलग मिळतात हे आम्हाला माहिती होतं", असं जाडेजा म्हणाला.

भारताकडून ईशांत शर्मानं तीन, तर जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केलं. शमीला विकेट मिळाली नाही मात्र भेदक गोलंदाजी करत त्याने इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव आणला. त्यामुळे भक्कम सुरुवात केलेल्या इंग्लंडची अवस्था पहिल्या दिवसअखेर एक बाद 133 धावांवरुन सात बाद 198 अशी झाली.

संबंधित बातम्या

'शोले'तला कॉईन हवा होता, पाचव्यांदा टॉस हरल्यांनतंर कोहली उद्विग्न  

पृथ्वी शॉला संधी नाहीच, हनुमा विहारीचं कसोटी पदार्पण  

अनोखा विक्रम : इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नशिबात ‘काटा’च! 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं? 
मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं?
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं? 
मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं?
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Embed widget