एक्स्प्लोर

Ind vs Nz Final T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपचा शेवटचा दिवस तोच गाजवणार...; संजूचा 'त्या' फ्लॉप खेळाडूवर अजब भरोसा; न्यूझीलंडविरुद्ध येणार वादळ?

Sanju Samson on Abhishek Sharma : टी-20 वर्ल्डकप 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने प्रवेश केला आहे. 8 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खिताबी लढत रंगणार आहे.

Sanju Samson on Abhishek Sharma : टी-20 वर्ल्डकप 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने प्रवेश केला आहे. 8 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खिताबी लढत रंगणार आहे. हा महामुकाबला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरलेला अभिषेक शर्मा पुन्हा एकदा प्लेइंग-11 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. याचे संकेत सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या संजू सॅमसनने दिले आहेत. 

संजूला पूर्ण विश्वास आहे की, जरी या संपूर्ण स्पर्धेत अभिषेकचा बॅट शांत राहिला असला तरी न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये तोच सामना जिंकवून देणारा खेळाडू ठरू शकतो. अंतिम सामन्याच्या दिवशी अभिषेक आपला सर्वोत्तम खेळ दाखवत प्रतिस्पर्ध्यांना धक्का देईल, असा विश्वास संजूने व्यक्त केला आहे.

टी-20 वर्ल्ड कपचा शेवटचा दिवस तोच गाजवणार....

संजू म्हणाला, “आमच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगलं आहे. कर्णधार सूर्या, कोच गंभीर आणि संघातील सर्व खेळाडूंना अभिषेकवर पूर्ण विश्वास आहे. कोणत्याही खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार येतच असतात. या फॉरमॅटमध्ये फक्त एक-दोन चांगल्या फटक्यांची गरज असते आणि त्याने आत्मविश्वास पुन्हा परत येतो. आम्हाला वाटतं की फायनलचा दिवस अभिषेक शर्माचा असणार आहे. तो मानसिकदृष्ट्या पूर्ण तयार आहे. आम्हाला खात्री आहे की अंतिम सामन्यात तो नक्कीच शानदार कामगिरी करेल आणि टीम इंडियासाठी सामना जिंकणारी खेळी करेल.

-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अभिषेकच्या फक्त 89 धावा (Abhishek Sharma T20 World Cup 2026)

खरं तर ,टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अभिषेक शर्मा टीम इंडियाचे मोठे शस्त्र मानले जात होते. मात्र या स्पर्धेत त्याची बॅट अजूनही शांतच आहे. त्याने 7 सामन्यांत फक्त 14.16 च्या सरासरीने केवळ 89 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध केलेल्या 55 धावा हीच त्याची एकमेव उल्लेखनीय खेळी ठरली आहे. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यांत तो खातेही उघडू शकला नाही. या स्पर्धेत त्याने अनुक्रमे 0, 0, 0, 15, 55, 10 आणि 9 अशा धावा केल्या आहेत.

8 पैकी 7 सामने जिंकून भारत फायनलमध्ये

टीम इंडियाने या टी20 वर्ल्ड कप आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. ग्रुप स्टेजमधील सर्व चार सामने भारताने जिंकले होते. त्यानंतर सुपर-8 फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला, मात्र पुढील दोन सामन्यांत झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार विजय मिळवला. 

यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात भारताने 7 विकेट गमावत 253 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तर इंग्लंडची टीम 246 धावांपर्यंत मजल मारू शकली.

हे ही वाचा -

Video : एक नव्हे दोन विकेटकीपर ठेवा, अभिषेक शर्माची संजूकडे मागणी, अर्शदीप सिंगचं नाव घेत काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
Hardik Pandya IPL Trade 2027 : 10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget