एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : श्रीलंकेचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज

विराट कोहलीची टीम इंडिया आणि रंगाना हेराथचा श्रीलंका संघ पहिल्या कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. श्रीलंका दौऱ्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून गॉलच्या मैदानात सुरुवात होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ही केवळ नव्या मोहिमेची सुरुवात नाही, तर मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

मुंबई : विराट कोहलीची टीम इंडिया आणि रंगाना हेराथचा श्रीलंका संघ पहिल्या कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. श्रीलंका दौऱ्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून गॉलच्या मैदानात सुरुवात होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ही केवळ नव्या मोहिमेची सुरुवात नाही, तर मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. कारण 2015 सालच्या श्रीलंका दौऱ्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाला गॉल कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीच्या निकषावर गॉलची ही कसोटी म्हणजे खरं तर दोन असमान ताकदीच्या संघांमधली लढाई आहे. कारण आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया सध्या नंबर वन आहे, तर श्रीलंका चक्क सातव्या स्थानावर आहे. पण मायदेशात खेळताना सातव्या स्थानावरच्या श्रीलंकेचं आव्हान कमी लेखता येणार नाही. त्यात नुकत्याच झालेल्या कोलंबो कसोटीत झिम्बाब्वेवर चार विकेट्सनी मिळवलेल्या विजयानं श्रीलंकेचा आत्मविश्वासही दुणावलेला आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियाच्या दृष्टीनं गॉलची ही लढाई म्हणजे नव्या मोहिमेची निव्वळ नांदी नाही, तर मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. 2015 सालच्या श्रीलंका दौऱ्यात विराटच्या भारतीय संघाला गॉलच्या याच मैदानात लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. सदर कसोटीत विजयासाठी अवघ्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघाला पेलवला नव्हता. रंगाना हेराथनं 48 धावांत सात विकेट्स काढून टीम इंडियाचा अवघ्या 112 धावांत खुर्दा उडवला होता. भारतीय संघानं पुढच्या दोन्ही कसोटी जिंकून, मालिकेत 2-1 असा विजय मिळवला असला तरीही गॉलच्या पराभवाची जखम अजूनही भरलेली नाही. गेल्या दोन वर्षांत कसोटी क्रिकेटच्या दुनियेत टीम इंडियाचं वजन खूपच वाढलं आहे. 2015 सालच्या गॉल कसोटीपासून आजच्या गॉल कसोटीआधी भारतानं सतरापैकी बारा कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. कर्णधार या नात्यानं विराट कोहली अधिक परिपक्व झाला आहे. त्यामुळं विराट आणि त्याचे शिलेदार गॉलच्या कसोटीत नव्या आत्मविश्वासानं मैदानात उतरतील. गॉलच्या या कसोटीत टीम इंडियाच्या दृष्टीनं चिंतेची एकमेव बाब म्हणजे मुरली विजय आणि लोकेश राहुल हे सलामीचे मूळ पर्याय मैदानात उतरू शकणार नाहीत. मुरली विजय अजूनही दुखापतीतून सावरलेला नसल्यानं, त्याच्याऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर श्रीलंका दौऱ्यात लोकेश राहुल तापानं फणफणल्यानं अभिनव मुकुंदला कसोटीत पुनरागमन करण्याची संधी मिळणार आहे. श्रीलंकेचा कर्णधार आणि डावखुरा स्पिनर रंगाना हेराथ हा गॉल कसोटीत भारतीय फलंदाजांची मोठी परीक्षा ठरावा. त्यानंच श्रीलंकेला 2015 सालची गॉल कसोटी जिंकून दिली होती. नुकत्याच झालेल्या कोलंबो कसोटीत त्यानंच अकरा विकेट्स काढून श्रीलंकेला झिम्बाब्वेवर विजय मिळवून दिला. त्यामुळं हेराथला टप्पा आणि लय मिळू देणं टीम इंडियाच्या दृष्टीनं धोक्याचं ठरू शकतं. रंगाना हेराथच्या आव्हानाला कसं सामोरं जायचं याची रणनीती आखण्यासाठी टीम इंडियाला नवा हेडमास्तर रवी शास्त्रीचं मार्गदर्शन मोलाचं ठरावं. अनिल कुंबळेला चेकमेट करून पुन्हा हेडमास्तर बनलेल्या शास्त्रीसाठीही 2015 सालच्या गॉलच्या पराभवाची जखम भरणं गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  7PM : 6 ऑक्टोबर  2024: ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज :   7PM : 6 सप्टेंबर 2024 : ABP MajhaUddhav Thackeray on Shrikant Shinde :  लेकाला डिवचलं;  पिता खवळला; श्रीकांत शिंदेंवर घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget