एक्स्प्लोर

Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच

कुणी याला श्रद्धा म्हणेल तर कुणी अंधश्रद्धा, पण भारतीय क्रिकेट संघाच्या या कार्यपद्धतीची देशभर चर्चा होणार हे नक्की.

यंदाच्या होळी (Holi) पौर्णिमेवर ग्रहणाचं सावट असून आज यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण लागू झाल्याचं पाहायला मिळालं. दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी हे ग्रहण सुरु झालं, संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटांपर्यंत असणार आहे. एकीकडे होळीनंतर धुळवड साजरी केला जात असून मुंबईसह मेट्रो सिटीमध्ये रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. काहींनी चंद्रग्रहण पाळत रंग खेळण्यापासून अंतर राखले आहे. तर, काहींनी रंगांची उधळण करत ही अंधश्रद्धा असल्याचं म्हटलं. मात्र, दोन दिवसांपूर्वीच टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजचा पराभव करत जगाचं लक्ष वेधलेल्या टीम इंडियानं (Team india) आज आपला सराव थांबवल्याचं महत्त्वाचं कारण समोर आलं आहे. 

कुणी याला श्रद्धा म्हणेल तर कुणी अंधश्रद्धा, पण भारतीय क्रिकेट संघाच्या या कार्यपद्धतीची देशभर चर्चा होणार हे नक्की. कारण, बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज खग्रास चंद्रग्रहणाच्या काळात सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं वानखेडे स्टेडियमवर सराव करणं टाळलं आहे. 

ट्वेन्टी 20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड संघांमधला उपांत्य सामना गुरुवार, 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचा नियोजित सराव आज दुपारपासून सुरु होणार होता. पण, भारतीय संघ व्यवस्थापनाला मुंबईत दाखल होताच आजच्या खग्रास चंद्रग्रहणाची माहिती मिळाली. त्यानंतर टीम इंडियाच्या सरावाची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. प्रत्यक्षात भारतीय संघ आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर फ्लडलाईट्समध्ये सराव करताना दिसेल. तर, इंग्लंड संघाचा सराव पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुपारी सुरू झाला आहे. मात्र, खग्रास ग्रहणामुळे टीम इंडियाने आपला दुपारचा सराव टाळल्याची माहिती समोर आली आहे. 

5 मार्च रोजी भारताची लढत

सुपर 8 मध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला मात देत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता, उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया असा सामना रंगणार आहे. तसेच, द.आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात उद्या 4 मार्च रोजी सामना होईल. या दोन्ही सामन्यात विजयी होणाऱ्या संघास अंतिम सामन्याचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे, चारही संघांनी आपलं सर्वस्व देत सराव सुरू केला आहे. टी-20 चा विश्वचषक उंचावण्यासाठी टीम इंडियाही सज्ज झालीय. 

भारतातही चंद्रग्रहण

वैदिक पंचांगानुसार, आज 3 मार्च रोजी 2026 चे पहिले चंद्रग्रहण आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतातही दिसेल. त्यामुळे, सुतक आणि इतर विधींबाबतचे सर्व नियम येथे लागू होतील. ज्योतिषांच्या मते, ग्रहणांचा परिणाम शुभ आणि अशुभ दोन्ही राशींवर होतो. या चंद्रग्रहणाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, असं सांगण्यात येतं. 

चंद्रग्रहणाची वेळ

चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ: दुपारी 3:20 
जास्तीत जास्त ग्रहण: अंदाजे संध्याकाळी 6:33 ते 6:40 
ग्रहण संपण्याची वेळ: सायंकाळी 6:47 

हेही वाचा

मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DC vs RCB IPL 2026 : आरसीबीचा 'रॉयल' कारभार! 13.3 ओव्हर शिल्लक ठेवून दिल्लीचा धुव्वा; विराट कोहलीच्या विक्रमी बॅटने लिहिला विजयाचा नवा इतिहास!
आरसीबीचा 'रॉयल' कारभार! 13.3 ओव्हर शिल्लक ठेवून दिल्लीचा धुव्वा; विराट कोहलीच्या विक्रमी बॅटने लिहिला विजयाचा नवा इतिहास!
DC vs RCB IPL 2026 : आरसीबीचा ऐतिहासिक विजय; दिल्लीचा 75 धावांत खुर्दा, बंगळुरूचा 9 विकेट्सनी दणदणीत विजय
DC vs RCB Update : आरसीबीचा ऐतिहासिक विजय; दिल्लीचा 75 धावांत खुर्दा, बंगळुरूचा 9 विकेट्सनी दणदणीत विजय
DC vs RCB IPL 2026 : राजधानी हादरली! 13 धावांत 6 विकेट्स... भुवनेश्वर-हेझलवूडच्या जोडीने दिल्लीला रडवलं; पॉवरप्लेच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा रेकॉर्ड
राजधानी हादरली! 13 धावांत 6 विकेट्स... भुवनेश्वर-हेझलवूडच्या जोडीने दिल्लीला रडवलं; पॉवरप्लेच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा रेकॉर्ड
Bhuvneshwar Kumar DC vs RCB IPL 2026 : मैदानात पुन्हा तोच जुना 'स्विंगचा सुलतान'...; 36व्या वर्षी भुवीचा दिल्लीला दणका; टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडणार?
मैदानात पुन्हा तोच जुना 'स्विंगचा सुलतान'...; 36व्या वर्षी भुवीचा दिल्लीला दणका; टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
Embed widget