एक्स्प्लोर

45 देश, 36 खेळ, 572 खेळाडू आणि लक्ष्य एकच... एशियाडचं पदक

एशियाडच्या आजवरच्या इतिहासात भारतानं 616 पदकांची कमाई केली आहे. त्यात 139 सुवर्ण, 178 रौप्य आणि 299 कांस्यपदकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू आता सज्ज. इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांग शहरात 18 व्या एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. जकार्तातल्या गेलोरा बन्ग कार्नो स्टेडियमवर आज संध्याकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या घवघवीत यशानंतर एशियाडमध्येही भारतीय शिलेदारांकडून त्याच कामगिरीची अपेक्षा केली जातेय. 45 देश... 36 खेळ... 572 खेळाडू... आणि लक्ष्य एकच....एशियाडचं पदक. इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांग शहरात आयोजित अठराव्या एशियाडसाठी भारताचं 572 खेळाडूंचं पथक सज्ज झालंय. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट केली. त्यानंतर आता एशियाडमध्येही भारतीय पथकाकडून पदकांची मोठी अपेक्षा आहे. एशियाड म्हणजे आशियाई देशांसाठीचा सर्वोच्च क्रीडामेळा. ऑलिम्पिकच्या धर्तीवर दर चार वर्षांनी आशियाई देशांसाठी होणारा बहुविध खेळांचा महोत्सव म्हणजे एशियाड. आशियाई ऑलिम्पिक समितीच्या वतीनं एशियाडचं आयोजन करण्यात येतं. आशिया खंडातल्या तब्बल 45 देशांचा एशियाडमध्ये सहभाग असतो. ऑलिम्पिकपाठोपाठ जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अशी एशियाडची ओळख आहे. इंडोनेशियाच्या जकार्ता आणि पालेमबान्ग शहरांमध्ये यंदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. जकार्तात होणारं हे आजवरचं दुसरं एशियाड आहे. याआधी 1962 साली जकार्तामध्ये एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा जकार्तासह पालेमबान्ग शहरातही एशियाडच्या काही क्रीडाप्रकारांचं आयोजन करण्यात येईल. इंडोनेशियातल्या अठराव्या एशियाडमध्ये 58 क्रीडाप्रकारांत मिळून एकूण 465 पदकं पणाला लागलेली असतील. त्यासाठी 45 देशांमधले हजारो खेळाडू आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सिद्ध झाले आहेत. आपला भारत आणि एशियाडचं भावनिक नातं आहे. भारतानं आजवर दोनवेळा एशियाडचं यशस्वी आयोजन केलं आहे. 1951 साली म्हणजेच देश स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांत भारतात पहिल्या एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या प्रयत्नामुळं नवी दिल्लीत एशियाडचा हा मेळा संपन्न झाला होता. आशियाई देशांमधील सलोखा वाढीस लागावा आणि या देशांमध्ये दृढतेची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. पुढे 1982 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना नवी दिल्लीत दुसऱ्यांदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. 1982 सालच्या एशियाडमध्ये भारताला 13 सुवर्णपदकांसह पदकतालिकेत पाचवं स्थान मिळालं होतं. त्या एशियाडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बोधचिन्ह अप्पू. आज ४५ ते ५० वयोगटातल्या भारतीयांच्या मनात तो अप्पू आजही घर करुन आहे. एशियाडच्या आजवरच्या इतिहासात भारतानं 616 पदकांची कमाई केली आहे. त्यात 139 सुवर्ण, 178 रौप्य आणि 299 कांस्यपदकांचा समावेश आहे. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये भारताला 11 सुवर्ण, नऊ रौप्य आणि ३७ कांस्यपदकांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. गत एशियाडमधली 57 पदकांची ती कमाई यंदा आणखी वाढवण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न राहील. ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये आयोजित कॉमनवेल्थ गेम्स ही भारतीय खेळाडूंची एशियाडआधीची पूर्वपरीक्षा होती. त्या परीक्षेत भारतीय शिलेदारांनी घवघवीत यश मिळवलं. भारताचं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं ते यश एशियाडमध्ये परावर्तित होतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs RCB IPL 2026 : हैदराबादचा एकतर्फी मोठा विजय; पराभवानंतरही RCB टेबल टॉपर, 26 मे रोजी गुजरातशी भिडणार, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
हैदराबादचा एकतर्फी मोठा विजय; पराभवानंतरही RCB टेबल टॉपर, 26 मे रोजी गुजरातशी भिडणार, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
SRH vs RCB Live Score IPL 2026 Update : हैदराबादने आपला शेवटचा सामना जिंकला, पराभवानंतरही आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी, SRHने RCBला 55 धावांनी लोळवलं
SRH vs RCB Update : हैदराबादने आपला शेवटचा सामना जिंकला, पराभवानंतरही आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी, SRHने RCBला 55 धावांनी लोळवलं
Dilip Vengsarkar on BCCI : डोमेस्टिक क्रिकेट बंदच करा...! 10 सामन्यात 60 विकेट्स, तरीही टीम इंडियात जागा नाही, माजी भारतीय कर्णधार चवताळला, नेमकं काय म्हणाला?
डोमेस्टिक क्रिकेट बंदच करा...! 10 सामन्यात 60 विकेट्स, तरीही टीम इंडियात जागा नाही, माजी भारतीय कर्णधार चवताळला, नेमकं काय म्हणाला?
Vijay Shankar Retirement : 6 वर्षे बाहेर ठेवलं, IPL नेही नाकारलं... टीम इंडियाच्या खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, पोस्ट वाचून सगळे भावुक
6 वर्षे बाहेर ठेवलं, IPL नेही नाकारलं... टीम इंडियाच्या खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, पोस्ट वाचून सगळे भावुक

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : मोठी बातमी, अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर
Ladki Bahin Yojana : ...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा, सरकारला संकटकाळात दिलासा
NEET UG Paper Leak :  नीट यूजी परीक्षेचा पेपर लीक होताच लातूरमध्ये साफसफाई सुरु, उद्योग भवनातील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश  
 लातूरच्या ट्युशन एरियावर प्रशासनाचा दणका, उद्योग भवन मधील क्लासेस, हॉस्टेल तात्काळ बंद करण्याचे आदेश
Pune Rain : पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
पुणे आणि पिंपरी चिंचवडला पावसानं झोडपलं, पुणेकरांची तारांबळ, उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा
CET : राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचा खुलासा
राज्यात अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार, विद्यार्थी-पालकांनी संभ्रम बाळगू नये : राज्य सामाईक परीक्षा कक्ष
Abhijeet Dipke: भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
भारतातील 94 टक्के तरुणांना 'पाकिस्तानी' का म्हणता? थेट स्क्रीनशाॅट दाखवत अभिजित दीपकेची ट्रोलर्सना सणसणीत चपराक
Embed widget