एक्स्प्लोर

45 देश, 36 खेळ, 572 खेळाडू आणि लक्ष्य एकच... एशियाडचं पदक

एशियाडच्या आजवरच्या इतिहासात भारतानं 616 पदकांची कमाई केली आहे. त्यात 139 सुवर्ण, 178 रौप्य आणि 299 कांस्यपदकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू आता सज्ज. इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांग शहरात 18 व्या एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. जकार्तातल्या गेलोरा बन्ग कार्नो स्टेडियमवर आज संध्याकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या घवघवीत यशानंतर एशियाडमध्येही भारतीय शिलेदारांकडून त्याच कामगिरीची अपेक्षा केली जातेय. 45 देश... 36 खेळ... 572 खेळाडू... आणि लक्ष्य एकच....एशियाडचं पदक. इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांग शहरात आयोजित अठराव्या एशियाडसाठी भारताचं 572 खेळाडूंचं पथक सज्ज झालंय. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट केली. त्यानंतर आता एशियाडमध्येही भारतीय पथकाकडून पदकांची मोठी अपेक्षा आहे. एशियाड म्हणजे आशियाई देशांसाठीचा सर्वोच्च क्रीडामेळा. ऑलिम्पिकच्या धर्तीवर दर चार वर्षांनी आशियाई देशांसाठी होणारा बहुविध खेळांचा महोत्सव म्हणजे एशियाड. आशियाई ऑलिम्पिक समितीच्या वतीनं एशियाडचं आयोजन करण्यात येतं. आशिया खंडातल्या तब्बल 45 देशांचा एशियाडमध्ये सहभाग असतो. ऑलिम्पिकपाठोपाठ जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अशी एशियाडची ओळख आहे. इंडोनेशियाच्या जकार्ता आणि पालेमबान्ग शहरांमध्ये यंदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. जकार्तात होणारं हे आजवरचं दुसरं एशियाड आहे. याआधी 1962 साली जकार्तामध्ये एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा जकार्तासह पालेमबान्ग शहरातही एशियाडच्या काही क्रीडाप्रकारांचं आयोजन करण्यात येईल. इंडोनेशियातल्या अठराव्या एशियाडमध्ये 58 क्रीडाप्रकारांत मिळून एकूण 465 पदकं पणाला लागलेली असतील. त्यासाठी 45 देशांमधले हजारो खेळाडू आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सिद्ध झाले आहेत. आपला भारत आणि एशियाडचं भावनिक नातं आहे. भारतानं आजवर दोनवेळा एशियाडचं यशस्वी आयोजन केलं आहे. 1951 साली म्हणजेच देश स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांत भारतात पहिल्या एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या प्रयत्नामुळं नवी दिल्लीत एशियाडचा हा मेळा संपन्न झाला होता. आशियाई देशांमधील सलोखा वाढीस लागावा आणि या देशांमध्ये दृढतेची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. पुढे 1982 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना नवी दिल्लीत दुसऱ्यांदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. 1982 सालच्या एशियाडमध्ये भारताला 13 सुवर्णपदकांसह पदकतालिकेत पाचवं स्थान मिळालं होतं. त्या एशियाडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बोधचिन्ह अप्पू. आज ४५ ते ५० वयोगटातल्या भारतीयांच्या मनात तो अप्पू आजही घर करुन आहे. एशियाडच्या आजवरच्या इतिहासात भारतानं 616 पदकांची कमाई केली आहे. त्यात 139 सुवर्ण, 178 रौप्य आणि 299 कांस्यपदकांचा समावेश आहे. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये भारताला 11 सुवर्ण, नऊ रौप्य आणि ३७ कांस्यपदकांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. गत एशियाडमधली 57 पदकांची ती कमाई यंदा आणखी वाढवण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न राहील. ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये आयोजित कॉमनवेल्थ गेम्स ही भारतीय खेळाडूंची एशियाडआधीची पूर्वपरीक्षा होती. त्या परीक्षेत भारतीय शिलेदारांनी घवघवीत यश मिळवलं. भारताचं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं ते यश एशियाडमध्ये परावर्तित होतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoni And Rishabh Pant Video: जरा हुक्का पिऊन येतो...; एमएस धोनी आणि ऋषभ पंतच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं काय काय म्हणाले?
जरा हुक्का पिऊन येतो...; एमएस धोनी आणि ऋषभ पंतच्या व्हिडीओने खळबळ, नेमकं काय काय म्हणाले?
BCCI : आयर्लंडसह इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी खराब, BCCI अॅक्शन मोडमध्ये, आज होणार मोठा निर्णय?
BCCI : आयर्लंडसह इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी खराब, BCCI अॅक्शन मोडमध्ये, आज होणार मोठा निर्णय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
BCCI Meeting: गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
Nitesh Rane Majha Infra Vision : मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, नितेश राणे यांचा विश्वास
मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, मंत्री नितेश राणे यांचा विश्वास
Indapur Crime News: जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
Vidyanand Bapat attack in Pune: मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
Hindi Rajbhasha Sammelan 2026: नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Pune Santosh Pandit Arrest: हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
Embed widget