मुख्यपृष्ठPhotosबुटात साप, पाण्यात साप, लातूरात सापांचा सुळसुळाट
बुटात साप, पाण्यात साप, लातूरात सापांचा सुळसुळाट
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 26 Jun 2016 11:42 AM (IST)
1/6
वनविभाकडे पकडलेल्या सर्व सापांची नोंद करण्यात आली आहे. लातूरमध्ये पहाटेपर्यंत सर्पमित्रांना साप पकडण्याचं काम करावं लागत आहे. पकडलेले बरेचसे साप बिनविषारी असले तरी काही अशिया खंडातील सर्वात विषारी सापांपैकी आहे.
2/6
साप आपलं बिळ कधी स्वतः बनवत नाही, त्यामुळे याकाळात हे जीव अगदी मिळेल त्या ठिकाणी जाऊन बसतात. पण अशावेळी घाबरुन गलका करु नये, कारण यामुळे साप बिथरण्याची शक्यता असते, असं आवाहन सर्पमित्र करत आहेत.
3/6
आपल्या घराशेजारचा कचरा, रिकामी पिंप, टायर ही पावसाळ्यात साप येण्याची हक्काची ठिकाणं असतात. अन्नाच्या शोधात साप पावसाळ्यात सहज घरात शिरतात, असं सर्पमित्रांचं म्हणणं आहे. त्यामुळं आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.
4/6
मराठवाड्यात जवळपास 4 वर्षांनंतर मनसोक्त पाऊस झाला आहे. गेली 3 वर्ष सततचा दुष्काळ आणि पाणीटंचाई, त्यामुळे प्रत्येक सजीवाला इथे मरगळ आली होती. पण आता दुष्काळात खोलवर दडी मारुन बसलेले अनेक जीव बिळातून बाहेर पडले आहेत.
5/6
लातूरमधल्या गंगापूर भागातलं, 80 फूट खोल विहीतला साप स्थानिकांना दिसला. तात्काळ सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं.. आणि सापाची सुटका झाली.
6/6
पावसाळा सुरू झाला आणि जमिनीवरील गारव्याचा आनंद घेण्यासाठी बिळात लपून बसलेले नागोबा बाहेर पडले आहेत. लातूरमध्ये चार दिवसात सर्पमित्रांनी तब्बल 127 साप पकडले आहेत.