एक्स्प्लोर

यंग टीम इंडियाचा बिनीचा शिलेदार, पाणीपुरी विकणाऱ्या मुलाची 'यशस्वी' वाटचाल

यशस्वी जैस्वालच्या शतकानं भारताला सलग तिसऱ्यांदा अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारुन दिलीय. क्रिकेटच्या वेडापायी मुंबईत आलेल्या यशस्वीला राहायला देखील जागा नव्हती. त्याच यशस्वीनं आज आपल्या संघर्षावर मात करत मोठं यश मिळवलंय.

मुंबई : मुंबईच्या यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकानं भारतीय अंडर नाईन्टिन संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं. गेली अनेक वर्ष मुंबई क्रिकेटसाठी मोलाचं योगदान देणारा यशस्वी आता भारतीय युवा संघासाठीही महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. अठरा वर्षांचा यशस्वी क्रिकेटच्या वेडापायी सात वर्षांपूर्वी मुंबईत आला. आणि त्यानंतर अनेक दिव्य पार करत आज तो यशाच्या एका अत्युच्य शिखरावर जाऊन पोहोचला आहे. यशस्वी जैस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या भदोही खेड्यातील एका छोट्याशा दुकानदाराचा मुलगा. क्रिकेटच्या वेडापायी त्यानं वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी मुंबई गाठली. त्यावेळी या स्वप्ननगरीत यशस्वीच्या मुक्कामाचीही अडचण होती. मग त्यानं मुंबईतलं आझाद मैदान हेच आपलं घर बनवलं. खरं तर मोकळं आकाश हेच त्याच्या घराचं छत होतं. पण हळूहळू ओळखी वाढवून तो आझाद मैदानावरच्या मुस्लीम युनायटेडच्या तंबूत झोपू लागला. त्या काळात यशस्वीनं पोटापाण्यासाठी आझाद मैदानावर पाणीपुरीही विकली. क्रिकेट खेळायला मिळावं या एकमेव हेतूनं त्यानं कुठलंही काम हलकं मानलं नाही. यशस्वी जैस्वालच्या या संघर्षात प्रशिक्षक ज्वाला सिंग यांची मिळालेली साथ मोलाची ठरली. त्यांनी यशस्वीतल्या गुणवत्तेला न्याय मिळवून दिलाच पण त्याच्या डोक्यावर छप्पर येईल असा हक्काचा आसराही मिळवून दिला. ज्वाला सिंग यांनी दिलेल्या या पाठिंब्यानं यशस्वीचा आत्मविश्वास बळावला आणि मग त्यानं मुंबईत वयोगटाचं क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. मुंबईतल्या आंतरशालेय क्रिकेटमध्ये यशस्वीनं आधी रिझवी हायस्कूलचं नाव मोठं केलं आणि मग मुंबई क्रिकेटच्या वयोगट क्रिकेटची एकेक पायरी त्यानं झपाझप पार केली. आज भारताच्या अंडर नाईन्टिन विश्वचषक संघात आणि आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघात स्थान मिळवणाऱ्या यशस्वी जैस्वालचा आजवरचा हा सारा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल परिस्थितीशी एकाकी संघर्ष करण्याची त्यानं दाखवलेली जिद्द भविष्यातही त्याला घवघवीत यश मिळवून देईल यात शंका नाही. आज अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारल्याचा तमाम भारतीयांचा आनंद द्विगुणित झाला कारण यशस्वी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानचा चक्क दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना या मुंबईकरांनी रचलेली 176 धावांची अभेद्य भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. यशस्वीचं नाबाद शतक तर भागिदारीचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. त्यानं 113 चेंडूत आठ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 105 धावांची खेळी उभारली. तर दिव्यांशनं 99 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी करुन त्याला छान साथ दिली. यंदाच्या विश्वचषकात यशस्वीनं साकारलेली ही आणखी एक मोलाची खेळी ठरली. त्यानं सलमीवीर म्हणून या विश्वचषकात पाच सामन्यात 156 च्या सरासरीनं 312 धावांचा रतीब घातलाय. त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

पाणीपुरी विकून टीम इंडियात एन्ट्री, यशस्वीचा संघर्षमय प्रवास

मुंबईचे युवा पिढीतले पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे संघाचे शिलेदार बनले आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन यशस्वीनंही अंडर नाईन्टिन क्रिकेट गाजवायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या नाबाद शतकानं त्यानं आपल्या उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवून दिली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Shirdi : देशातील सर्वात मोठे तोफगोळे, 365 दिवस पुरतील इतकं उत्पादन, ड्रोन आणि मिसाईल्स, साईंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प
देशातील सर्वात मोठे तोफगोळे, 365 दिवस पुरतील इतकं उत्पादन, ड्रोन आणि मिसाईल्स, साईंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
Alandi Temple : आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली, विशाल वारुळे कसा अडकला?
आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली

व्हिडीओ

Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
Alandi Temple : आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली, विशाल वारुळे कसा अडकला?
आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
Share Market : 37400 कोटी बाजारमूल्य असलेली कंपनी 506 रुपयांचा लाभांश देणार, कंपनीचा शेअर किती रुपयांवर?
37400 कोटी बाजारमूल्य असलेली कंपनी 506 रुपयांचा लाभांश देणार, कंपनीचा शेअर किती रुपयांवर?
Embed widget