रोहित पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, 45 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा?
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 45 मिनीटे चर्चा झाली.
Rohit Pawar Met Uddhav Thackeray : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज आमदार रोहित पवार यांनी भेट (Rohit Pawar Met Uddhav Thackeray) घेतली. अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी जमा केलेल्या सर्व पुराव्यांसह सविस्तर माहिती उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. संसदेत या विषयावर आवाज उठवण्याकामी सहकार्य करण्याची विनंती देखील रोहित पवारांनी केली. महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष म्हणून या विषयाच्या निष्पक्ष चौकशीकामी आणि अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे.
अजित पवार यांच्या अपघाताबाबत उद्धव ठाकरे यांच्यांशी 45 मिनिटे चर्चा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजितदादांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत केलेल्या कामालाही उजाळा देण्यात आला. पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांच्या अपघाताबाबत उद्धव ठाकरे यांच्यांशी 45 मिनिटे चर्चा केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे. त्यांनी देखील अभ्यास केला होता. 9 तारखेपासून संसदेत खासदारांनी मुद्दा मांडावा अशी मागणी केली आहे. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA आणि VSR यांची मिलीभगत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी जमा केलेल्या सर्व पुराव्यांसह सविस्तर माहिती त्यांना दिली आणि संसदेत या विषयावर आवाज उठवण्याकामी सहकार्य करण्याची विनंती केली. महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक… pic.twitter.com/gPyGO9akEj
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 4, 2026
CBI कडे 18 दिवस पत्र देऊन झालं तरी काही झाले नाही
CBI कडे 18 दिवस पत्र देऊन झालं तरी काही झाले नाही असेही रोहित पवार म्हणाले. मोठ्या पक्षाचे नेते म्हणून या तपासात गती यावी आणि न्याय मिळावा यासाठी सोबत राहण्याचे उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे रोहित पवार म्हणाले. त्यांनी देखील ते मान्य केले आहे. ज्या पद्धतीने त्रुटी आहेत. VSR कंपनी सेफ्टीमध्ये योग्य नव्हती असे पवार म्हणाले. DGCA च्या अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. महाराष्ट्रात FIR का होत नाही याबाबत उद्धव ठाकरेंनी पण आश्चर्य व्यक्त केल्याचे रोहित पवार म्हणाले. घाटकोपर प्रकरणी एका भाजपच्या नेत्यांमुळे FIR झाली. अजित पवार यांचा अपघात आहे. पण अहमदाबाद प्रकरणी लोकांचा विचार कमी आणि बोईंगचा विचार जास्त केला जात आहे. मोजके रेकॉर्डिंग त्यांनी दिले आहे.. लाखो लोक विमानाने प्रवास करतात. आमचा काका गेला हा मुद्दा आहे. पण कोट्यावधी लोक प्रवास करतात त्यांचा विचार आहे असे रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Rohit Pawar: गोळी डोक्याला लागली, पण दाखवली छातीत, रोहित पवारांचं उदाहरणासह प्रेझेंटेशन, अजितदादांच्या अहवालावर प्रश्नचिन्ह
महत्त्वाच्या बातम्या






















