एक्स्प्लोर

Climate Change : COP 26 म्हणजे काय आणि जगाच्या भविष्यासाठी ती का महत्त्वाची आहे?

वसुंधरा परिषदेची (Earth Summit) महत्वाची निष्पत्ती म्हणजे UNFCCC होय. त्या माध्यमातून हवामान बदलाच्या संकटावर चर्चा करण्यासाठी दरवर्षी COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येते. 

COP 26 : हवामान बदलाचं (Climate Change) संकट हे सध्याच्या जगासमोरील सर्वात मोठं संकट आहे. हवामान बदलावर ज्या-ज्या वेळी चर्चा केली जाते त्या-त्या वेळी 1992 सालच्या एका महत्त्वाच्या घटनेवरही चर्चा केली जाते, ती घटना म्हणजे वसुंधरा परिषद किंवा अर्थ समिट (Earth Summit) होय. या परिषदेतील सर्वात महत्त्वाची निष्पती म्हणजे यूएनएफसीसीसी (युनायटेन नेशन्स फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज- UNFCCC). या माध्यमातून दरवर्षी COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येते.

 या वर्षीची COP 26 ही बैठक 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या दरम्यान ब्रिटनमधील ग्लासगो या ठिकाणी होणार आहे. जगभरातील 190 हून अधिक देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी हॊणार आहेत. 2015 साली पॅरिस करारामध्ये जी काही उद्देश ठेवण्यात आली आहेत त्यावर गेल्या पाच वर्षात काय कृती केली याचा आढावा घेतला जाईल. तसेच हवामान बदलाच्या संकटाला कशा पद्धतीने तोंड द्यायचं, त्यावर कोणत्या उपाययोजना करायच्या यावर जागतिक मंथन केलं जाणार आहे. क्लायमेट अॅक्शन प्लॅन कसा असावा याची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.
 
वातावरणातील हरित वायू म्हणजे आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी UNFCCC ची स्थापना करण्यात आली आणि त्या माध्यमातून दरवर्षी COP परिषद आयोजित केली जाते. हवामान बदलाच्या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासंबंधी नियोजन करणे, तशा प्रकारची योजना आखणे, हवामान बदलासंबंधी जागरुकता निर्माण करणे या गोष्टींवर चर्चा केली जाईल.
 
COP चा इतिहास
पहिली COP ही 1995 साली जर्मनीतील बर्लिन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. COP च्या 1995 पासून आतापर्यंत एकूण 25 परिषदा झाल्या आहेत. यामध्ये भारतासहित सध्या 198 देशांचा समावेश आहे. L 1997 साली क्योटो या ठिकाणची COP 3 ही परिषद अत्यंत महत्वाची होती. याच परिषदेत क्योटो करारला मंजुरी देण्यात आली. ग्रीन हाऊस गॅसेस किती प्रमाणात कमी करता येतील याची वचनबद्धता या सदस्य देशांनी दिली होती. क्योटो करार 16 फेब्रुवारी 2005 सालापासून लागू करण्यात आला. त्यामध्ये 192 देशांनी त्याला मान्यता दिली होती.
 
भारतात, 2003 साली नवी दिल्ली COP चे आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. त्यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या महत्वाच्या मुद्द्याचा समावेश होता. हवामान बदलाच्या संकटाला सामोरं जाताना विकसित देशांनी विकसनशील आणि अविकसित देशांना तंत्रज्ञान हस्तांरण करण्यासंबंधीची भूमिका भारताने मांडली. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि हवामान बदलासंबंधी आंतरराष्ट्रीय संस्थांचे बळकटीकरण कशा पद्धतीने करण्यात यावं यावर चर्चा करण्यात आली.
 
COP 21- पॅरिस करार
COP च्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची बैठक आणि हवामान बदलाविरुद्धच्या चळवळीला नवी दिशा देणारी परिषद ही 2015 साली फ्रान्सच्या पॅरिसमध्ये (Paris Agreement) आयोजित करण्यात आली होती. प्रि-इंडस्ट्रियल लेव्हल म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या आधी जगाचं जेवढं तापमान होतं, त्या तापमानाच्या तुलनेत या शतकाच्या शेवटीपर्यंत 2 डीग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमान वाढ होऊ द्यायची नाही असा महत्वाचा ठराव या परिषदेत पारित करण्यात आला. त्यातही या तापमानवाढीला केवळ 1.5 डीग्री सेल्सियसपर्यंतच नियंत्रित करणे, त्यापेक्षा जास्त तापमान वाढ जगासाठी घातक असल्याचं या परिषदेत सांगण्यात आलं. औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या तापमानाच्या तुलनेत जर 2 डीग्रीपर्यंत तापमान वाढ झाली तर ते समुद्र किनारी वसलेल्या शहरांना, बेटांवर वसलेल्या देशांसाठी अत्यंत घातक ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
Embed widget