एक्स्प्लोर

भारताचा जीडीपी सहा पटीने वाढला : पंतप्रधान मोदी

दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातील विविध देशातील प्रतिनिधिंना संबोधित केलं.

दावोस/ स्वित्झर्लंड  : “1997 च्या तुलनेत भारताचा जीडीपी सहा पटीने वाढला आहे. तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा मिळाल्याने हा विकासदर साध्य करता आल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. तसेच, जगापुढे आज शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातील विविध देशातील प्रतिनिधिंना संबोधित केलं. तीन दिवसाच्या या परिषदेत जगभरातील 350 राजकीय नेते, 60 पेक्षा अधिक देशाचे प्रमुख, जगातल्या महत्त्वाच्या कंपन्यांचे सीईओ, आणि विविध क्षेत्रातील एक हजार पेक्षा अधिक नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीचं उद्घाटन केल्यानंतर, जगभरातील प्रतिनिधिंना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी जगासमोरील आव्हानं, आणि त्यावरचे उपाय यावर विस्तृत विश्लेषण केलं. “भारताने नेहमी वसुधैव कुटुंबकम यावर विश्वास ठेवला. याचा अर्थ संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे. पण आज जगातील नैसर्गिक साधनसंपत्तीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही स्थिती अतिशय चिंतेची आहे,” असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. तसेच, आज जगासमोर पर्यावरण बदल, ग्लोबल वॉर्मिंग, अतिवृष्टी, हिवाळ्यात निच्चांकी तापमानाची नोंद ही मोठी संकटं आहेच. पण या संकटावर मात करण्यासाठी किती विकसनशील देश एकमेकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय, इंटरनेटचं वाढतं जाळं हे ग्लोबल फ्लोद्वारे अनेक संधी उपलब्ध करुन देत असलं, तरी यातून अनेक आव्हानंही निर्माण होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत सरकारच्या कामाबद्दल बोलताना पंतप्रधान पुढे म्हणाले की, “आम्ही रिफॉर्म, परफॉर्म, आणि ट्रान्सफॉर्मच्या सिद्धांतावर काम करत आहोत. त्यामुळे आज भारतातील रेड टेपची (लालफीतशाही) जागा आता रेड कार्पेटने घेतली आहे.” जीएसटीवरही पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना माहिती दिली. “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदा देशात एकच करप्रणाली लागू झाली. यातील पारदर्शकपणा आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करत आहोत.” गुंतवणूकदारांसाठी भारताची दारं खुली होत असल्याचेही मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. भारताची विविधता आणि लोकशाही बद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “देशातील लोकशाही केवळ विविधतेचं पालन करत नाही. तर जनतेच्या इच्छा, अपेक्षा आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करते आणि हीच लोकशाहीची मूल्य दरी कमी करण्याचं काम करते.” दरम्यान, 23 ते 26 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु, रेल्वेमंत्री पियूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जितेंद्र सिंह आणि एम.जे. अकबर इत्यादी मंत्रीही सहभागी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, 'तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही' 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget