एक्स्प्लोर

Satara : मनाली अपघातातील 'ते' 50 ट्रेकर्स सुखरुप सातारमध्ये पोहोचले, जिल्हा प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना यश

मनाली येथे ट्रेकिंगचे ट्रेनिंग घेणासाठी गेलेल्या ट्रेकर्स बसला अपघात झालेल्या सर्वांना सुखरुप साताऱ्यात आणण्यात सातारा जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात 10 ते 12 जण किरकोळ जखमी झाले होते.

सातारा  : मनाली येथे ट्रेकिंगचे ट्रेनिंग घेणासाठी गेलेल्या ट्रेकर्स बसला अपघात झालेल्या सर्वांना सुखरुप साताऱ्यात आणण्यात सातारा जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात 10 ते 12 जण किरकोळ जखमी झाले होते. अपघातानंतर सर्व ट्रेकर्स घाटात अडकून पडले होते, कोणतेही वाहन थांबत नव्हते. मात्र, सातारा प्रशासकीय यंत्रणेच्या जोरदार हालचालीनंतर ट्रेकर्स सुखरुप घरी परतले आहेत.  

सातारा जिल्ह्यातील गेल्यावर्षी झालेल्या भुस्खलनावेळी आपत्कालीन टीम येईपर्यंत सर्वांना हातावर हात ठेवून बघत बसण्याची वेळ येत होती. स्थानिक ग्रामस्थांनी जसे जमेल तसे मदतकार्य करुन लोकांना मदत केली होती. या मदतकार्यात काही ग्रामस्थांना जायबंदी व्हावे लागले, तर काहींना आपला जीवही गमवावा लागला. हाच अनुभव लक्षात घेता सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मऊंन्टेनेअरिंगच्या अंतर्गत सातारा जिल्हा परिषदेला दिलेल्या आदेशानंतर सातारा जिल्ह्यातील 50 जणांची टीम दिनांक 8 मे रोजी मनाली या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवली होती.

परतीच्या मार्गावर असताना मनालीजवळ अपघात 

या सर्वांचे 11 तारखेनंतर ट्रेनिंग सुरु झाले होते. चार आठवड्याचे ट्रेनिंग संपवूण हे सर्वजण परतीच्या मार्गावर असताना मनालीजवळील मंडी जिल्ह्यातील एका तालुक्यात दुर्घटना होऊन घाटात बसला अपघात झाला. यात सुमारे 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले. त्या भाड्याने घेतलेल्या बस चालकाचा एक हातही निकामी झाला होता. या अपघाताची माहिती एबीपी माझाने दाखवल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणेला समजले. त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने बैठक  बोलावून डॉ. किरण जाधव आणि डॉ. संजय जाधव यांच्यासह एक टीमला तातडीने मदतीसाठी दिल्लीला रवाना केले.

सातारचे खासदार आणि सातारा जिल्हाधिकारी ठरले किंगमेकर 

सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांना सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या अपघाताची माहिती दिल्यानंतर खासदार स्वतः जिल्हा परिषदेत आले. अपघातातील सर्व ट्रेकर्स जेव्हा दिल्लीत पोहोचले तेव्हा खा. पाटील यांनी या सर्वांची राहण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र भवन आणि सिक्कीम भवन उपलब्ध करुन दिले. तेथेच या सर्वांची जेवणाचीही सोय करुन दिली. त्यांनंतर खा. पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून रेल्वेचा एक डबा बुक करण्याची विनंती केली. त्यानंतर काही वेळातच त्यांना "OK" मेसेज आला आणि हे सर्वजण एकत्रित दिल्ली ते सातारा असा प्रवास करु शकले. या प्रक्रियत मात्र खरे किंगमेकर ठरले ते सातारचे खा. श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह.

सातारा प्रवासाकरीता ट्रेनची एक बोगी आरक्षित

ही सर्वजण दिल्लीला पोहचेपर्यंत ट्रेनिंगसाठी गेलेल्या 50 जणांच्या टीमला घाटातून तालुक्याच्या ठिकाणी आणण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंडी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून खास वाहनाची सोय उपलब्ध करुन दिली. सर्व ट्रेकर्स दिल्लीत पोहोचेपर्यंत शेखर सिंह यांनी दिल्ली ते सातारा प्रवासाकरीता ट्रेनची एक बोगी आरक्षित करुन घेतली. यासाठी रेल्वे मंत्रालयानेही सहकार्य केले. एक बोगीचे आरक्षित केल्यानंतर सर्वांना एकाच बोगीमध्ये घेण्यात आले. 

जखमी झालेल्या ट्रेकर्सना जिल्हा रुग्णालयातील डॉ. किरण जाधव, जिल्हा परिषदेचे ग्रामविकास अधिकारी डॉ. संजय जाधव यांनी ट्रेनमध्येही उपचार दिले. या सर्वांना सुखरुप साताऱ्यात आणण्यात आल्यानंतर सर्वांना सुखरुप वाहनाने घरपोच सेवा दिली. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विनय गौडा जी सी यांनी खास परिश्रम घेतले. या अपघातानंतर सर्वांसोबत संपर्कात राहिलेले महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनिलबाबा भाटिया यांनीही प्रशासकिय यंत्रणेचे खास आभार मानले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Sangli Satara Vidhan Parishad : महायुतीसाठी साताऱ्यातून गुड न्यूज, शंभूराज देसाई- उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत  
शंभूराज देसाई- भाजप उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत
Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगलीत शरद पवार गटाची 'डबल' खेळी! विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार अर्ज भरणार; नेमकं कारण काय?
सातारा-सांगलीत शरद पवार गटाची 'डबल' खेळी! विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार अर्ज भरणार; नेमकं कारण काय?
Vidhan Parishad Election 2026: साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस कायम! महेश शिंदे-शंभूराज देसाई वादाचा विधान परिषद निवडणुकीत फटका बसणार?
साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस कायम! महेश शिंदे-शंभूराज देसाई वादाचा विधान परिषद निवडणुकीत फटका बसणार?

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget