एक्स्प्लोर

Ashadi Wari 2021 : आषाढी वारी पायी सोहळा रद्द केल्याने भाजप आक्रमक, कायदा सुव्यवस्था बिघडली तर सरकार जबाबदार असल्याचा इशारा

Pandharpur Ashadi Wari 2021 : आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं.

पुणे : पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. यावेळी आषाढी वारीबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, या निर्णयानंतर भाजपने याला विरोध केला आहे.

वारकऱ्यांना कोविडचे नियम पाळून परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सगळ्याच गोष्टींना परवानगी आणि वारीला मात्र विरोध हे न कळण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली. शरद पवार यांनी देखील आजारातून उठल्यावर हॉटेल चालकांची काळजी केली, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

निर्णयाला विरोध करणाऱ्यांना कोरोनाचं घेणेदेणे नाही : अजित पवार
सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना कोरोनाचं घेणेदेणे नाही. त्यांना राजकारण करायचं असेल तर आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. परंपरा टिकली पाहिजे पण कोरोनाने लोक ग्रासले नाही पाहिजे याचा सरकारने विचार केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पायी पालखी जाणार म्हणून वारकरी उत्साहात बाहेर पडतील म्हणून तशी परवानगी दिली नाही. आम्हाला तशी परवानगी द्यायला बरोबर वाटत नाही, पण कोरोना वाढला नाही पाहिजे. नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला. परंपरा टिकवण्यासाठी मधला मार्ग काढला असल्याचे उपमुख्यमंत्री सांगितले. दोन बसमध्ये 30-30 वारकऱ्यांना जाता येईल. एका पालखीसाठी दोन बस असतील, अशीही माहिती त्यांनी दिली.

Pandharpur Ashadi Wari 2021 : आषाढी वारी सोहळ्यासाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांनाच परवानगी, यंदाही पायी वारी सोहळा नाही : अजित पवार

भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक
निर्बंधासह पायी वारीची मागणी धुडकावल्यानं भाजपची अध्यात्मिक आघाडी आक्रमक झाली असून भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांची ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हे मुघलांचे सरकार असून महाराष्ट्रद्रोही सरकार आहे. ब्रिटीश, मुघलांच्या काळात ही पायी वारीची परंपरा खंडित झाली नाही ती या सरकारने केली असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे, तो खपवून घेणार नाही. निर्बंधासह पायी वारीची परंपरा जोपासण्यावर वारकरी संप्रदाय ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला. 

नियमावलीमुळे पैठणच्या एकनाथ महाराज पालखीचे मानकरी रघुनाथ बुवा नाराज
मानाच्या पालखीत पैठणच्या पालखीचे स्थान आहे. शासनाने ठरवून दिलेले नियम बाबत पैठणच्या एकनाथ महाराज पालखीचे मानकरी रघुनाथ बुवा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  पायी पालखी जाणे हा वारकऱ्यांचा मान आहे, जीव आहे. त्यामुळे किमान पाच तरी लोकांना पायी पालखी नेऊ द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारचे नियम आम्हाला मान्य आहे. मात्र, जर पाच लोकांना पायी जाऊ दिलं तर वारकऱ्यांवर उपकार होतील असं महाराजाचे म्हणणे आहे. त्यामुळं शासनाने याचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केलीये.

मानाच्या 10 पालख्या :


1. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)


2. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)


3. संत सोपान काका महाराज (सासवड)


4. संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)


5. संत तुकाराम महाराज (देहू)


6. संत नामदेव महाराज (पंढरपूर)


7. संत एकनाथ महाराज (पैठण)


8. रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती)


9. संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर)


10. संत चांगटेश्वर महाराज (सासवड)

दरम्यान, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी निर्बंधांमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. बस आणि भाविकांची संख्या दुप्पट करीत वारकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा बसमधून पालखी सोहळे अणावे लागणार असून यंदा फक्त 10 पालख्यांना 20 बस दिल्या जाणार आहेत. भाविकांची संख्या देखील दुप्पट करीत वारकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला आहे. याशिवाय विसाव्यापाशी होणारे प्रतिकत्मक रिंगण करून दिड किलोमीटर पायी  चालत येण्यास निर्बंध घालून परवानगी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Lohagad Case : मुलाच्या हत्येनंतर आता वडिलांनाही गमावलं, विशाल अग्रवालांचं स्टेटस, केतनच्या आजोबांचं निधन
मुलाच्या हत्येनंतर आता वडिलांनाही गमावलं, विशाल अग्रवालांचं स्टेटस, केतनच्या आजोबांचं निधन
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
Pune Crime News : कंपनीमध्ये शिफ्टमध्ये संतापजनक कृत्य, सहकाऱ्याने प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसरचा पाइप घातला अन् पोटात हवा भरली; पुण्यात कामगाराचा मृत्यू
कंपनीमध्ये शिफ्टमध्ये संतापजनक कृत्य, सहकाऱ्याने प्रायव्हेट पार्टमध्ये कॉम्प्रेसरचा पाइप घातला अन् पोटात हवा भरली; पुण्यात कामगाराचा मृत्यू
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Embed widget