एक्स्प्लोर

Manipur Violence : मणिपूर हत्याकांड प्रकरण: सीबीआयने पुण्यातून मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

मणिपूर  मागील काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. यात दोन मुलांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. याच मास्टरमाईंडचं आता पुणे कनेक्शन पुढे आलं आहे.

पुणे : मणिपूर (Manipur Violence) मागील काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. यात दोन मुलांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. याच मास्टरमाईंडचं आता पुणे कनेक्शन पुढे आलं आहे. मणिपूरमधील दोन तरुणांचे अपहरण करत हत्या केल्या प्रकरणी CBI कडून ‘मास्टरमाइंड’ ला अटक केली. पुणे येथे येऊन त्या व्यक्तीला सीबीआयने अटक केली. पाओलुनमांग असं अटक करण्यात आलेल्या 22 वर्षीय आरोपीचं नाव आहे. अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 16 ऑक्टोबरपर्यंत सीबीआयची कोठडी दिली. 

मणिपूरमधील हिंसाचाराची आपल्यातील अनेकांना माहिती आहे. याच वेळी दोन मुलांचं अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे देशभरातून संतापाची लाट उसळली होती. हे सगळं प्रकरण घडल्यानंतर या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला. आता सीबीआय या प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ पर्यंत पोहचले आणि त्यांनी पुण्यातून या ‘मास्टरमाइंड’ला बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणातील आरोपींनी मणिपूरमधील 17 वर्षीय विद्यार्थी हिजाम लिनथोइंगंबी आणि 20 वर्षांचा फिजाम हेमजीत यांचे अपहरण केले होते. या प्रकरणी सीबीआयने तपास सुरु केल्यानंतर चार आरोपींना अटक केली होती. पाओमिनलुन हाओकिप, एस. मालस्वान हाओकिप आणि दोन महिला लिंग्नेइचोन बैतेकुकी आणि टिननेइलिंग हेन्थांग यांना एक ऑक्टोंबर रोजी अटक केली होती. परंतु मास्टरमाइंड फरार होता.आता या सीबीआयने ‘मास्टरमाइंड’लादेखील गजाआड केलं आहे. 

या दोन बेपत्ता मुलांच्या मृत्यूनंतर मणिपूरमध्ये चार दिवस निदर्शने सुरू होती. संतप्त जमावाने इंफाळ येथील मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या खाजगी घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी जमावाला घराच्या 500 मीटर आधी अडवलं होतं. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. त्यानंतर  मुख्यमंत्र्यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

 मणिपूर हिंसाचारामागे दहशतवादी संघटनांचा हात? 

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये (Manipur Violence) चार महिन्यांनंतरही अशांत आहे. त्यातच मणिपूरमधील या हिंसाचाराबाबत एनआयएच्या (NIA) तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यामागे म्यानमारमधील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं एनआयएच्या तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणी एका संशयीत व्यक्तीला एनआयएने अटक केली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारामागे दहशतवादी संघटनांचा हात? एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषदAjit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...Job Majha | DFCCIL मध्ये ज्युनियर मॅनेजर पदावर भरती, अर्ज कसा करायचा? ABP MajhaCM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.