एक्स्प्लोर

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारामागे दहशतवादी संघटनांचा हात? एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

म्यानमार आणि बांगलादेशमधील दहशतवादी संघटना कुठल्याही परिस्थितीत मणिपूरमध्ये शांतता नांदू देण्यास इच्छूक नाही आहेत, असं एनआयएच्या तपासात उघड झालं आहे.

Manipur Violence News : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये (Manipur Violence)  चार महिन्यांनंतरही अशांत आहे. त्यातच मणिपूरमधील या हिंसाचाराबाबत एनआयएच्या (NIA)  तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यामागे म्यानमारमधील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं एनआयएच्या तपासातून समोर आलं आहे.  या प्रकरणी एका संशयीत व्यक्तीला एएनआयने अटक केली आहे. 

म्यानमार आणि बांगलादेशमधील दहशतवादी संघटनांनी विविध जाती समूहांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी कट रचला आहे. म्यानमार आणि बांगलादेशमधील दहशतवादी संघटना कुठल्याही परिस्थितीत मणिपूरमध्ये शांतता नांदू देण्यास इच्छूक नाही आहेत, असं एनआयएच्या तपासात उघड झालं आहे. दरम्यान मणिपूरमधील हिंसाचारात 150 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो घरे जाळली गेली आहेत. शिवाय हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. 

चुराचांदपूर परिसरातून एका संशयिताला अटक

म्यानमार आणि बांग्लादेशमधील दहशतवादी संघटनांनी विविध जाती समूहांमध्ये  तेढ निर्माण करण्यासाठी भारतात अतिरेकी नेत्यांच्या गटाची भरती केल्याचे समोर आले आहे.  म्यानमार आणि बांग्लादेशातील दहशतवादी गटाचे मणिपूरमधील हिंसाचाराची आग कायम धगधगत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  या प्रकरणी एनआयएने चुराचांदपूर परिसरातून एका संशयिताला अटक केली आहे. जो परदेशातून भारताविरुद्ध रचल्या जात असलेल्या दहशतवादी कटाचा भाग आहे. एचटीने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपीचे नाव सेमिनलून गंगटे  (Seiminlun Gangte) आहे. एनआयएने 19 जुलै रोजी कट रचल्याचा तपास करण्यासाठी  त्याच्या विरोधात  गुन्हा दाखल केला होता.

मणिपूरमध्ये म्यानमारमधील दहशतवादी संघटनांचे अनेक दहशतवादी सक्रिय

एनआयएच्या म्हणण्यानुसार, म्यानमार आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटना  मणिपूरमधील शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि इतर दहशतवादी उपकरणे खरेदीसाठी निधी देत ​​आहेत.  ज्यांचा पुरवठा सीमेपलीकडून तसेच भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या इतर दहशतवाद्यांना केला जातो. एवढच नाही तर मणिपूरमध्ये म्यानमारमधील दहशतवादी संघटनांचे अनेक दहशतवादी सक्रिय आहेत.  जे जमावात घुसून मणिपूरच्या लोकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ले करतात, त्यामुळे हिंसाचार वाढत आहे. त्यांच्या गोळीबाराचे अनेक कथित व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

सीमावर्ती भागातून घुसखोरीची शक्यता 

केंद्रीय गृहमंत्रालयालाही घुसखोरांच्या समस्येची जाणीव आहे. म्यानमार - मणिपूर अशी  398  किमीची सीमा आहे. मणिपूरमधील टेंगनौपाल, चंदेल, उखरुल, कमजोंग आणि चुराचंदपूर जिल्हे या सीमावर्ती भागाशी जोडलेले आहेत. या भागातून भारतात घुसखोरीची शक्यता आहे.  अलीकडच्या काळात चुरचंदपूरसह या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, म्हणजेच या दहशतवादी संघटनांचे लोक आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि निषेधाच्या नावाखाली रक्तरंजित खेळ करतात. मणिपूरमधील  हिंसाचार अचानक पेटला नसून त्यामागे म्यानमारच्या दहशतवादी संघटनांचा हात आहे हे उघड आहे.

हे ही वाचा :

NIA Raid : एनआयए ॲक्शन मोडमध्ये! खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात मोठी कारवाई; दिल्ली,उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी

महत्त्वाच्या बातम्या

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Sanjay Raut: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, एक महाराष्ट्रात अन् दोन केंद्रात; संजय राऊतांची घणाघाती टीका
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget